'एम टी आयवा मारू' हे एका व्यापारी जहाजाचं नाव आहे. हे जहाज स्वतःचे कर्मचारी स्वतः निवडतं. जो एकदा आयवा मारू वर काम करतो, त्याला त्या जहाजाचं आकर्षण खेचून आणतं. असा साधारण प्लॉट.
कादंबरीच्या निवेदकाचं नावही अनंत सामंत असंच आहे. हे निवेदन वाचकांना समोर ठेवून केलेलं नाही. डायरी फॉर्मॅटमध्ये केलेलं हे लिखाण आहे.. 'चला, आता मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगतो', असलं काही नाही.
निवेदक जिथं कुठं असतो, तो भवताल, इमारती, रस्ते, थंडी, ऊन, आभाळ, मनस्थिती सगळं चित्रासारखं आपल्यापुढं उभं करतो. पार्श्वभूमी शब्दांतून उभी करतो. सामंतांना हे चांगलं जमतं, असं मला वाटतं.
झोपतो आता! उद्या जरा लवकर उठाव लागेल... ति नाहि मला उठवणार लवकर....काय रे असा एकटाच बोलतोय स्वतःशी..!नाहि ग आई.. स्वतःच्या मनाला धीर देउन बघुयात जमत का ?
म्हणून स्वतःशीच बोललो झोपतो आता! उद्या जरा लवकर उठव हे मात्र तुला उपदेशात्मक हा..
हो रे बाळा झोप...
बस्स हे विचारायला आली कि , ति येनार आहे ना तुझ्या सोबत.. कि नाही?(अगदीच शांतता पसरली ) आई तुझ्या मनाची किव करावी कि तुझ्या बद्दल मि आदर करावा तेच समजत नाहि.. किती वेळेस एकच प्रश्न विचारते.. आणि माझ नेहमीच उत्तर मला काहि फरक पडत नाहि.. ति आलि तरि तिच स्वागत नाहि आली तरी...
आता झोपु का ??
हो झोप..
मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच वेंगुर्ला इथे झाले. पुस्तकाचं नाव आहे "रंग अंतरंग". हे पुस्तक म्हणजे मी माझ्या अनुभवांवर व आठवणींवर आधारित ललितलेख व मनस्वास्थ्य या विषयावर लिहिलेले लेख यांचा संग्रह आहे. ज्यांना या पुस्तकाची प्रत हवी असेल त्यांनी संपर्क साधावा.
धन्यवाद!
मारी कोन्दोबद्दल पहिल्यांदा कुठेतरी वाचलं होतं आणि नंतर तिची ती नेटफ्लीक्सवरची प्रसिद्ध सिरीज बघितली होती ज्यात ती अमेरिकतल्या हर प्रकारच्या पसार्यांनी ओथंबलेल्या खोल्या आवरण्यात मदत करायची. नंतर तिची 'कपड्यांना कश्या घड्या घालाव्यात' याबद्दलची एक क्लीप बघितली. 'हॅ! यात एवढं काय्ये शिकवण्यासारखं?' असं वाटलंच, खोटं कशाला बोला! तर ते प्रकरण तितपतच राहिलं. नंतर कंटाळा आला बघायचा. समहाऊ पसारा म्हणण्याइतक्या, वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या चीजवस्तू माझ्याकडे नसतील म्हणूनही असेल, पण तिची परत काही कुठल्याच माध्यमात भेट झाली नाही एवढं मात्र खरं.
यापूर्वीच मी युद्धपटांवर एक धागा काढलेला आहे. त्यात फक्त चित्रपट, सिरीज आणि डॉक्युमेंट्रीज होत्या. इथे आपण दुसऱ्या महायुद्धावर आधारीत पुस्तकांवर चर्चा करुया...
शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं?
अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला?
आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं?
आफ्रिकेतले देश इतके गरीब का?
चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे?
"एप्रिल महिन्यात, ओक्लाहोमातील लांब लांब पसरलेल्या कुरणांवर लहान लहान फुलं उगवतात. त्यांच्या पाकळ्या कुरणांना अश्या व्यापून टाकतात की जणू देवाने फुलं उधळली आहेत असे वाटते. मे महिन्यात, अजस्त्र चंद्राखाली कायोटी आरोळ्या मारतात, आणि मोठी रोपं झपाट्याने कुरणं काबीज करतात, लहान फुलांकडून पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतात, आणि बघता बघता फुलं मरतात. त्यामुळे मे महिन्याला तिथले मूलनिवासी ओसेज लोक फुलं मारणाऱ्या चंद्राचा महिना म्हणतात."