समाज

श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची

Submitted by चिनूक्स on 14 December, 2009 - 13:44

तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काल शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालु असताना म्हणालो तसे ही मुलाखत इथे लिंक मध्ये देत आहे!

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली. सोबत तिचे टेक्स्ट पण दिलेले आहे.

http://www.abc.net.au/tv/elders/transcripts/s2757468.htm

प्रकार: 

भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.

विषय: 
शब्दखुणा: 

'निर्माण' चे शिबीर- नाशिक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

प्रिय स्‍नेहीजनहो,
निर्माणचं स्‍थानिक शिबीर नाशिक येथे होत आहे. त्‍यासंबंधीचं
पत्र पाठवत आहे.
आपल्‍या युवा मित्र-मैत्रिणींना सहभागी होण्‍यासाठी
या पत्राचा निश्चितच उपयोग होइल.
--
Regards,
NIRMAN
Maharashtra Knowledge Corporation Limited
412-C, MS IHMCT Building|Shivajinagar, Pune. 411016
Contact No: (020)25661317/18(O)
Website: www.mkcl.org

nirmaan_shibir.pdf (102.5 KB)

प्रकार: 

मोठा नेता कसा निर्माण होतो?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एखादा व्यक्तीला नेता व्हावे असे वाटले म्हणुन, तो नेता होत नाही! पण परिस्थिती जर अनुकुल असेल तर कुणीही सोम्या गोम्या अचानक नेता होउ शकतो. भारतीय राजकारणात, आघाडी/युती/अपक्ष ह्यांच्या काळात, असे अनेक लोक नेतेपदी विराजमान झाले, कि ज्यांची ते पद सांभाळण्याची अभ्यास/ कुवत/ लायकी नव्हती.

प्रकार: 

शिक्षण विभाग

Submitted by चंपक on 25 November, 2009 - 20:43

दि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:
प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.

काही मुद्दे:

१) यापुर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.

लाल बटण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अनेकदा एखादी चांगली गोष्ट अनुभवली किंवा वाचली की ती अनेक रुपांनी मनात पिंगा घालते. 'ग्लास बीड गेम' प्रमाणे त्या गोष्टीचे वेगवेगळे दुवे सर्वत्र दिसु लागतात. काही दिवसांपुर्वी TED वर Rory Sutherland यांचे Life lessons from an ad man हे talk ऐकले:
http://www.ted.com/talks/lang/eng/rory_sutherland_life_lessons_from_an_a...

प्रकार: 

भारतातील भ्रष्टाचार - अमेरिकन चश्म्यातून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

विमानाचे दरवाजे उघडले आणि एक ओळखीचा वास नाकात शिरला. मुंबई विमानतळावर, विशेषतः तुम्ही परदेशात वास्तव्य करुन येत असाल तर हा वास लगेच जाणवतो. इमिग्रेशन, स्वाईन फ्लू तपासणी, कस्टम्स वगैरे सोपस्कार पार पडले आणि टॅक्सी पकडण्यासाठीच्या खिडकीवर येऊन थडकलो. एक व्यवस्थित दागिने घातलेल्या जाडेलशा बाईंनी २४१२ हा टॅक्सीचा नंबर सांगितला आणि हातात एक रसीद दिली.

विषय: 
प्रकार: 

ग्रूपचे अस्तित्व आणि भविष्य

Submitted by webmaster on 22 November, 2009 - 00:27

आज माझ्या भारतातील कुटुंबीयानी या उपक्रमाबद्दल आणि त्यांच्या वैयक्तीक सुरक्षीततेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उपक्रम चांगलाच आहे याबद्दल त्यांची खात्री आहे. परंतू याचा गैरवापर करून कुणी काही लिहिले, किंवा गैरवापर न करता सत्य तेच लिहिले तरी त्याचे पडसाद त्यांच्यावर उमटतील अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात प्रसिद्धीमाध्यमांवर होणारे हल्ले पाहता त्यांची भिती अगदीच अनाठायी नाही.

आनंदवनातील दुष्काळ

Submitted by चिनूक्स on 19 November, 2009 - 14:04

१९४९ साली बाबांनी आनंदवनाची स्थापना केली. आज आनंदवनात उपचार सुरू असलेले व बरे झालेले ३००० कुष्ठरुग्ण व २००० अपंग, मूकबधिर, अंध व आदिवासी राहतात. मूकबधिर, अंध यांसाठी निवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालयं, कृत्रिम अवयव केंद्र आनंदवनात आहेत. आनंदवनातला प्रत्येकजण स्वत: श्रम करून आपली उपजीविका करतो. आनंदवनात पॉवरलुम्स, छापखाने आहेत. सुतारकाम, फॅब्रिकेशन, हस्तव्यवसाय यांत पारंगत असलेले अनेकजण इथे कपडे, स्टेशनरी, कपाटं तयार करतात. मीठ, साखर, अमृत अशा काही गोष्टी सोडता बहुतेक सर्व वस्तू आनंदवनातच निर्माण केल्या जातात. आनंदवनातली प्रत्येक इमारत तिथल्या रहिवाशांनीच बांधली आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - समाज