संस्कृती

वैश्वदेव म्हणजे काय?

Submitted by जागोमोहनप्यारे on 21 October, 2011 - 13:03

वैश्वदेव करणे म्हणजे काय? वैश्वदेव न करणार्‍या लोकांचा ( ब्राह्मणांचा) अनेक साधुसंतानी धिक्कार केला आहे, ते कसे करावे, कुणी, कुठे करावे? त्याने नेमके काय साध्य होते? ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख येतो, ते हेच का?

शब्दखुणा: 

लक्ष्मी अन अवदसा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

प्रकार: 

गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 05:30

'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!

तुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय?

भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

भारता तील पान वीडा खाण्याची संस्क्रुती

Submitted by विवेक नाईक on 8 October, 2011 - 13:11

आपल्या सर्व संस्क्रुती मध्ये पानाला, वीड्याला विषेश महत्व दिलेल आहे. का ?

भारतात सर्व सार्वजनीक स्थानावर, ठीकाणी पानांची रंग रंगोटी बघुन तुम्हाला काय वाट्ते ?

शब्दखुणा: 

माहिती हवी आहे : सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळाचे नाव

Submitted by गजानन on 3 October, 2011 - 11:01

नमस्कार,

मला खालील खालील धर्मांची [सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र , प्रार्थनास्थळाचे नाव] ही माहिती हवी आहे. कृपया माहीत असल्यास लिहा / चुकीचे असल्यास दुरुस्त करा. धन्यवाद.

जैन :
सण : पर्युषण
धार्मिक ग्रंथ : आगम
तीर्थक्षेत्र : श्रवणबेळगोळ, मांगी-तुंगी, गिरनार, शत्रूंजय (?), पालिताना (?)
प्रार्थनास्थळाचे नाव : मंदिर / बस्ती / देरासर

पारशी :
सण : जमशेद नवरोझ ( न्यू इयर)
धार्मिक ग्रंथ : झेंद अवेस्ता
तीर्थक्षेत्र : ??
प्रार्थनास्थळाचे नाव : अग्यारी

ख्रिश्चन :
सण : नाताळ
धार्मिक ग्रंथ : बायबल
तीर्थक्षेत्र : जेरुसलेम

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

दृष्ट कशी काढावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2011 - 05:54

दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )

संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी Happy ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.

दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 September, 2011 - 04:00

श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

( एवढाच विषय लिहिल्याने सुरुवातीच्या काही प्रतिसादांमध्ये लोकांचा गैर्समज झाला आहे.. हा विषय खरे तर असा आहे.... >> श्राद्धाचे किंवा पक्षाचे जेवण ब्राह्मण किंवा सवाष्ण म्हणून बोलावणे आले तरी जेऊ नये असे म्हणतात ते खरे आहे का? जेवल्यास काय होते?

अर्थात इतर लोकही अशा जेवणाला टाळतातच, त्याबाबतही काही लिहिले तरी हरकत नाही.)

Pages

Subscribe to RSS - संस्कृती