कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.
मानवमित्र स
सन 2055. एआय ह्युमनाईड रोबोट्स आता माणसांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले होते. पुणे शहरात, 'क्षीरसागर' कुटुंबाच्या घरात 'असिस्टंट-7' (घरात त्याला सगळे 'सातू' म्हणत) नावाचा एक अत्यंत प्रगत ह्युमनाईड रोबोट हाऊस असिस्टंट म्हणून काम करत होता. त्या घराचे प्रमुख होते: दिलीप क्षीरसागर, अखिल भारतीय रोबोटिक वेलफेअर संघटनेचे प्रमुख सायंटिस्ट होते. आणि त्यांची पत्नी विशाखा रोबोट-मानव समन्वय संघाची प्रमुख होती.
रात्र मुंबईच्या रस्त्यांना हळूहळू गिळत होती. वाशी ब्रिजवरून वाहणाऱ्या वाहनांना पुलाखालच्या समुद्राच्या सौम्य लाटा जाणवत होत्या. ब्रिजवरून धावणाऱ्या तुरळक गाड्यांच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात अक्षयची बाईक वेगाने सुसाट पळत होती.
पुण्यातलं एक टिपिकल मध्यमवर्गीय घर. रविवार, सकाळी 9 वाजता.
सुमती (घर पुसते आहे): "राजेश, आज घरातलं काम करायचंय. कपाट साफ करायचंय, धूळ पुसायची, मग मला स्वयंपाक करायचाय!"
राजेश (क्रिकेट मॅच बघतोय): "सुमती, रविवार म्हणजे विश्रांती. शिवाय आज क्रिकेट मॅच आहे!"
सुमती: "तुम्ही काय मॅच बघायला माझ्याशी लग्न केलं होतं का?"
राजेश: "तू लग्नात एक करारपत्र बनवायला हवे होते आणि त्यात 'रविवारचे करार' लिहून माझी सही घ्यायला हवी होती!"
रोहन: "आई, बाबा, आपण लवासा फिरायला जाऊया ना! मी ड्रोन कॅमेरा सोबत घेईन! तिथले व्हिडिओ युट्यूबवर टाकेन."
1957 साली “ट्रान्स नॉर्दर्न एअरवेज” या कंपनीचं एक विमान, फ्लाइट KB713, शिकागोहून व्हॅनकुव्हरला जात असताना कॉलॉरडो येथे अचानक गायब झालं. म्हणजे त्यानंतर त्या विमानाचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला नाही.
कॉलॉरडो हे थोडं दक्षिणेकडे आहे, त्यामुळे बहुतेक वेळा शिकागो ते व्हॅनकुव्हर हा मार्ग कॉलॉरडोवरून जात नाही, पण काही फ्लाइट KB713 हे त्याच्या नियोजित मार्गातून भरकटले होते कारण त्याच्या पायलटस् ला समोर आकाशात काहीतरी अभद्र आकृत्या दिसल्या म्हणून त्यांनी मार्ग बदलला आणि ते कॉलॉरडोच्या हवाई क्षेत्रातून जाऊ लागले होते. पण तिथेही त्या आकृत्यांनी त्यांची पाठ सोडली नव्हती.
अमावस्येची रात्र होती. चंद्र सुट्टीवर होता. आकाश काळेकुट्ट होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती. रात्रीचे अकरा वाजले होते.जुन्या बसचं घरघर करणारं इंजिन थरथरत थांबलं, आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बस मधून उतरला.
स्टॉप पासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं.
एक मोठा जागतिक साथीचा रोग संपल्यानंतरचा 2021 सालचा तो नोव्हेंबर महिना होता. त्या महिन्यात, जगातील अनेक भागात अनाकलनीय घटना घडल्या होत्या.
असे म्हणतात की, त्या साथीच्या रोगाच्या विषाणूने काही परग्रहावरचे विचित्र विषाणू पृथ्वीवर आकर्षित केले होते आणि ते अजूनही पृथ्वीवरच आहेत. त्यातील काही चांगले तर काही घातक होते. पण ते इतके सूक्ष्म होते की खूप पावरफुल मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नव्हते. शास्त्रज्ञांना शंका होती की, त्या विषाणूंच्या डोक्यात माणसांपेक्षाही प्रगत मेंदू होता.
१. "आमचंच रक्त महान आहे. आमचाच वंश शुद्ध आहे. त्यामुळे आम्हीच जगावर राज्य करणार. इतरांनी दुय्यम मनुष्य म्हणून जगावं, किंवा तुम्हाला ते मान्य नसेल तुम्हाला घाऊक प्रमाणात मारून टाकण्याची सोय करता येईल, ती आम्ही करू!'' असे शाश्वत सुंदर विचार श्री. हिटलर यांनी मांडले.
१. मन जाय तो जाने दे, मत जाने दे सरीर.
मन शरीराला भविष्यातील किंवा भूतकाळातील कुठल्याशा आभासी परिस्थितीत घेऊन गेलंय की शरीर अजुनही आपल्याजवळच आहे, हे चेक करत रहायला पाहिजे वारंवार.
कारण शरीर मूर्ख असल्यामुळे ते आभासी परिस्थित्यांनाही खऱ्याखुऱ्या रिॲक्शन्स देत बसतं. त्याला काय खऱ्याखोट्यातला फरक करता येत नाही.