चित्रपट

योद्धा

Submitted by पायस on 17 May, 2025 - 06:47

बॉलिवूडने आपल्याला अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत, कैक चांगले चित्रपट दिले आहेत, आणि अगणित अस्तित्ववादी कलाकृतिही (ज्या अस्तित्वातच का आहेत?) दिल्या आहेत. एवढी व्हरायटी असूनही शास्त्रार्थ करण्याच्या भानगडीत कोअर बॉलिवूड सहसा पडत नाही, तो समांतर वाल्यांचा प्रांत.
पण अधून मधून बॉलिवूडमधले कुमारिल भट्ट जागे होतात, त्यांना शास्त्रार्थ करायची लहर येते आणि त्यातून महान कलाकृति जन्माला येतात. मग अगम्य तत्वज्ञानात शोभतील असे मूळ संकल्पनांना छेद देणारे प्रश्न विचारले जातात.

विषय: 

गुलकंद ( मराठी चित्रपट)

Submitted by छन्दिफन्दि on 14 May, 2025 - 14:46

गुलकंद ..
नावातच केवढा गोडवा! चित्रपटही एकदम झकास - अगदी पोट धरून हसवणारा, कधी किंचित हळव करत नेणारा..

सई आणि समीर च्या मुलीचं तिने स्वतःच लग्न ठरलेलं असतं. तर भेटायला ते पाहुणे येणार असतात. अर्थात त्या मुलाचे वडील म्हणजे प्रसारक ओक आणि आई इशा डे. प्रसाद ओक सई ताम्हणकर चा पूर्वाश्रमीचा प्रियकर.. प्रसाद तिला लग्नाचा विचारणार असतो पण काहीतरी घटना घडतात आणि समावेश त्याला तडकाफडकी शहर सोडून त्यावेळी जायला लागतं. आता 25 वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले की काय होणार मग त्यांचे कुटुंबीय त्यावर कसे रिऍक्ट होणार लग्नाचं काय होणार वगैरे वगैरे सगळी गंमत म्हणजे तयार झालेला हा गुलकंद.

Court, State Vs a Nobody

Submitted by हरिभरि on 22 April, 2025 - 01:06

खूप दिवस झाले काही तरी लिहून. तस लिहाव सांगाव अस खूप काही साचलेलं असूनही लिहायला निवांत असा वेळ मिळत न्हावता. पण आज मी एक असा चित्रपट पहिला की सगळी कामे बाजूला ठेऊन मला त्याच्या बद्दल लिहावच लागल.

शब्दखुणा: 

जानी दुश्मन - अनेक लग्नांची एक गोष्ट (संपूर्ण)

Submitted by rmd on 25 March, 2025 - 22:54

हम आपके है कौन ही एका लग्नाची कॅसेट असेल तर जानी दुश्मन ही अनेक लग्नांची कॅसेट आहे. यात किमान ८ लग्नं आहेत. फरक इतकाच की हआहैकौ मधे एकाच लग्नात खूप गाणी वाजतात आणि इथे एकच गाणं सगळ्या लग्नांत. शिवाय हा चित्रपट स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून गेला असून यात पॅरलल युनिव्हर्सची संकल्पना पण मांडली गेली आहे. राजकुमार कोहलीला आद्य सायफाय मूव्हीमेकर असं सर्टिफिकेट मिळावं याची मी शिफारस करते.

विषय: 

काही सिनेमा नोंदी

Submitted by संप्रति१ on 23 March, 2025 - 02:29

. 'April '. जॉर्जिया.
एक गायनॅकोलॉजिस्ट आहे. डिलीव्हरीच्या दरम्यान एका बाळाचा मृत्यू होतो. हॉस्पिटलकडून हिच्यावर चौकशी कमिटी बसते. या चौकशीच्या सेशन्सच्या वेळी मागं सतत घड्याळाची तणावपूर्ण टिकटिक ! ती टिकटिक काढून टाकली असती तर या सेशन्स दरम्यानचा निम्मा इंपॅक्ट कोसळला असता. ही चौकशी एका बाजूला चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचं तिचं आयुष्य चाललेलं आहे.

शब्दखुणा: 

चित्र(वि)चित्र बकेट लिस्ट

Submitted by रानभुली on 16 March, 2025 - 01:02

डोळे मिटण्याआधी (जग बघून घ्यावंच्या चालीवर) आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलेले, वाचलेले सिनेमे युट्यूब आणि ओटीटीच्या कृपेने बघून घ्यायचे आहेत. ( तो सर्वोत्कृष्ट किंवा कलात्मकच असला पाहीजे असं अजिबात नाही. )
आयुष्यात अमूक तमूक गाजलेला पिक्चर पाहिलाच नाही असं व्हायला नको. ( पुस्तकप्रेमी अशी यादी बनवत असतात).
त्या त्या वर्षी / दशकात गाजलेल्या सिनेमांची अशी यादी बनवायला घेऊयात. इथे काही नावे आठवतील तशी दिली आहेत. प्रतिसादात भर घालावी.
( लगेचच बघितले का अशी चौकशी करू नये. ही यादी आहे फक्त. आपण रेसिपी लिहून घेतो पण सगळ्या बनवत नाही तशी)
१. प्यासा

विषय: 

प्रितम आन मिलो

Submitted by meghdhara on 17 February, 2025 - 21:48

प्रितम आन मिलो

.. बहाद्दूरचं एक मन सांगतं ' नको , तुला माहितेय त्यात काय आहे .. ' दुसरं , 'एकच एकच ' म्हणत असतं . शेवटी पहिलं मन .. ' जा आणि मर !' म्हणत दुसर्या मनाचा नाद सोडुन देतं . म्युजिक सुरु होतं .

विषय: 
शब्दखुणा: 

छावा!

Submitted by छन्दिफन्दि on 17 February, 2025 - 09:04

बुऱ्हाणपूरच्या हल्ल्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. अतिशय वेगवान असा हा चित्रपट अनेक घटनांना, मुद्द्यांना स्पर्श करत अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाशवी हत्येने समाप्त होतो.
क्रौर्याची परिसीमा गाठकलेला औरंगजेब त्यांना मुसलमान बनण्याची ऑफर देतो, तेव्हा अंगाखांद्यावर केलेल्या नखशिखान्त जखमा, त्या जखमांवर मीठ चोळल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना, उपटलेली नखं या अवस्थेतही संभाजी राजे त्याला जे उत्तर देतात त्याने औरंगजेब सटपटतो. संभाजी राजांचे धैर्य, पराक्रम आणि शौर्य अचंबित करून टाकते आणि चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रपटाचा शेवट तुम्हाला कसा आवडेल?

Submitted by rmd on 16 February, 2025 - 23:59

बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?

विषय: 

आसमान से ऊंचा

Submitted by पायस on 13 February, 2025 - 16:22

मुलाखतकार: सुजितजी चित्रपटाचे निर्माते या भूमिकेतून आमच्या वाचकांना काय सांगाल?

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट