कुटुंबावर आणि घरावर येतात मोठी विघ्ने व संकटे,
त्यावेळी आठवण येते देवाची.
कामानिमित्त घराबाहेर भरभर जाताना ठेच लागून रक्त वाहते,
त्यावेळी आठवण येते आईची.
तुटपुंजा पगार, फी भरणे , हप्ता भरणे , घरात पैशाची जरुरी वाढणे,
त्यावेळी आठवण येते वडिलांची.
शाळेच्या आवारात मुले एकत्र येऊन आपल्याला मारहाण करतात,
त्यावेळी आठवण येते मोठ्या भावाची.
रक्षाबंधनच्या दिवशी दुसऱ्या मुलांच्या मनगटावर राखी बघितल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते बहिणीची.
मनास हे पक्के माहीत असते
पण पुन्हा बिचारे तसेच फसते....
उपयोग याचा होणार नाही
हे मनाला जरी कळते का पुन्हा
तिच्या प्रोफाइल वर बोट मात्र वळते.
नात्याचा धागा तुटून गेला जरी,
अधून मधून मनात आठवण जागी होते...
मन काही विसरायला तयार नाही तरी....
अधून मधून सारखी प्रोफाइल स्टॉक होते
कुणीतरी मनाला यातून बाहेर काढायला हवं
आठवण्याच्या ही आधी तिला विसरायला हवं...
#@ *संस्कार* @#
लेखिका
सौ. वनिता सतीश भोगील
*#@अधांतर. एक प्रेमकथा@#*
लेखिका
सौ.वनिता सतीश भोगील
नवी मुंबई
खूप खूप आठवण येते तुझी रोज
कमी वेळ नव्हता रे आपण एकत्र घालवलेला , तब्बल ३१ वर्षे,
काय नाही केले, एकमेकां सोबत,
खूप बोललो, भांडलो, काळजी घेतली, रुसलो, विरहात राहिलो, प्रवास केला,
पण तू असा अचानक जाशील असा कधी विचार पण नव्हता केला रे, का गेलास असा मला सोडून एकटीला,
खूप आठवण येते रे तुझी, कुठे शोधू तुला, कसा शोधू,
कसा पुढे निभावून नेऊ सगळं.....................
सांग ना , एकदा फक्त सांगायला तरी ये, कि तुला पण माझी आठवण येते म्हणून
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...
आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारं
असं एक आडनाव
आणि सगळ्यांच्या आठवणीतलं
आपलं घर, आपलं गाव..
कोबा, ओटी, माजघर, स्वैपाकघर
अंधारी बाळंतीणीची खोली
मागच्या अंगणातील गोठा आणि
वकील मास्तराची खिल्लारी जोडी..
आंब्या फणसांनी रसरसलेल्या बागा
माडीवर भरभरून सांडणारी सुपारी
ह्या घरात उठल्या असतील
कितीक असंख्य जेवणावळी...
वादविवादांच्या वादळांनी
हलल्या असतील घराच्या भिंती
तरी जखमेवर फुंकर घालणारी
इथल्याच तुळशीची माती...
मी आपला त्याच एका प्रश्नात अडकलेला - "लग्न करायचं की नाही"?
मग आयुष्यात तू आलीस.
तरीही पूर्वग्रहदूषित ह्या मनाचा प्रश्न कायमच ! पुढे जावं की नाही, जावं तर का जावं? नाही जावं तरी का नाही?
प्रचंड विचार, वाचन आणि चर्चा झाल्यावर निर्णय झाला.
आपलं लग्न झालं.
तूसुद्धा केलाच असशीलच की असा विचार. तुलाही पडले असतील असले प्रश्न.
मला आठवतचं नाही कधी आपण ह्याबद्दल चर्चा केली असेन.
लग्न झाल्यावर सुरुवातीला सगळे किती कौतुक करायचे आपलं. पण सोबत टोमणेही मारायचे. "नवीन लग्न आहे, सुरुवातीला कौतुक होणारच. नंतर आहेच आपलं, सर्वां सारखंच !"
मन वढाय वढाय...
nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... 
पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?
ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?
ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?
(साधारण चौदाएक वर्षांपूर्वी (२००५-०६च्या सुमारास) लिहिलेला हा लेख आहे.)
`आपल्याला मुलगी असती, तर तिच्या लग्नप्रसंगी तिला निरोप देताना, ती सासरी गेल्यावर तुमचं काय झालं असतं?` माझ्या पत्नीचं मला हे असं डिवचणं हल्ली सतत चालूच असतं.
हे असं चालू झालंय साधारण वर्षांपूर्वीपासून!
मी माझी मारुती Van विकल्यापासून...
मी माझी लाडकी मारुती व्हॅन विकल्यापासून...