जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.
वयोगट: [३-५]
साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा
कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.
    
  
      
  
  
      
  
  
    "काय, ओळखलंस का मला?  हो, तोच मी - ज्याची वर्षभर वाट पहायचास तू.  माझ्या पहिल्या स्पर्शानं आनंदीत व्हायचास, नाचू लागायचास.  आठवतंय का काही?  यंदा झालंय तरी काय तुला?  माझ्या येण्याची चाहूल लागली की लगेच दारं-खिडक्या बंद करुन घेतोयस.  अरे, मन मोकळं करुन बोल की माझ्याशी.  नेहमी बोलायचास तसाच... पुन्हा..."
    
  
      
  
  
      
  
  
    पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला
तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली 
सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले
असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....
                                                                                                                                    --- अरुंधती
    
  
      
  
  
      
  
  
    तू नसताना, का असा हा पाऊस बरसून पडतो
थंड ओला वारा असा का अंगांगाला भिडतो
उजेड थोडा, कुंद सावळा, उदासवाणा मिटतो
गडगडणारा घन गंभीर का मत्तपणे हा घुमतो
तू नसताना आठवणींचा महापूर हा येतो
भिजल्या ओल्या क्षणाक्षणांचा दंश काळजा होतो
वहात जातो आयुष्याचा अर्थ जळाच्या संगती
गढूळलेल्या लाटा फुटती विद्ध किनार्यावरती
आता कळले, पाऊस असा का तू नसताना येतो
आवेग तुझा, तुझाच स्पर्श, सोबत घेऊन येतो
मेघदूत, अस्वस्थ, तुझे, गंध संदेश देतो
विरही मला, तुझ्या सारखा चिंब मिठीत घेतो
    
  
      
  
  
      
  
  
    पाऊस बरसला,
सुगंध पसरला!
श्वास मोहरला,
सहवास बहरला!
मंद तारा,
धुंद वारा!
प्रेमात ओला,
आसमंत सारा!
मन फुलले,
तन उमलले!
प्रणय पाहूनी,
क्षण थांबले!
-- निमिष सोनार, पुणे
    
  
      
  
  
      
  
  
    बाहेर पडणारा पाऊस
खिडकीतून बघणारा मी.
अंगणातल्या मातीचा गंध -
नभातून धरणीवर
जणू अत्तराचा सडा,
सृष्टीची ही उधळण
खिडकीतून बघणारा मी.
भिजलेली सडक -
नुकतीच न्हालेली
जणू श्यामल तरुणी,
सडकेचं हे नवं रुप
खिडकीतून बघणारा मी.
पावसाच्या मार्यात हिरवं झाड -
लाजेनं चूर झालेली
जणू नवी नवरी,
पावसाची ही सारी किमया
खिडकीतून बघणारा मी.
पावसात भिजू नये म्हणून
बाहेर न पडणारा मी -
खिडकीतून पाऊस बघताना
नकळत चिंब झालोय,
तुझ्या आठवणींनी...
    
  
      
  
  
      
  
  
    चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!
चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!
महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!
महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!
बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!
चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!
ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!
उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!
    
  
      
  
  
      
  
  
    शंकर रामचंद्र उर्फ आप्पासाहेब भागवत यांचा जन्म ८ ऑगस्ट १८८२ साली गोकाक येथे झाला. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर होते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाचे ओव्हरसिअर म्हणून आप्पासाहेबांच्या वडिलांनी म्हणजेच रामचंद्रबुआंनी काम पाहिले. आप्पासाहेब १९ वर्षांचे असतानाच १९०१ साली घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील रामचंद्रबुआ यांनी घराचा त्याग करून आध्यात्मवासात जीवन व्यतीत करण्याचे ठरविले. आप्पासाहेबांच्या बहिणींचे संसारही चालले नाहीत. दोनही बहिणी व त्यांची मुले या सर्वांना आप्पासाहेबांनी स्वतःच्याच घरी आसरा दिला. आप्पासाहेबांना एकूण ४ मुले आणि ४ मुली.