*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
एकेकाळी पेन्शनरांचं गाव आणि विद्येचं माहेरघर म्हणून सर्वपरिचित असलेल्या पुणे नावाच्या छोट्याशा टुमदार शहराने पानशेतच्या जलप्रलयानंतर कात टाकली आणि केवळ ५० वर्षांत देशातलं एक अग्रगण्य शहर, माहिती तंत्रज्ञान - विविध उद्योग - शिक्षण इ. चे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आघाडीचं स्थान पटकावलं हा इतिहास अगदी आत्ताचा. तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचा. पण याआधीही पुण्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत फक्त या इतिहासाचाच नव्हे तर प्राचीन व अर्वाचीन पर्यावरण, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली शिक्षण आणि संशोधनपरंपरा, कला, साहित्य यांची परंपरा अशा कितितरी गोष्टींचा यात समावेश आहे.
विद्रोह आणि विवेक या पुस्तकाला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे. तिचा जालनिर्देश येणेप्रमाणे :
http://www.maayboli.com/node/25475
ही प्रस्तावना वाचतांना काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. त्या जमतील तशा रीतीने खाली मुद्यांत मांडल्या आहेत. यावर विचारमंथन सुरु व्हावे अशी इच्छा आहे. संपूर्ण पुस्तक मी वाचलेले नाही. केवळ उपरोल्लेखित दुव्यातील लेख (=प्रस्तावना + जाणता राजा) वाचला आहे.
१.
>शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्वच सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या >समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता.
या लोकसमूहाच्या (=लो१) नेत्यांची नावं मिळतील काय?
२.
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
1. लिंबू आणि मिरची
2. काळी बाहुली
3. पायताण उर्फ चप्पल
4. इतर, कोळसा इ.
यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?
भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.
हिंदी सिनेमांमधलं, अनेक पिढ्या बिदाई, घुंगट आणि पतीपरमेश्वर याच्या आसपासच घोटाळत राहिलेलं लग्न नव्या, तरुण दिग्दर्शकांच्या सिनेमांमधून बर्यापैकी ताजा आणि मोकळा श्वास घ्यायला लागलं. पती-पत्नी नात्यांमधल्या ताण तणावांना न बिचकता, थेट हाताळण्याचं धाडस करण्याचा प्रयत्न यांपैकी अनेकांनी केला. झाडांभोवती फिरत रोमान्स करणारे हिंदी सिनेमांमधले नायक नायिका अशा प्रयत्नांमुळे जरा वैचारिक दृष्ट्या मॅच्युअर्ड वाटायला लागले आणि नशिबाने असे प्रयत्न समजुन घेणार्या मॅच्युअर्ड प्रेक्षकांची साथही त्यांना मिळाली.
गेले काही दिवस बर्याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.
१. विषमज्वर- टायफाइड
२. आतड्याचा अॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.
३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.
महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?
"लग्न"-१ इथे.
हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.