सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल
शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?
दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी
सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी
घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल
तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"
मी मानसी
आली का ही बया
अशीच येते ही अगदी
नेमक्या वेळेस न सांगता
अगदी दारात उभीच राहते
बरं दारातून घालवून द्यायची आपल्यात रीत नाही
निदान या बसा पाणी घ्या तरी म्हणावं लागतं
हिला ते ही म्हणायची सोय नाही
आली की कितीवेळ बसेल सांगता येत नाही
घटका दोन घटका दिवस दोन दिवस
बरे शांत बसेल तर खरी
नुसती आपली भुणभुण भुणभुण
आपण आपले कामात असावे
तरी हिचे आपले चालूच
बरे अगदीच काही वाईट वागत नाही
रिकाम्या हाताने तर कधीच येत नाही
कधी काहीतरी गोड घेऊन येईल
कधी आंबट कैरीची फोड घेऊन येईल
तुझी आठवण
घाली रुजवण
शिंपीत रेशीमवाटा..
क्षणात कहर
क्षणात लहर
नाजूक गुलाबी काटा !!
तुझी आठवण
केवड्याचं बन
ओढाळ पाऊलवाट..
क्षणात विसावा
क्षणात दुरावा
सुगंधाची वहिवाट !!
तुझी आठवण
पाऊस मृगाचा
मनाला लागली आस
क्षणात हवासा
क्षणात नकोसा
सुखाचा बेगडी भास !!
मी मानसी
अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली.
हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे?
कुटुंबावर आणि घरावर येतात मोठी विघ्ने व संकटे,
त्यावेळी आठवण येते देवाची.
कामानिमित्त घराबाहेर भरभर जाताना ठेच लागून रक्त वाहते,
त्यावेळी आठवण येते आईची.
तुटपुंजा पगार, फी भरणे , हप्ता भरणे , घरात पैशाची जरुरी वाढणे,
त्यावेळी आठवण येते वडिलांची.
शाळेच्या आवारात मुले एकत्र येऊन आपल्याला मारहाण करतात,
त्यावेळी आठवण येते मोठ्या भावाची.
रक्षाबंधनच्या दिवशी दुसऱ्या मुलांच्या मनगटावर राखी बघितल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते बहिणीची.
मनास हे पक्के माहीत असते
पण पुन्हा बिचारे तसेच फसते....
उपयोग याचा होणार नाही
हे मनाला जरी कळते का पुन्हा
तिच्या प्रोफाइल वर बोट मात्र वळते.
नात्याचा धागा तुटून गेला जरी,
अधून मधून मनात आठवण जागी होते...
मन काही विसरायला तयार नाही तरी....
अधून मधून सारखी प्रोफाइल स्टॉक होते
कुणीतरी मनाला यातून बाहेर काढायला हवं
आठवण्याच्या ही आधी तिला विसरायला हवं...
#@ *संस्कार* @#
लेखिका
सौ. वनिता सतीश भोगील
*#@अधांतर. एक प्रेमकथा@#*
लेखिका
सौ.वनिता सतीश भोगील
नवी मुंबई
खूप खूप आठवण येते तुझी रोज
कमी वेळ नव्हता रे आपण एकत्र घालवलेला , तब्बल ३१ वर्षे,
काय नाही केले, एकमेकां सोबत,
खूप बोललो, भांडलो, काळजी घेतली, रुसलो, विरहात राहिलो, प्रवास केला,
पण तू असा अचानक जाशील असा कधी विचार पण नव्हता केला रे, का गेलास असा मला सोडून एकटीला,
खूप आठवण येते रे तुझी, कुठे शोधू तुला, कसा शोधू,
कसा पुढे निभावून नेऊ सगळं.....................
सांग ना , एकदा फक्त सांगायला तरी ये, कि तुला पण माझी आठवण येते म्हणून
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...