जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले
भिरभिरणारे फूलपाखरू
बघुनी मज गालात हासले
बोलायाचे ठरवले मनी
पण ओठावर शब्द थांबले
हसतमुखाने करुन अलविदा
दुनियेने मज दूर लोटले
पून्हा हिच ती चूक भोवली
आभासाने हृदय धडकले
जीवन मृत्यू , खेळ चालतो
या खेळावर विश्व चालले
जी जी
....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!
स्वप्न!
रात्रीचं जेवण आटोपलं आणि सगळी आवराआवर करून पुष्पा खोलीत आली. मी तिला म्हणालो,
``हे बघ पुष्पा, आता आपल्याला निर्णय घ्यायलाच हवा. पाच-सहा वर्षं झाली प्रतीकला मुंबईला जाऊन. आताश्या फारसं बोलणंही नसतं आपलं. आता आपण हा वाडा विकावा हेच बरं. वाडा विकूया. बँक लोन फेडूया आणि सरळ एखाद्या flat मध्ये राहायला जाऊया. आता आपल्याला flat विकत घेणं परवडणार नाहीच आहे. त्यामुळे पुढची काही वर्षं भाड्यानंच राहू. नंतर पाहू एखादा वृद्धाश्रम. कारण प्रतिक आता पुण्यात परत येईल असंही मला फारसं वाटत नाहीये...``
रुसलेल्या क्षणांना मनवणे,
मलाच जमले नाही...
नशिबापुढे आकाश ठेंगणे,
नशीब जागलेच नाही...
वाटलं देव पावेल,
भाग्य खुलतील...
सुख येतील,
आनंद देतील...
संकटाशी तडजोड,
मलाच जमली नाही...
अपयश्याच्या डोंगरात वळलेली,
वाट दिसलीच नाही...
प्रयत्न केले,
कधीतरी विजय होईल...
त्यातच आयुष्य सरले,
आता फक्त शेवट होईल...
दिवस उगवतात, मावळतात
रात्र सरते...
नवी आशा पल्लवित होते,
पुन्हा अश्रू देते...
सारी उम्र हम मर मर के जी लिऐ एक पल तो अब हमे जिने दो जिने दोओओ.....हे बोल आहे 3 ईडीयट्स मधल्या गाण्याचे,रोज तीच न्युज,पुन्हा तोच शब्द,पुन्हा तेच मन हेलावुन सोडणारे दृष्य,पुन्हा एकदा परीक्षांच्या वाढवल्या जाणार्या तारखा,हे सगळ होत असतांना अवतीभोवती होत जाणार वातावरण आणी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांंची बिकट होत जाणारी मानसिकता,मध्येच असं वाटु लागतं की कदाचित एक दिवस हे सगळ संपेल,भीतीत वावरणाऱ्या या जगात जगण्याची एक उम्मीद पुन्हा मिळेल पण पुन्हा तोच भीतिदायक कानात घुमणारा अँब्युलन्सचा आवाज,पुन्हा तेच ओसाड पडलेले रस्ते,सध्या चालु असलेल्या कोरोना युद्धात शत्रू कोण आणी मित्र कोण हेच विद्यार्थ्या
प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*
*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची
*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे
माझी ना, खूप दिवसांपासूनची तमन्ना(हो, तमन्नाच!) आहे. मस्त निवांत दिवस असावा. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नसावा. सकाळी ११-१२ वाजेपर्यन्त जाग आली तरी लोळत पडून राहावे. मग धांगडधिंगा वाली आधी, नंतर रोमँटिक गाणी लावून माहोल बनवावा. ही गाणी ऐकतच आन्हिकं उरकावी. एक तासभर अंघोळ करावी. महत्वाचं म्हणजे मी घरात एकटी असावी. कांदेपोहे करण्याचा सुद्धा कंटाळा आलेला असावा. मग loose loose comfy कपडे (जे लोकांच्या लेखी जुना -पुराना कळकट, बळकट असतात. एरवी मी घातले तर काय मेलं दरिद्री लक्षण असे तु. क. येतात) अंगावर असूनसुद्धा कसलीही तमा न बाळगता खाली टपरीवर जाऊन इडली सांबार, पोहे वगैरे ऐवज चापावा.
हर एक कोपरा तिथला शोधून पाहीला होता
न जाणे कुठला कचरा काळजात भरला होता
किती उपसला तरीही तळ मला गवसेना
कसला हा डोही माझ्या गाळ साचला होता
कसा चालला श्वास, मी काय हुंगले होते
प्रत्येक भिताडावरती धूर साचला होता
लोक निंदती म्हणूनी कोणी स्वप्न मारले होते
पण हात कसा माझाही लाल माखला होता
ना दिसे मलाही काही जी झापड भाळी धरली
धरणारा हात ही माझा पण अंधार माजला होता
हे कुणी कायदे केले अन् ते कुणी वायदे केले
माझा कसा परस्पर त्यांनी निकाल लावला होता
ग्रीश्म जाळे जरी अन शिशिर गोठवीत आहे;
तुझी याद येता वसंत पालवीत आहे
तुझे स्वप्न उराशी मी कवटाळूनी बसतो;
तुला मिठीत घेण्या ते खुणवीत आहे
किती श्वास झाले मी न मोजदाद केली;
तुझा गंध हरेक श्वास फुलवीत आहे
न माळतो कुणीही रक्त-जास्वंद मोगऱ्याशी;
परि हात माझा तुझ्यात गुम्फवीत आहे
हाच खेळ चाले केवळ माझिया मनाचा;
तुझे अस्तित्व सदैव भासवीत आहे
तू नाहीस मृगजळ जरी जाणतो मी;
हीं तुझी ओढ़ अनंत चालवीत आहे
तुझी वाट बघता मी दररोज येथे;
काल्पनीक चातकाला जगवीत आहे
त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही..
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या
स्वप्नांना
मी आता जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..