मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.
हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
गुरगाव
दोन दिवस झाले गुरगावमधे येवून पण एवढे महाग शहर मी कधी बघीतल्याचे आठवत नाही.मध्यम वर्गीय माणूस नावाचा प्राणी येथे अस्तीत्वात आहे की नाही इतपत शंका येण्याइतपत महाग्.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवाची मन:शांती हळूहळू हरवताना दिसते आहे. जीवन जगताना कराव्या लागणा-या अनंत कसरतींमुळे आणि आसपासच्या अशांत, असुरक्षित परिस्थितीमुळे आपले मानसिक स्वास्थ्य कमी होते आहे. अशा वेळेस मनःशांती साठी माणूस स्वतःला कोठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतो.मग कधी एखाद्या व्यक्तीवर, कधी एखाद्या तत्वावर, कधी एखाद्याधर्मावर, कधी एखाद्या स्थानावर, आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न व्यक्ती करते. आणि व्यक्तीपरत्वे हे श्रद्धास्थान वेगवेगळे असते. मनातली अशांतता, अस्थिरता, असुरक्षितता दूर करण्यासाठी ही श्रद्धास्थाने व्यक्ती जवळ करत असते.