तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.
आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.
दि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:
प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.
काही मुद्दे:
१) यापुर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.
आज माझ्या भारतातील कुटुंबीयानी या उपक्रमाबद्दल आणि त्यांच्या वैयक्तीक सुरक्षीततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उपक्रम चांगलाच आहे याबद्दल त्यांची खात्री आहे. परंतू याचा गैरवापर करून कुणी काही लिहिले, किंवा गैरवापर न करता सत्य तेच लिहिले तरी त्याचे पडसाद त्यांच्यावर उमटतील अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात प्रसिद्धीमाध्यमांवर होणारे हल्ले पाहता त्यांची भिती अगदीच अनाठायी नाही.
१९४९ साली बाबांनी आनंदवनाची स्थापना केली. आज आनंदवनात उपचार सुरू असलेले व बरे झालेले ३००० कुष्ठरुग्ण व २००० अपंग, मूकबधिर, अंध व आदिवासी राहतात. मूकबधिर, अंध यांसाठी निवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालयं, कृत्रिम अवयव केंद्र आनंदवनात आहेत. आनंदवनातला प्रत्येकजण स्वत: श्रम करून आपली उपजीविका करतो. आनंदवनात पॉवरलुम्स, छापखाने आहेत. सुतारकाम, फॅब्रिकेशन, हस्तव्यवसाय यांत पारंगत असलेले अनेकजण इथे कपडे, स्टेशनरी, कपाटं तयार करतात. मीठ, साखर, अमृत अशा काही गोष्टी सोडता बहुतेक सर्व वस्तू आनंदवनातच निर्माण केल्या जातात. आनंदवनातली प्रत्येक इमारत तिथल्या रहिवाशांनीच बांधली आहे.