दहशतवाद

सर्जिकल स्ट्राईक

Submitted by खुशी२२२२ on 30 April, 2019 - 03:06

हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा तळतळाट,
शांत झाला पाहून 'जैश'चा नायनाट.

का पाकिस्तान हे नेहमी विसरतो ?
इथे एकासाठी देश पेटून उठतो.

त्यांना म्हणावं भारताला कमी समजण्याची चूक जेव्हा केली ,
तुमच्या अस्ताला तेव्हाच सुरुवात झाली .

ओल्या डोळ्यांमध्ये आता आनंद फुलत आहे ,
पाप्या तुझी घटका आता भरत आहे .

घाबरू नका हि तर नांदी फक्त अस्ताची ,
तुमच्यासाठी आजपासून प्रत्येक रात्र वैऱ्याची .

चाळीसाशी तीनशे , असले जरि हे व्यस्त प्रमाण ,
नवनिर्मित सक्षम भारताच्या शक्तीचे हे प्रमाण

विषय: 

न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

Submitted by इस्पीकचा एक्का on 20 December, 2014 - 09:04

जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते.

तरीही अशी कृती केली जात नाही. ते का?

विषय: 

माणुसकीचा येता गहिवर

Submitted by कोकणस्थ on 19 December, 2014 - 21:29

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा

१९९३ ते २०१३

Submitted by अनुराधा म्हापणकर on 12 March, 2013 - 04:48

१९९३ ते २०१३
===========

वीस वर्ष झाली सिरियल ब्लास्टला
त्यानंतर ही हल्ल्यांची सिरियल थांबली नाही.
कधी ट्रेन, कधी बस, स्कूटर, कधी टॆक्सी
अगदी पंचतारांकित वास्तूही त्यांनी सोडली नाही

तुटत मोडत विस्कळत राहिली मुंबई
रक्ताने माखलेली जळत राहिली मुंबई
पुन्हा जखमांनी भळभळत राहिली मुंबई 
तरी पुन्हा उभी राहून पळत राहिली मुंबई 

मुंबईला ओरबाडताना 
तिच्या दु:खाला गाडताना 
तिच्या जनतेला नाडताना 
तिची वसने फाडताना 
कुणा नेत्याचे हात नाही कचरले
फुंकर घालत तिला कुणी नाही विचारले 
की कुणा नेत्याच्या अंगी नाही संचारले 

मुंबई पोसत राहिली

दहशतवाद : मी काय करणं अपेक्षित आहे?

Submitted by गजानन on 14 July, 2011 - 02:56

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातली/देशातली ही परिस्थिती सुधारून असे हल्ले टाळण्यासाठी एक नागरिक म्हणून तुमच्या मते 'मी' काय करणं अपेक्षित आहे?

'मी' म्हणजे भारत देशातला एक सामान्य नागरिक.

कविता करणं
ललित/लेख लिहिणं
शासनाला दोष देणं
चरफडत बसणं
मिडियाला शिव्या देणं

या व्यतिरिक्त.

मला प्रामाणिकपणे हे जाणून घ्यायचे आहे.

विषय: 

षंढ ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 December, 2010 - 23:59

सामर्थ्याचे बदलते परिमाण...
अन् संस्कृतीचे षंढ संदर्भ...
कसाब, अफजल...
तथाकथित उदात्त संस्कृती...(?)

सत्ता, सामर्थ्य ....
दहशतवादाचे राजकारण...
अन् सहिष्णुतेच्या ओझ्याखाली दबलेले...
कोवळ्या मानवतेचे निरागस, निष्प्राण गर्भ !

हम्म्म्म....
सांत्वनाच्या अगतिक.., क्षीण मेणबत्त्या....
आणि गंगातीरावर उसळलेले आगीचे कल्लोळ...
एके ५६, आर. डी.एक्स. अन् बरबटलेली मने..,
निषेधाचे खलिते, संयमाचे (?) नियम अन सौहार्दाचे थोतांड....

कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...

आपण दुसरे करणार तरी काय....

गुलमोहर: 

आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 November, 2010 - 00:20

२६/११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी, हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य, शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे. त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य, आपली एकजुट दाखवुन देणार्‍या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली !

"हुतात्मा हेमंतजी करकरे, हुतात्मा विजय साळसकरसाहेब आणि हुतात्मा अशोकजी कामटे"

गुलमोहर: 

भारतीय लोकशाही प्रगल्भ होईल काय?

Submitted by अस्मादिक on 18 November, 2010 - 12:59

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण दिवस निर्जला उपवास करून पुढील २-३ दिवस हा लेख मी लिहीत होतो...

गुलमोहर: 

बस्स..., बहोत हो गया भिडू....!

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 September, 2010 - 01:39

आत असताना कधीकधी...
फारच एकटेपणा जाणवायचा
मग माझी चुळबुळ सुरू व्हायची
नेमका त्याचवेळी तो...
आईच्या पोटाला कान लावायचा...
ती उब जाणवून मी म्हणायचो...
बाबा, खुप एकटं एकटं वाटतय रे...
बाबा हसुन म्हणायचा....

"बाप्पा आहे ना ......!"

आपल्या पायातली ताकद जोखत
जेव्हा पहिलं पाऊल टाकलं...
तेव्हा हातात बाबाचं बोट होतं..
मी दुसरा हात पुढे केला...,
बाबा हसुन म्हणाला...
दोन्ही हात मीच धरले तर...
त्याच्यासाठी काय उरेल?
त्याच्यासाठी...?

"बाप्पा आहे ना....!"

नोकरीसाठी पहिली मुलाखत ...
जाताना आई-बाबाला नमस्कार केला
आता पण असेल का रे बाप्पा सवे?
बाबा हसला, हसुन म्हणाला...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - दहशतवाद