पाऊस

तू नसताना

Submitted by चाऊ on 1 September, 2010 - 10:03

तू नसताना, का असा हा पाऊस बरसून पडतो
थंड ओला वारा असा का अंगांगाला भिडतो
उजेड थोडा, कुंद सावळा, उदासवाणा मिटतो
गडगडणारा घन गंभीर का मत्तपणे हा घुमतो

तू नसताना आठवणींचा महापूर हा येतो
भिजल्या ओल्या क्षणाक्षणांचा दंश काळजा होतो
वहात जातो आयुष्याचा अर्थ जळाच्या संगती
गढूळलेल्या लाटा फुटती विद्ध किनार्‍यावरती

आता कळले, पाऊस असा का तू नसताना येतो
आवेग तुझा, तुझाच स्पर्श, सोबत घेऊन येतो
मेघदूत, अस्वस्थ, तुझे, गंध संदेश देतो
विरही मला, तुझ्या सारखा चिंब मिठीत घेतो

गुलमोहर: 

प्रणयाचा पाऊस!

Submitted by निमिष_सोनार on 28 August, 2010 - 00:26

पाऊस बरसला,
सुगंध पसरला!

श्वास मोहरला,
सहवास बहरला!

मंद तारा,
धुंद वारा!

प्रेमात ओला,
आसमंत सारा!

मन फुलले,
तन उमलले!

प्रणय पाहूनी,
क्षण थांबले!

-- निमिष सोनार, पुणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस

Submitted by मंदार शिंदे on 22 August, 2010 - 19:24

बाहेर पडणारा पाऊस
खिडकीतून बघणारा मी.

अंगणातल्या मातीचा गंध -
नभातून धरणीवर
जणू अत्तराचा सडा,
सृष्टीची ही उधळण
खिडकीतून बघणारा मी.

भिजलेली सडक -
नुकतीच न्हालेली
जणू श्यामल तरुणी,
सडकेचं हे नवं रुप
खिडकीतून बघणारा मी.

पावसाच्या मार्‍यात हिरवं झाड -
लाजेनं चूर झालेली
जणू नवी नवरी,
पावसाची ही सारी किमया
खिडकीतून बघणारा मी.

पावसात भिजू नये म्हणून
बाहेर न पडणारा मी -
खिडकीतून पाऊस बघताना
नकळत चिंब झालोय,
तुझ्या आठवणींनी...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

Submitted by निमिष_सोनार on 9 August, 2010 - 12:29

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!

चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!

महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!

बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!

चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!

उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

गुलमोहर: 

शंकर रामचंद्र भागवत

Submitted by अ. अ. जोशी on 7 August, 2010 - 23:03

शंकर रामचंद्र उर्फ आप्पासाहेब भागवत यांचा जन्म ८ ऑगस्ट १८८२ साली गोकाक येथे झाला. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाचे ओव्हरसिअर म्हणून आप्पासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच रामचंद्रबुआंनी काम पाहिले. आप्पासाहेब १९ वर्षांचे असतानाच १९०१ साली घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील रामचंद्रबुआ यांनी घराचा त्याग करून आध्यात्मवासात जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. आप्पासाहेबांच्या बहिणींचे संसारही चालले नाहीत. दोनही बहिणी व त्यांची मुले या सर्वांना आप्पासाहेबांनी स्वतःच्याच घरी आसरा दिला. आप्पासाहेबांना एकूण ४ मुले आणि ४ मुली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - पाऊस