लेखन

मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे?

Submitted by बोबो निलेश on 25 April, 2014 - 23:11

मराठीमधल्या वाचकांना नव्या दमाच्या लेखक/लेखिकांकडून नक्की काय अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाचायला आवडेल?
केवळ लेखकासाठीच नव्हे, तर विक्रेते, प्रकाशक लेखक वाचक या सर्वांसाठी हा प्रश्न विचारला आहे.

वाचकांना नक्की काय वाचायला आवडेल यामध्ये कुठले विषय आवडतील? कूठल्या घटनांवर लिहिलेलं आवडेल? कुठला जॉनर आवडेल.

खरं तर हा नंदिनी यांनी विचारलेला हा प्रश्न.
http://www.maayboli.com/node/48005?page=1

शब्दखुणा: 

कादंबरी लेखन- तंत्र, मंत्र.

Submitted by शर्मिला फडके on 10 December, 2013 - 05:53

'कादंबरी' हा साहित्य प्रकार ज्यांना वाचायला आवडतो आणि लिहायलाही आवडतो त्यांच्याकरता हा धागा.

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात

Submitted by Discoverसह्याद्री on 21 October, 2013 - 14:59

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

00Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस

Submitted by Discoverसह्याद्री on 6 October, 2013 - 10:53

..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा.

...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...

...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:

डॉक्टरचे दुखणे

Submitted by अंकुरादित्य on 20 September, 2013 - 11:41

डॉक्टर म्हणून काम करत असताना , मला अनेकदा धन्वंतरी सोबत संजयाचा सुद्धा रोल पार पाडवा लागतो . . मला जे पाहतात त्यांना मी डॉक्टर आहे हे सांगून पटत नाही , त्यांना मी स्वतःला धन्वंतरी द ग्रेट आणि संजय द ग्रेट यांची उपमा लाऊन घेत आहे समजल्यावर भोवळच आली असेल . . चिंता नको . . या माझ्याकडे मोफत इलाज करून देतो . . असो तर सांगायचा मुद्दा असा की होऊ घातलेल्या कवीला चंद्राच्या चांदण्यात आकाशी रंगाची साडी घातलेली गव्हाळ रंगाच्या मुलीचे लाल चुटूक ओठ किती सुंदर दिसतील यावर कल्पनाशक्ती खरवढून काढून हाती पडलेली खरपुड कागदावर उतरवावी लागते , तसेच काहीसे माझ्या बाबतीत होते . . .

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र"

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 12:45

bappas-patra-1.jpg

१) ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे. वयोगट - ६ ते १५
२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) पत्र मुलांच्याच हस्ताक्षरात असावे.ते पत्र पालकांनी scan करून किंवा फोटो काढून sanyojak@maayboli.com या इ-मेल आयडी वर पाठवायचं आहे.
५) पत्र मराठी भाषेतच लिहिलेले हवे. पालकांनी मुलांकडून पत्र गिरवून घेतले तरी चालेल.
६) पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.

विषय क्रमांक १ - टाटा नॅनो ' प्रॉमिस इज प्रॉमिस '

Submitted by अंकुरादित्य on 24 August, 2013 - 02:36

कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?

सुमेधाव्ही. व त्यांचा माबोप्रसिध्द उंदीर.आणि देशव्यापी प्रतिक्रिया

Submitted by उदयन.. on 6 August, 2013 - 08:35

सुमेधींच्या घरात उंदीर आला ही गोष्ट मायबोलीवरुन देशभरात गाजली : पहा काही प्रसिध्द व्यक्तिंच्या प्रतिक्रिया

दिग्गी:- उंदीर हे अल्पसंख्याकाचे प्रतिक आहे....सुमेधा या आरएसएस च्या कार्यकर्त्या आहेत म्हणुनच त्यांना आपल्या देशातुन अल्पसंख्यांना हुसकुन लावण्याचे काम करत आहे... मी माननिय प्रधानमंत्रींना विनंती करतो की यांच्यावर त्वरीत बंदी आणावी आनि उंदरासारख्या महान प्राणी वाचवावा..

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त

Submitted by वरुण on 24 May, 2013 - 03:26

मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त होते असा माझा दावा आहे.
पण लेखकाला पुरेसे वाचक मिळणे हे गरजेचे असते.
ते वाचक त्या लेखापर्यंत पोहोचेपर्यंतच नवीन लेखन प्रसवले जाते. आणि मग नवीन लेखनावरच चर्चा चालू होते तीही थोडाच वेळ। कित्येक चांगले लेख प्रतीसादाविना पडून आहेत. ते पुन्हा वाचकांच्या नजरेस येतील या करिता काय करावेलागेल . अड्मीन काही करू शकतात का …

त्यातूनही जी मंडळी येथेच वरचेवर पडीक असतात त्यांचे अनेक लेख आणि इतर लेखन दर्जेदार असते निःसंशय ! परंतु त्यांचे ''अहो रूपं अहो ध्वनी'' चालू असते.

मग नवख्या मंडळीना कशी संधी मिळणार. जरा खुलासा करावा.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन