समाज

लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील?

विषय: 

पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm

मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...

माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.

प्रकार: 

परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं

श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची

Submitted by चिनूक्स on 14 December, 2009 - 13:44

तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काल शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालु असताना म्हणालो तसे ही मुलाखत इथे लिंक मध्ये देत आहे!

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली. सोबत तिचे टेक्स्ट पण दिलेले आहे.

http://www.abc.net.au/tv/elders/transcripts/s2757468.htm

प्रकार: 

भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.

विषय: 
शब्दखुणा: 

'निर्माण' चे शिबीर- नाशिक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

प्रिय स्‍नेहीजनहो,
निर्माणचं स्‍थानिक शिबीर नाशिक येथे होत आहे. त्‍यासंबंधीचं
पत्र पाठवत आहे.
आपल्‍या युवा मित्र-मैत्रिणींना सहभागी होण्‍यासाठी
या पत्राचा निश्चितच उपयोग होइल.
--
Regards,
NIRMAN
Maharashtra Knowledge Corporation Limited
412-C, MS IHMCT Building|Shivajinagar, Pune. 411016
Contact No: (020)25661317/18(O)
Website: www.mkcl.org

nirmaan_shibir.pdf (102.5 KB)

प्रकार: 

मोठा नेता कसा निर्माण होतो?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

एखादा व्यक्तीला नेता व्हावे असे वाटले म्हणुन, तो नेता होत नाही! पण परिस्थिती जर अनुकुल असेल तर कुणीही सोम्या गोम्या अचानक नेता होउ शकतो. भारतीय राजकारणात, आघाडी/युती/अपक्ष ह्यांच्या काळात, असे अनेक लोक नेतेपदी विराजमान झाले, कि ज्यांची ते पद सांभाळण्याची अभ्यास/ कुवत/ लायकी नव्हती.

प्रकार: 

शिक्षण विभाग

Submitted by चंपक on 25 November, 2009 - 20:43

दि. २५ डिसेंबर च्या मंत्रिमडळ बैठकीमध्ये:
प्राथमिक शिक्षण याचा अर्थ इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंत दिले जाणारे शिक्षण असा होय. असे स्पष्ट करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली.

काही मुद्दे:

१) यापुर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे अन मोफत असे धोरण ठरवलले आहे. त्यात प्रामुख्याने पहिली ते चौथी असे वर्ग गृहित धरलेले आहेत. यापुढे शाळांना अनुदान/मान्यता देताना या निर्णयाचे होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत.

Pages

Subscribe to RSS - समाज