शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१२! सकाळी पावणे सातची वेळ. ९१९८१८८११२४९ या अनोळखी नंबरवरून मोबाईल घणाणला. मी आणि माझी पत्नी - अनुराधा दोघेही व्यावसायिक असल्याने असा अवेळी फोन आला तर आम्ही अनिच्छेनेच उचलतो; आणि अ-महत्वाच्या कारणासाठी फोन असेल तर त्या व्यक्तीला जाम झापतो. तसाच तो उचलला. अनुराधा त्या व्यक्तीशी बोलू लागली. "आप कौन बोल रहे हैं? कहांसे?" त्या व्यक्तीने काय उत्तर दिले ते ठाऊक नाही, पण लगेच अनुराधा चित्कारली, "ओह माय गॉड!! मैं अभी उसको बताती हूँ!" त्या व्यक्तीने परत काही उत्तर दिले. "क्या? उसका फोन भी उधर ही है? मैं कुछ करती हूँ!!"
सलून मधे खुर्चीवर जाऊन बसलो, "मिडियम", आणि भांग कोठून पाडायचा हे सांगून झाले, सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली, आणि मी आता वेळ कसा घालवावा विचार करू लागलो. भिंतीवरच्या फ्रेम्समधल्या हेअरस्टाईल्स आधीच बघून झाल्या होत्या. त्यातील एकही गेल्या दहाबारा वर्षातली दिसत नाही याचेही नावीन्य नव्हते. तेथे बसल्यावर तो घोस्ट वर्ल्ड का कशातील संवाद नेहमी आठवतो "The 80s have called and they want their hairstyle back". काही सलून्स मधे आरशात उलटा का होईना पण टीव्हीतरी दिसतो. येथे ते ही नव्हते. इतरही काही टाईमपास नव्हता.
शमी ही श्री गणेशाची लाडकी वनस्पती. अज्ञातवासात पांडवांची शस्त्रे वर्षभर शमी वृक्षावर विसावली होती. याच शस्त्रांनी पुढे अन्याय - अधर्माचा नाश केला. म्हणून शमीचं महत्त्व आणखीनच वाढलं.
निरपेक्षपणे ज्ञानदान करणारे वरतंतू ऋषी, गुरुदक्षिणेचा आग्रह धरणारा त्यांचा शिष्य कौत्स, कौत्साच्या ज्ञानाचा गौरव करण्यासाठी कुबेराला आव्हान देणारा रघुराजा, रघूच्या पराक्रमाला मान देऊन सुवर्णमोहरांचा वर्षाव करणारा कुबेर, आपल्याला हव्या तेवढ्याच मोहरा घेणारा कौत्स, शिल्लक मोहरा लुटून टाकणारा दानशूर रघु, या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे आपट्याचा वृक्ष. याच वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पडला होता.
पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.
मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.
हे ते आमचे गोड बाळ...

वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.
केंद्रिय कोळसा मंत्री श्री प्रकाश जयस्वाल यांनी एका कार्यक्र्मा प्रसंगी महिलांविषयी काढलेले उद्गाराचा निषेध करण्यात येत आहे त्यांनी असे म्हटले आहे की महिला ह्या लंग्नानंतर जुन्या होतात अशाने मजा जाते. असे वक्तव्य निश्चितच अशोभनिय आहे.
प्रचि १ : सुरवात हरतालकेच्या पुजेने..

प्रचि २:

http://www.maayboli.com/node/38112
ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- एक परिचय : अध्याय दुसरा
१. शोकमग्न अर्जुनाची श्रीकृष्णांनी केलेली कानउघाडणी
शस्त्र त्यागून रथाखाली उडी मारून अश्रूपात करणारा महाधनुर्धर .. दुसर्या अध्यायात ज्ञानेश्वरांना ऐन युद्धभूमीवर घडणारं एक नाट्यपूर्ण विचारमंथन,जे थेट व्यक्ती अन समष्टीच्या अस्तित्वविषयक गूढ गाभ्यापर्यंत जाते, ते कवीच्या कुंचल्याने चितारायचे आहे.
'जैसे *लवण जळे झळंबले | ना तरी अभ्र वाते हाले |
तैसे सधीर परि विरमले | हृदय तयाचे || '
(*लवण- मीठ )
अद्भूत
--------------------------------
या भूतलावर काही गुढ रहस्य असते का? शाश्वत - अशाश्वतामध्ये काहीतरी सत्य दडले आहे असे म्हणतात. देव जाणे! पण खरेतर मानवी आयुष्य एक अगम्या गूढ आहे असेही कधी कधी वाटते. खरे खोटे देव जाणे! हा जाणता देव तरी कोण आहे की एका मायावी शक्तीलाच आपण पुर्वग्रहानुसार 'देव' असं संबोधतो? देव जाणे! काही असो....
पण मला वाटते तसेच कोणाला काही अद्भूत सापडेल तर इथे सांगावे ====>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."
अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या चाळीत हे असले एकेक नग आहेत.