१. एक माणूस. समोर एक डॉगेश शेपूट हलवत उभा. माणूस स्टॉलवरून पार्लेचा पुडा घेतो, फोडून फरशीवर पसरतो आणि निघून जातो. डॉगेश त्याच्या मागे मागे थोडं अंतर पळत जातो आणि मिनिटभरानं माघारी येतो. तोवर तिथं दुसऱ्या डॉगेशनं येऊन एक बिस्कीट उचललेलं असतं. दोघांची गुरगुर. बाचाबाची कम् शक्तिप्रदर्शन. डॉगेश नंबर एक धमकावतो की ही माझी बिस्कीटं आहेत. तुझा यावर अधिकार नाही. हे मान्य नसल्यास हो युद्धाला तयार.
आपण आपल्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. तिच्यावर आपण प्रेम करतो. तिला फिरायला नेणे, हॉटेलिंग, सिनेमा, नाटक हे तर असतंच. पण तिच्या मनी ध्यानी नसताना अचानक तिला आवडते त्या रंगाची साडी घेऊन देणे, तिच्यासोबत शॉपिंगला जाणे ही कामं आपण मनापासून करत असतो.
रिओ दि जानेरोच्या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळचे सोनेरी रंग उतरले होते. दूरवर सांबा संगीताचा मंद आवाज येत होता. पण त्या गर्दीतही एक मुलगी शांतपणे बसली होती. तिचं नाव होतं एलिसा.
एलिसा एका छोट्याशा गावातून रिओमध्ये आली होती. तिच्या घरची गरिबीची परिस्थिती होती. तिचं स्वप्न होतं जगप्रसिद्ध नृत्यांगना बनायचं. तिच्या घरचे लोक तिचे हे स्वप्न समजू शकले नाहीत. त्यांनी तिला स्वप्न किंवा कुटुंब यातून एकच निवड करायला सांगितली. तिने नृत्य निवडले आणि या शहरात आली. पण या शहराने तिचं स्वागत फुलांनी नाही, तर काट्यांनी केलं. पदोपदी भीती, अवहेलना, संघर्ष आणि पोटासाठी वणवण.
गेल्या काही दिवसांपासून टेनिस एल्बोच्या दुखण्यानं डोकं वर काढलंय त्यामुळे फारसं आवडत नसतानाही, सकाळी पायी फिरायला जाण्यावाचून व्यायामाचा दुसरा पर्याय नव्हता. पायी फिरायला लागलो आणि एरवी पटकन निसटून जाणारे आजूबाजूचे देखावे आता हळूहळू सरकू लागले अन् आधी कानाडोळा केलेले, जागोजागी लावलेले विद्रूप फलक डोळ्यात चांगलेच खुपायला लागले. यावर अनेकांनी आजवर आक्षेप घेतलाय, वरपर्यंत तक्रारी केल्यात, आंदोलनं केलीत आणि त्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी पोकळ आश्वासनंही दिलीत आणि तरीही विद्रुपीकरण चालूच आहे.
नजर
दिशा आणी दीपक गाडीत चढायला लागले, तेव्हा गर्दी नेहमीसारखीच ढकला ढकली करत होती. दिशा वैतागली.
खरं तर गाडी इथे चांगली पाच मिनिटं थांबते. उतरणारे लोकं आधी रांगेत उतरले, आणी नंतर चढणारे चढले, तर सगळं शिस्तीत होऊ शकतं, कुणालाही त्रास नं होता. पण तेवढा धीर कुणाला असतो? आधी चढायची घाई, आणी मग उतरायचीही घाईच. शिवाय रांगा बिंगा लावणं तर माहीतच नाही. सगळ्यांना सगळीकडे ‘मी पहिला’ हवा असतो. पहिलं राहून तरी काय तीर मारायचे असतात कुणास ठाऊक! तरी बरं, गाडीचे सगळे डबे एकाच वेळी निघणार असतात. हा तर रिजर्वेशनचा डबा. बसायला जागा तर मिळणारच आहे.
झंप्या झोलकरचे (ज्याला लोक प्रेमाने 'आळसाचा ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणायचे) घर नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त आणि शांत होते. पण ती शांतता वादळापूर्वीची होती!
रात्रीचे पावणे बारा वाजले होते. झंप्या नुकताच टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत खुर्चीवर बसला होता. त्याचे जेवण बाकी होते. तेवढ्यात डायनिंग टेबलने आपला लाकडी जबडा उघडला.
“काय रे झंप्या! रोज तेच ते बेचव वरण-भात आणि पोळी? मी कोण आहे माहितीये? मी पनीर बिर्याणीचा भुकेला आहे!” असं ओरडत टेबलने एक मोठा ‘गपाक्!’ आवाज केला आणि त्यावर ठेवलेल्या सगळ्या खाद्य पदार्थांनी भरलेल्या प्लेट्स गिळल्या!
त्यानंतर त्याने एक जोरदार ढेकरही दिली.
अर्थातच आईही तितकीच दमते. पण इथं दमण्याचा विषय वेगळाच आहे.
गुंटूर नगर गावाच्या वेशीवर एक 'भयानक विहीर' होती. तिथे जायला गावकरी घाबरायचे, कारण त्या विहिरीतून नेहमी 'कटिंग चहा आणि वडापाव' मागितल्याचे आवाज यायचे. पण 13 वर्षाचा चिंटू मात्र भारी निर्भय! तोंडात च्युईंगम चघळत तो नेहमी तिथेच भटकायचा. तो कुणाला घाबरत नव्हता.
विहिरीतून वडापाव, चहा मागितला की चुईंगम चघळत "संपला! समोसा देऊ का? कॉफी देऊ का?" असे विहिरीत वाकून म्हणायचा. विहिरीतल्या भुताला समोस्याची आणि कॉफीची चीड होती, त्यामुळे ते पाण्यात पाय आपटत आपटत चरफडायचे. विहिरीचं पाणी खळखळलं की चिंटू पण खळखळत हसायचा.
इतर लोक मात्र भीतीमुळे विहिरीजवळच येत नव्हते.