Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 September, 2010 - 10:49
पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला
तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली
सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले
असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....
--- अरुंधती
गुलमोहर:
शेअर करा
कविता वाचून फ्रेश फील आला
कविता वाचून फ्रेश फील आला
कविता वाचून फ्रेश फील आला
कविता वाचून फ्रेश फील आला
छान झालीय कविता.
छान झालीय कविता.
काया झाली हलकीशी निळ्या
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....
अतिशय सुंदर कविता!!!
अकु, कविता पण !! चांगली
अकु, कविता पण !!
चांगली जमलीय, पण पुन्हा कामाला लागली, हि ओळ जरा विसंगत वाटतेय.
हो दिनेशदा, मलाही ती ओळ खटकत
हो दिनेशदा, मलाही ती ओळ खटकत होती .... बदल केलाय!
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स!
प्रसन्न
प्रसन्न
सुंदर..आवडली
सुंदर..आवडली
अरुंधती, छान कविता ! पण आता
अरुंधती,

छान कविता !
पण आता पाऊस कुठे दिसला तुम्हाला ?
मस्तच!!!!
मस्तच!!!!
छान
छान