'धुक्यात न्हाऊनी मन' - पावसातले महाबळेश्वर
बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके
पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.
प्र.चि. ०१
प्र.चि. ०२
प्र.चि. ०३
प्र.चि. ०४
बेफिकार मन हे झाले
घन प्रेमाचे आले
बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके
पावसातल्या महाबळेश्वरचा हा चित्र-परिचय.
प्र.चि. ०१
प्र.चि. ०२
प्र.चि. ०३
प्र.चि. ०४
पाऊस पडला होता बाहेर
झापाच्या चिपटातून अजूनही
थेंब टपटपत होते सारवलेल्या अंगणात....
लालसर गढूळ पाणी
अख्ख्या वावरात तुंबलेलं होतं
बांधावरच्या वाकड्या बाभळी
अजूनही खाली मान घालून
केस वाळवत होत्या
निंबार्याखालच्या लापट शेळ्या
खुरेनं चिखल उकरताना
राहून राहून अंग झटकत होत्या...
विहिरीवरचा रहाट नेहमीसारखाच
आसूसलेला अतृप्त केविलवाणा
पावसाच्या थेंबानी बरबटलेला...
दाराबाहेर पितळी कळशीत
काळ्याकुट्ट तांब्याच्या हंड्यात
शेण गोळा करायच्या टोकरीत
गंजून ठिकर्या पडलेल्या टिपड्यात
तिनं पाणी गोळा करुन ठेवलं होतं....
मी तळपायाला चिकटलेला चिखल
हिरव्या हरळीवर घासत अंगणात आलो
पाऊस येतो आपल्या मर्जीने !
पाऊस जातो आपल्या मर्जीने !!
लोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..
मी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.
लोकं पण ना, कमाल करतात,
चार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..
जेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा "धावा" करतात ..
जेव्हा बरसू लागते, यांच्या "विकेट" पडतात !
- कवी ऋन्मेऽऽष
असू द्या असू द्या ...
खूप दिवसांनी माझी अन्यत्र प्रकाशित कविता वाचली. खूप छान वाटलं वाचताना. इथे चिकटवतेय.
(चालः आता तरी देवा मला पावशील का? रूप ज्याला म्हनतात ते दावशील का)
आता तरी पावसा तू थांबशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का
पाण्याने या मैदाने ही तळी दिसती, रस्ते जणु चहुकडे नद्या धावती
चालावे की पोहावे ते सांगशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का
लोकलही थांबली ती रुळावरती, बसमध्ये माणसे ही ओथंबती
ऑफिसला कसे जावे सांगशील का? ऊन ज्याला म्हणतात ते दावशील का
कायमचा निघुन जा सांगत नाही, वेड्यापरी नको अशी पाहिजे हमी
जीवन
ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात
नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात
येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ
ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्यावरी गाणे गाती मस्त मजेत
हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास
थेंबघुंगरु
थेंबघुंगरु घनात वाजे घुमड घनानी
चमकत राही अधुनि मधुनि दाही दिशातुनि
थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन
थेंबघुंगरु, चमकत पानी हिरवे होऊन
थेंबघुंगरु, सुंगध होते फुलाफुलातुन
थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन
थेंबघुंगरु, स्वैर निनादे कोसळताना
मल्हार घुमतसे, घनगंभीरसा धुंद तराणा
थेंबघुंगरु, तुटून आले सरसर खाली
गुंफून सरींच्या अगणित मिरवित रेशिमशाली
थेंबघुंगरु, सदा झुलतसे मनामनातुन
नाद तयाचा अखंड भुलवी.. कणाकणातुन
थेंबघुंगरु, ओघळती त्या नयनांमधुनी,
आस ही मूर्त झाली
ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती
घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी
नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली
आज नवा पाऊस आलाय
आता तुझा फोन येईल
बोलू आपण बरच काही
रोजच्याच गोष्टी,
रोजचच जगणं, जिंकणं, हरणं,
कोठेही पावसाचा उल्लेख न करता
उरात भरलेला मातीचा गंध लपवत
थंड वा-यानं अंगावर फुललेला काटा
मनात उठणारी ढगांची सावळ संध्या
आणी आपल्या दुराव्याची कळ सोसत
एक शब्द ही नसेल जवळिकेचा
दडवलेला सल, न भेटण्याचा,
तरीही
ओल्या स्पर्शाची फुलं
उबदार श्वासाची भूल
आणी डोळ्यातली ओल
पोहोचवील मेघदूत तूझ्यापर्यंत
शब्दांमधल्या निश:ब्दतेमधून
काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं.
त्याला पाहून माझा आनंद गगनात मावेना.
मी भारावून त्याच्या पाया पडलो.... त्यानेही माझ्या पाठीवरून हात फिरविला.
उभ्या अंगातून एक वीज सळसळत गेली...
पण ही वीज जाळणारी नव्हती तर उबदार होती...
अगदी गुलजार साहेबांच्या एखाद्या तरल कवितेसारखी.
मंत्रमुग्ध अवस्थेत मी चाचरतच आभाळाला म्हटलं, " माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण..."
आभाळ प्रेमळपणे हसलं अन् म्हणालं, " अरे बाळा, ... पाऊस कधी खालून वर जातो का? "
असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या मुलायम हातात घेतला, गालावर प्रेमाने थोपटलं आणि एक पाऊस मला भेट म्हणून दिला.
आलायस तर खरा...
आता थांबणार आहेस की
दडी मारणार आहेस लगेच
हुरहूर लावून?
मनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...
त्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,
निष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील
आणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील!
मग पहिल्याहून अधिक असह्य
दुष्काळ सोसावा लागेल...
हे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -
एकतर थांब तरी, किंवा मग जा तरी!
तुझी वाट पाहणं चालूच राहील -
तू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,
आवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने
बरसू लागेपर्यंत!
तेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...
- नचिकेत जोशी