संस्कृती

केंद्रिय कोळसा मंत्री यांचे खेदजनक वक्तव्य

Submitted by डॉ. बंडोपंत on 3 October, 2012 - 03:03

केंद्रिय कोळसा मंत्री श्री प्रकाश जयस्वाल यांनी एका कार्यक्र्मा प्रसंगी महिलांविषयी काढलेले उद्गाराचा निषेध करण्यात येत आहे त्यांनी असे म्हटले आहे की महिला ह्या लंग्नानंतर जुन्या होतात अशाने मजा जाते. असे वक्तव्य निश्चितच अशोभनिय आहे.

शब्दखुणा: 

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा

Submitted by भारती.. on 28 September, 2012 - 07:16

http://www.maayboli.com/node/38112

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा

१. शोकमग्न अर्जुनाची श्रीकृष्णांनी केलेली कानउघाडणी

शस्त्र त्यागून रथाखाली उडी मारून अश्रूपात करणारा महाधनुर्धर .. दुसर्‍या अध्यायात ज्ञानेश्वरांना ऐन युद्धभूमीवर घडणारं एक नाट्यपूर्ण विचारमंथन,जे थेट व्यक्ती अन समष्टीच्या अस्तित्वविषयक गूढ गाभ्यापर्यंत जाते, ते कवीच्या कुंचल्याने चितारायचे आहे.

'जैसे *लवण जळे झळंबले | ना तरी अभ्र वाते हाले |
तैसे सधीर परि विरमले | हृदय तयाचे
|| '
(*लवण- मीठ )

अद्भूत

Submitted by एस.व्ही. on 27 September, 2012 - 12:39

अद्भूत
--------------------------------

या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

आरती सप्रेम..!

Submitted by देवचार on 25 September, 2012 - 02:52

"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."

अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या चाळीत हे असले एकेक नग आहेत.

शब्दखुणा: 

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला

Submitted by भारती.. on 23 September, 2012 - 14:43

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय पहिला

१. गीताटीकेच्या प्रारंभी श्रीज्ञानदेवांनी केलेली वंदने आणि वर्णने-

ॐ या परब्रह्मवाचक शुभाक्षराने श्रीज्ञानदेवांनी आपल्या गीताटीकेच्या -भावार्थदीपिकेच्या- प्रारंभीच्या वंदनांना सुरुवात केली आहे. ॐ काराने कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करावयाचा या हेतूबरोबरच ज्याला वंदन करायचे तो आत्म्यातच सामावलेला परमेश्वर ही या मंगलाक्षरातच सामावला असल्याची जाणीवही ज्ञानदेवांनी श्रोत्यांना करून दिली आहे .

ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||

श्रींच्या पूजेसाठी मोबाईल App!

Submitted by प्रसाद शिर on 17 September, 2012 - 08:03

बदलत्या काळानुसार गणेशपूजनासाठी पूजा सांगणारे पुरोहित मिळणे जिकिरीचे होत चालले आहे. याशिवाय, विभक्त कुटुंबांमध्ये अथवा महाराष्ट्राबाहेर रहाणा-या नव्या पिढीला पूजा करायची इच्छा असूनही नेमकी कशी करावी याची माहिती व परंपरागत श्लोक व मंत्र यांचे ज्ञान असतेच असे नाही.

या समस्यांवर मात करण्यासाठी marathiwebsites.com ने 'गणेश पूजा' हे मोबाईल App विकसित केले आहे. या App मदतीने ज्यांना पार्थिव गणेश पूजन करायचे आहे त्यांना ते रहात असतील तेथील उपलब्ध साधन सामुग्रीनुसार करता येईल.

लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

Submitted by डोंगरवेडा on 28 August, 2012 - 00:51

लोणी भापकर- एक लहानसे खेडेगाव, पुण्यापासून साधारण ६५ किमी दूर, मोरगावच्या पुढे जेमतेम ४ मैलांवर. गाव लहानसेच असले तरी मध्ययुगीन कालातली मंदिरे, प्राचीन अवशेष, वाडे हुडे, गढ्या आणि किल्ला असे ऐतिहासिक दृष्ट्या कमालीचे परिपूर्ण.

विषय १: एक अतूट नातं - सिनेमाचं

Submitted by सशल on 27 August, 2012 - 18:50

"सिनेमाशी तुझं नातं काय"? असा प्रश्न जर कोणी भारतीय माणसाला विचारला तर मला वाटतंय कमी-अधिक फरकाने "आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुख-दु:ख वाटून घेणारा एक सच्चा मित्र" असंच उत्तर मिळेल. मीही ह्याला अपवाद नाही. ओळख झाली तेव्हापासून अगदी मनापासून भरभरून प्रेम केलेलं आणि दोन्हीकडच्या अपेक्षांचा ताळमेळ साधण्यात कुठेच कसर न राहिलेलं हे एकमेव नातं. अर्थात सिनेमा म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती नसली तरी एक सच्च्या मित्राचं जे स्थान आपल्या आयुष्यात असतं तेच सिनेमाचंही आहे.

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

Submitted by ज्योति_कामत on 25 August, 2012 - 12:21

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

Pages

Subscribe to RSS - संस्कृती