समाज

उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या जयंती निमित्य जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.

"जिजाऊ जयंती" निमित्य आणि "राष्ट्रीय युवक दिन" निमित्य हार्दिक शुभेच्छा, आणि सर्व युवकांना जिजाऊ.कॉम तर्फे एक आवाहन

हि एक मनापासून घातलेली साद आहे आपला थोडा वेळ हे वाचण्यासाठी द्यावा. मला खात्री आहे आपल्यातला मराठी माणूस जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच ह्याची मदत होईल.

प्रकार: 

बारोमास

Submitted by चंपक on 12 January, 2010 - 16:56

आजच श्री सदानंद देशमुख लिखीत 'बारोमास' कादंबरी वाचली.

दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे डिस्टर्ब झालो. हे सगळं अगदी माझ्या अवती भवती घडतेय असे वाटले..माझ्या ही गावात काही घतना झाल्याच होत्या... ती कुटुंब पुन्हा डोळ्यासमोर आली..
संवेदनशील माणसानं कधीही वाचु नये अशी ही कथा! Sad

इडा पिडा टळो
बळी चे राज्य येओ!

शब्दखुणा: 

परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

-क्रांत

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

Your kiss leaves something to be desired. The rest of you.

हे वाक्य कोणी कोणत्या संदर्भात म्हंटले होते कल्पना नाही, पण पुस्तकांमधील उतार्यांना - चांगल्या पुस्तकांमधील चांगल्या उतार्यांना - नक्कीच लागु पडेल. कुठेतरी एखादा चांगला उतारा वाचला तर तो एखाद्या मीम ( meme) प्रमाणे काम करतो. डोक्यात तर बसतोच, पण तो ज्या पुस्तकातुन आला ते वाचायची पण इच्छा होते. आणि त्या लेखिकेची इतर पुस्तके सुद्धा. इतरांना सांगायची आणि ती चांगली गोष्ट इतरांपर्यंत पसरवायची पण इच्छा होते. झाला तर यामुळे लेखकांना व प्रकाशकांना फायदाच होईल.

प्रकार: 

लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी

Submitted by सिद्धा on 6 January, 2010 - 21:01

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील?

विषय: 

पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm

मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...

माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.

प्रकार: 

परतोनि पाहे (परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव)

Submitted by रैना on 5 January, 2010 - 01:52

इथे खालील मुद्यांवर चर्चा / अनुभव अपेक्षीत आहे. शक्यतो उपदेशापेक्षा (काय करायला हवं वगैरेंचे डोस) अनुभव लिहा. आपण विचारांती काय निर्णय घेतला, का घेतला आणि तो कसा निभावतो आहोत.

- तुम्ही भारतात का परतलात, परतावसं का वाटलं (नक्की प्राण का तळमळला?) परतल्यावर आता कसं वाटतय ? (व्यक्तिगत बरेवाईट अनुभव, ठेचा, विचारमंथन).
-- तळ्यात मळ्यात- परतावसं वाटतय, हिम्मत होत नाही? दोलायमान परिस्थिती आहे? नवराबायकोपैकी एक अत्यंत नाखुष आहे ?
- परततानाची चेकलिस्ट ( काय करावे आणि करु नये)
- केल्याने देशाटन परदेशात काय मिळवलं, काय गमावलं

श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची

Submitted by चिनूक्स on 14 December, 2009 - 13:44

तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

Pages

Subscribe to RSS - समाज