हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आतां न फिरें माघारी | बैसलें शेजारी गोविंदाचे ||१||
घररिघी झाले पट्टराणी बळें | वरिलें सांवळें परब्रह्म ||२||
बळियाचा अंगसंग झाला आतां | नाहीं भय चिंता तुका म्हणे ||३||
.....................................................................................
श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग वरवर पहाता सामान्य माणसाला गोंधळात टाकणाराच आहे. कारण यात जे रुपक वापरले आहे ते सर्वसामान्यांना न पटणारे, नीतिनियमांच्या चौकटीत न बसणारे असे आहे. --- हे व्यभिचारी स्त्रीचे रुपक श्रीतुकाराम महाराजांनी वापरले आहे.
