आजची कविता भुजंगप्रयाग ह्या मध्ये लिहण्याचा प्रयत्न केलाय... बघा! जमलंय का आणि काही त्रुटी आढल्यास सांगायला विसरू नका.
एकांतात माझ्यासवे चंद्र जागा
नक्षत्रे असे सोबतीला तयाच्या
उदासी नभांची जमा होत गर्दी
उरावा जसा मंद अंती उसासा
दुरावा मनाचा अता खोल झाला
तुलाही मलाही दुभंगून गेला
कधी भेट होई? अता कोण जाणे
उरावी तरी ही जराशी अपेक्षा
- अक्षय समेळ
हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके
ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती
भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती
जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती
भव्य सारी जीवने अन् भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे
’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे
- राहत
कैफ़ियत बिनधास्त झाली

- in the pleasurable presence of किमयागार _/\_
सूर तुझा कसा?
मोरपंखी स्पर्श जसा,
वाऱ्यावरील अलवार झोका,
पाव्यातला नाद जसा,
कि उमललेला सोनचाफा?
सूर तुझा कसा?
ओला पहिला मृदगंध जसा,
मंद धुंद निशिगंध जसा,
फुलातला मकरंद जसा,
कि अळुपर्णावरील मोती जसा ?
खरंच..
मला गवसला जो,
तो तुझा सूर कसा?
सागराची गाज तसा?
शांत पुनवेचं चांदणं तसा?
सांजवेळीची कातर हुरहुर तसा?
कि निसर्गाचा राग नवा?
मला गवसलेला तव सूर असा,
माझ्या स्वरात मिसळावा तसा!
अगदीच तसा!!
---------------------------------
तो आहे निळ्या रंगासारखा,
आणि लाल माझा रंग..
माझी चाल थोडी वेगळी,
आणि त्याचा फारच वेगळा ढंग..
पण काहीतरी आहे त्यात,
दुसर्यांपेक्षा फार वेगळं..
त्याच्या निळ्या रंगांच्या धाग्यांनी,
माझं अंतरंग व्यापलय सगळं..
त्याला कदाचित माहितीही नसेल,
माझ्या लाल धाग्याचं जग..
एकाच प्रश्न सतावतोय फक्त,
त्याने हे लाल धागे पहिलेच नसले मग..
लाल माझ्या पडद्यावरती,
निळी नक्षी बहरतेय..
पण त्याचे निळे पडदे मात्र,
अजूनही निळेशारच दिसतायत...
निरोप म्हणजे देवाला नमस्कार
निघताना हातावर घातलेलं दही
पाठीवर थरथरता हात आजीचा
सांगून जातो बरंच काही
न सैलावणारी घट्ट मिठी
छकुल्या हातांनी केलेला टाटा
जेव्हा दुरावतात सखे सोबती
जेव्हा वेगळ्या होतात वाटा
साता समुद्रांपार पहिली भरारी
सासरी चाललेल्या ताईची पाठवणी
हसण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न
दडवीत हुंदका
लपवीत डोळ्यातलं पाणी
सहवासातल्या क्षणांच्या आठवणींची दाटी
विरहाची हुरहूर जडावलेली अंतः करणं
निरोप म्हणजेच परतीचं तिकीट
निरोपातच असतं पुढल्या भेटीचं बोलावणं
ऐक ना रे साद वेड्या मनाची,
जाणून घे प्रीत भावनांची!
तुझी साथ मिळता शब्द होती मुके,
तू नसता पसरती आठवणींचे धुके!
रोज नव्याने तुला आठवावे किती,
समजुनी घे जरा धुंदवेडी प्रिती!
पाऊस होऊनी बरसुन ये तू,
बेधुंद होऊनी मजला कवेत घे तू!
तुझीच क्षमा...शामल !
ऐक ना रे साद वेड्या मनाची,
जाणून घे प्रीत भावनांची!
तुझी साथ मिळता शब्द होती मुके,
तू नसता पसरती आठवणींचे धुके!
रोज नव्याने तुला आठवावे किती,
समजुनी घे जरा धुंदवेडी प्रिती!
पाऊस होऊनी बरसुन ये तू,
बेधुंद होऊनी मजला कवेत घे तू!
तुझीच क्षमा...शामल !
कसला आवाज आहे हा?
इतका गेहरा, इतका शहारलेला
अंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्या
एखाद्या नदीच्या शांततेसारखा
त्या अंधारात,
त्या शुकशुकाटात,
त्या आवाजाला,
घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावं
निश्चल,
ठाम,
सगळ काही ऐकत,
आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा आवाजही असाच काहीसा होता ना
घाबरू नकोस, पळू नकोस
तू ही ऐकून बघ, तुलाही जाणवेल
©प्रतिक सोमवंशी
(कुणीतरी email केलेला कोण होत त्याने कॉमेंट नक्की करा, मी जरा जास्तच busy होतो म्हणून पोस्ट नाही केलं काही)
खूप कमवली धन दौलत
खूप कमवली नाती
खूप जपली माणस आपली
खूप जपल्या आठवणी
खूप मिळाले मित्र नवे
खूप जण साथ सोडून गेले
खूप जगलो सुखात आयुष्य
खूप दुःखही सहन केले
खूप हसलो सुखात
खूप दुःखात रडूनही झाले
पण
पण
या सर्वांशी करार करताना
स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...
©प्रतिक सोमवंशी