राहुल गांधी- एक औत्सुक्याचा (?) विषय....

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 09:26

राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....

हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...

राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....

थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...

थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८
उत्तरप्रदेशचे होते. त्यापैकी ६ कॉंग्रेसचे होते.

राहुल बाबा !! मला वाटते कि तुमच्या पक्षाकडे ५० वर्षपेक्षा जास्त काळ सत्ता
आणि अर्धा डझन पंतप्रधान होते हे राज्य सुधारण्यासाठी..... पण काय झाले ????

मुलायमसिंग चे सरकार आत्ता कुठे सत्तेत आले आहे. कारण तुमची पार्टी गांधीवादीचा
पुरस्कार करू शकली नाही म्हणूनच आज जो काही उत्तरप्रदेश मध्ये प्रकार झाला
त्याला तुमचे ५० वर्षाचे उज्ज्वल नेतृत्व किंवा तुमचे विचार जबाबदार असतील.

मायावती आज तोच कायदा (Land Acquisition bill) वापरत आहे जो तुमच्या कॉंग्रेस
पार्टीने गेली कित्तेक वर्ष वापरून शेतकर्यांना रसातळाला घातले. त्यामुळे जास्त
लाज वाटून घेऊन नकोस बाबा.

तू ज्या कायद्याला शिव्या देत आहेस किंवा जो कायदा इतका तुला चूक वाटत आहे तो
कायदा कॉंग्रेसची सत्ता असताना का बदलून घेतला नाहीस ?

मायावती जे काही करत आहे त्याला माझे समर्थन नाही, ती जे करत आहे ते चूकच आहे
पण तुमच्या पार्टीची पूर्वीची धोरणे (जेंव्हा तुम्ही सत्तेमध्ये होता) आणि
आत्ताची वायफळ बडबड (तुमची सत्ता नाही म्हणून) यामध्ये जमीन आसमानाचा फरक कसा ?

उत्तरप्रदेशच्या राजकारणामध्ये तुझा निभाव लागला नाही.
कित्येक वल्गना केल्यास तू निवडणुकीच्या आधी पण लोकांनी तुला साफ नाकारले आणि
आता या प्रकारची statement करत फिरत आहेस.
तुला लाजतर वाटलीच पाहिजे राहुल बाबा...

काळजी करू नकोस तुला लाज वाटण्यासाठी (शिल्लक असेल तर) मी तुला चिक्कार उदाहरणे
देतो.

१) पहिल्यांदा प्रणव मुखर्जीला विचार कि का ते स्विस बँकेमध्ये कोणाकोणाची खाती
आहेत हे उघड करत नाहीत ?

2) दुसरे तुझ्या आईला विचार कि का ती हसन अलीवर इतकी मेहेरबान आहे? त्याची
चौकशी का होऊ देत नाही ?

३) परत तुझ्या आई ला विचार कि २ G स्पेक्ट्रम मध्ये ६०% नफा कोणाला मिळाला ?
४) कलमाडी (पुण्याची घाण) ने तर काही शे कोटी चा भ्रष्टाचार केला CWG मध्ये,
बाकी पैसे कुणाच्या खिशामध्ये गेले? तुमच्या स्विस बँक account मध्ये ?
५) प्रफुल पटेलला विचार, काय केले त्याने INDIAN AIRLINES बरोबर ? का ती तोट्या
मध्ये चालली आहे ?
आणि सामान्य माणूस का म्हणून tax भरतोय तोट्या मध्ये चाललेल्या INDIAN AIRLINES
ला वाचवण्या साठी ?
आणि इतका tax भरून सुद्धा काहीही सुधारणा का नाही ?

अरे देशाच्या घाण लोकानो तुम्हाला साधी airline कंपनी चालवता येत नाही तर देश
कधी चालवणार तुम्ही ? ६० वर्षे पार मातेर करून टाकला ना आमच्या देश चे ...
मी आमचा देश म्हणतोय कारण तू आणि तुझ्या आई ने कधी या देशाला आपला मानलेच नाही.
असे मी का म्हणतोय ते कळेलच पुढे.

भोपाल दुर्घटनेमधील आरोपीला कोणी जाऊ दिले ? आरे २०००० लोक मेले होते. मारले
होते आमच्या देशतील त्याने. पण तुम्ही तर भारतीय नाहीच त्यामुळे तुम्हाला
त्याचे काही सोयरे सुतक नाही हे मात्र नक्की.
मोहनदास करमचंद गांधीचे नाव घेऊन राजकारण करता आणि १९८४ ला दिल्ली मध्ये
शिखांचे कातालेआम करता ?

आता हे सगळे वाचून राहुल बाबा तुला जर मायावती बाबतच जर लाज वाटत असेल तर तुझा
हा घाणेरडा दुटप्पीपणा जास्त दिवस लपून राहणार नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या म्हणून तुला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते तर
मग महाराष्ट्रतल्या लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या त्याचे काहीच वाटत
नाही.. हो बरोबर तिथे तुमचे राज्य आहे ना...
७२००० करोड ची मदत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना दिली पण ती शेतकर्य
पर्यंत किती पोहोचली याची काही कल्पना नसेल तुम्हाला. ते जाणून हि घेणार नाही
तुम्ही कारण त्यामध्ये सुद्धा तुमचा काही वाटा असणारच.

अशी फुकाची भाषणे आणि पाण्याचे बुडबुडे सोडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या
राज्यामध्ये काय काय केले याची एकदा खबर काढा आणि बोललो आहे ते पूर्ण
करण्यासाठी पावले उचला. ते तर तुमच्या ने होणार नाही कारण तुमचा पूर्ण वेळ
आम्हाला गावकर्यांना आम्ही मदत करतो हे दाखवण्यातच जातो..

तुमची पार्टी फक्त लोकांचा पैसा कसा उकळता येईल हेच पाहत असते आणि त्यातच
धन्यता मानते.

अजुन तुला लाज वाटून घ्यायची आहे का?
आता तुझ्या बद्दल बोलू.
सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?
तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती.
आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर
त्याचे उत्तर देता आले नाही तुला.
अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली
ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.

९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते.
नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले.
एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल
बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही
काटा येतो.

एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी
कडून.

का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते.

त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे
लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी
माहिती बाहेर.

पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. Happy

काही नव्हते तर मीडीया समोर यायचे सगळे सांगायचे ना किंवा त्यावेळी तरी
म्हणायचे की मला भारतीय असल्याची लाज वाटते म्हणून

का प्रकाशात फक्त उत्तर प्रदेशातील गोष्टी आणायच्या बॉस्टन च्या नाहीत. जरा
स्पष्टीकरण द्या की युवराज

अजुन बरीच कारणे देऊ शकतो तुला लाज वाटण्यासाठी.

तुझ्या आईचीच गोष्ट घेऊ, २००४ ला तिने सगळीकडे स्वतःचा उदो उदो करून घेतला. काय
तर म्हणे मी पंतप्रधान पदाचे बलिदान दिले वगैरे वगैरे.

आता ऐक.

नागरिकत्व कायद्यानुसरा भारतात जन्मलेला आणि इटलीचे नागरिकत्व स्वीकारलेल्या
व्यक्तीला जसे इटलीचे पंतप्रधान होता येत नाही तसेच इटलीमध्ये जन्मलेला आणि
भारताचे नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला भारताचे पंतप्रधान होता येत नाही.
तुम्ही त्याच देशात जन्माला येणे गरजेचे असते.

डॉ. सुब्रामानियाम स्वामी (एक सच्चा भारतीय ज्याने २G स्पेक्ट्रम घोटाळा उघड
केला ) यांनी पंतप्रधान शपथविधीच्या दिवशी (१७ मे २००४ ) राष्ट्रपतीना पत्र
पाठवून हा नियम दाखवून दिला. तेच पत्र राष्ट्रपती नि सोनिया गांधीला पाठवले
त्यावेळी ३:३० वाजले होते. सोनिया गांधीची झाली पंचाईत त्यावेळी म्हणून अगदी
शेवटच्या क्षणी मनमोहन सिंग हे कटपुतली बाहुले पुढे आले.
त्यामुळे बलिदान वगैरे सब झूट आहे. नौटंकी आहे सगळी.
सोनिया गांधीने राष्ट्रपतीना तर ३४० पत्रे पाठवली होती वेगवेगळ्या
मंत्र्यांच्या सह्या असलेली
लिहिलेल्या ३४० पत्र पैकी सोनिया गांधी ने स्वतः लिहिलेल्या एका पत्रातील मजकूर
असा कि "मी सोनिया गांधी, रायबरेलीमधून निवडून आले आहे आणि पंतप्रधान पदा साठी
इच्छुक आहे"
जो पर्यंत तिला खरा नियम माहित नव्हता तो पर्यंत त्या बाईसाहेब इच्छुक होत्या.
तिने काही त्याग, बलिदान केले नाही बर का! नियमच तसा होता Happy

जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation
quota मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे
कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते.
नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण
त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण
जगात एकच मनमोहन सिंग आहे. )
काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून
टाकले.
कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड
univercity मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM
स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर
तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही.
कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू
हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार
कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी
बोलली जाते.
आहे न मज्जा भारतामध्ये !!!!

आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून
इंग्रजी शिकल्या आहेत.
[SEE ANNEXURE-6, 7_37a]

पण हे जेंव्हा cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची
कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती.
[ SEE ANNEXURE -7_39]
या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी
परिवार विरुद्ध.
सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे.
ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत.
सोनिया गांधीचे आणि तिच्या मुलाचे शिक्षण बघता, ते 2G स्पेक्ट्रम वाले
करुणानिधी च्या जास्त जवळचे वाटतात.
अरे राहुल, तुझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र, खोटे तुझ्या आईचे प्रमाण पत्र खोटे,
आणि प्रत्येक भाषणं मध्ये ओरडून ओरडून तुम्ही बोलत असता कि शिक्षित लोक राजकारण
मध्ये असणे गरजेचे आहे. किती हे हास्यास्पद वक्तव्य असते हे. असे असेल तर
सगळ्यात आधी तुम्ही दोघे राजकारण बाहेर जा.

आता हे लोक आपल्या शिक्षणाबद्दल का खोटे बोलले ?
आपल्या देशामध्ये राजकारणी किती शिकला पाहिजे याला काही मर्यादा हि नाही.
कारण फक्त तुला वाटणारी लाज असेल ... आपले शिक्षण कळल्यावर आपले कोणी ऐकेल का
नाही ते. कारण तू आहे youth icon ....

वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!
election कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!!
आणि तू youth icon झालास....
देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!
हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू
भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!!

राहुल तू यंग हि नाहीस आणि इकॉन तर नाहीच नाही.
ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या
स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद
आहे..

Shakespeare म्हणाला , What's in a Name?
या त्याच्या वाक्यवर बरेच जणांचे सहमत नाही.
कारण नावात नसले तरी आडनावा मध्ये बरेच काही आहे.
आडनावा बद्दल बोलतोय साहेब मी.

खरच तुला गांधी बद्दल आदर वाटतो? का फक्त राजकारणमध्ये त्यांच्या नावाचा वापर
करता तुम्ही लोक.
कारण भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL
VINCI आहे.
तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून
आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.
ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ
उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
तुझ्या दुतोंडी बोलण्याची तुला लाज वाटली पाहिजे.

तू म्हणतोस तरुणानि राजकारणामध्ये आले पाहिजे.
एक तर तू तरुण राहिला नाहीस तरी सुद्धा politics join कर.
मग बोल. तू म्हणशील मी राजकारण मध्येच आहे पण हे चूक आहे कारण तू राजकारण नाही
तर तुमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा जॉईन केला आहेस.
पहिल्यांदा RAUL VINCI नावाने एक निवडणूक जिंकून दाखव, आणि मग तू म्हण कि
राजकारणामध्ये पडा म्हणून.

आणि तोपर्यंत तरी लोकांना तुझ्या दृष्टीने तरुण तडफदार राजकारण्यांची उदाहरणे
देऊ नकोस ज्या मध्ये तू सचिन पायलट, मिलिंद देओरा,नवीन जिंदाल या सारख्या
लोकांची नवे घेतोस.

ते सुद्धा तुझ्या सारखेच राजकारणी आहेत. फमिली बिसनेस पुढे नेणारे.
अभिषेक बच्चन ज्या प्रमाणे हिरो झाला तसेच तुम्ही सगळे कच्चे बच्चे आहात .

सामान्य आणि शिक्षित माणूस का राजकारणी बनू शकत नाही ?

राहुल बाबा तुझ्या बाबांनी मारण्यापूर्वी भरपूर पैसा स्वताच्या व कुटुंबाच्या
नावावर स्विस बँकेमध्ये ठेवला होता. सामान्य माणसाला इथे पोट भरण्यासाठी खूप
धडपड करावी लागते.
जर तुझ्या बाबांनी आमच्यासाठी काही करोड आमच्या account वर ठेवले असते तर आम्ही
हि राजकारणी झालो असतो.
पण तसे काही नाहीये, आम्हाला जगण्यासाठी काम करावे लागते. फक्त स्वतासाठी नाही
तर तुझ्यासारख्या राजकारणी लोकांसाठी हि काम करावे लागते.
कारण आमच्या INCOME मधील ३०% पैसा कर म्हणून आम्ही सरकारकडे भरतो आणि तोच पैसा
हळूच खोट्या नावानी तुमच्या स्विस account ला TRANSFER होतो.

म्हणून बाबा जास्त वाईट वाटून घेऊन नकोस कि भारतातील तरुण लोक राजकारणा मध्ये
येत नाहीत. कारण आम्ही आमची पूर्ण शक्ती लाऊन तुझ्या राजकीय दौरे आणि तुझ्या
helicopter च्या भाड्याचे पैसे जमवत आहोत.
आता तूच संग कोणाला तरी तुमच्यासारख्या राजकारणी लोकांसाठी पैसा जमा करावाच
लागेल ना?

आता हे सगळे ऐकून तुला स्वताची लाज वाटली तर तुझ्या मध्ये १ तरी गुण आहे भारतीय
असल्याचा असे वाटेल. पण त्याची तीळ मात्र शक्यता नाही.

भारतातील कोणत्याही भागाविषयी बोलण्याचा तुला अधिकार नाही कारण तुझे नाव RAUL
VINCI आहे. (passport वर राहुल गांधी चे नाव RAUL VINCI आहे हे अतिशय घृणास्पद
बाब आहे )

आपल्या देशाच्या राजकारणा मध्ये असणाऱ्या या गांधी परिवाराकडून वरील काही
प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे.

मित्रांनो अजून माहिती साठी तुम्ही Dr. सुब्रामानियाम स्वामी यांच्या बद्दल ची
माहिती शोधू शकता.
तीच एक व्यक्ती आहे ज्यांनी 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे या विषयावर एकही प्रतिक्रिया नाही ?
सोनिया बद्दल जे लिहिले ते खरे आहे. कॉन्ग्रेस तर्फे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करायला गेल्या होत्या बाई, त्या मिटीन्ग नन्तरच म्हणाल्या की मी पंतप्रधान होणार नाही. त्याग बिग करायचा असता तर तो दावा करायच्या आधीच केला असता ना.
कदाचित अशी भिती वाटली असेल की घरातला जो कोणी पंतप्रधान होतो त्याच्या नशिबात अपमृत्यु दिसतोय. या हिशोबाने तर राउल बाबा पण पियम होणार नाही, पण रिमोट कन्ट्रोल होईल असे वाटते.

आधीच वाटोळे झालेलेच आहे देशाचे, अजून काय व्हायचे राहिले आहे?

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर केवळः

१. हॅन्डसम दिसतो व आई गेलेली असूनही सर्वांना स्वतःच धीर देत आहे

२. गांधी / नेहरू यापैकी एक आहे

३. इतर कोणीही 'कॅरिश्मॅटिक' माणूस नाही आहे

या तीन समजांपायीच राजीव गांधी पंतप्रधान झालेले होते. लोक म्हणतात त्यांनी महासंगणक वगैरे आणला. पंतप्रधान असल्यावर इतके तर करावेच लागणार ना?

कैच्याकै! हे राहुल गांधी कोण हा प्रश्न विचारण्याआधी मुळात राजीव गांधीच कोण हा प्रश्न विचारायला हवा होता. पण आपला देश सेन्टिमेन्ट्सवर चालतो. 'बिच्चार्‍याची आई अशी गेली ना?' आता त्यालाच करा पंतप्रधान! नुसते सगळे अमिताभ बच्चनी आणि रजनीकांती विचार करणारे! राजीव गांधी कोण हा प्रश्न विचारला की आपोआप पुढचे प्रश्न विचारावेच लागणार नाहीत!

अर्थात, इतके करूनही भाजप चांगला असे नाही ते नाहीच!

कोणीच चांगले नाही.

हा कस्ला आलाय औत्सुक्याचा विषय..? ही माहिती जुनीच आहे.. "गांधी" ना दोष देण्यापेक्षा एव्हडे सर्व माहित असूनही त्यांच्या पायावर लोळण घेणार्‍या आपल्याच नेत्या जेत्यांना आणि गांधींच्या पक्षाला तेही दोनदा निवडून देणार्‍या लोकांना हे जाब विचारायला हवेत नाही?
रच्याकने: या "बायोडेटा" शी भाजपा, संघ, आणि मोदी यांचा सुतराम संबंध नाही हा डिस्क्लेमर टाकून ठेवा आधीच Happy

आपण एकंदरीतच अमेरीकेचे अनुकरण करतो आणि गोत्यात येतो. त्यांनी बुश सरकार ला दोनदा निवडून दिले आणि अमेरीका नसत्या ऊद्योगात अडकून कर्जबाजारी झाली. आपण दोनदा काँ. सरकार ला निवडून दिले आणि सगळाच "घोटाळा" झाला!
असो.

झक्कास....

बेफिकीर,

राजीव गांधी बाबतीतच्या आपल्या मताशी असहमत.
आपल्या देशातील 'ईलेक्ट्रानिक क्रांती' चे श्रेय काही अंशी राजीवजी आणि त्यांच्या द्रष्ट्या टिम जसे सॅम पित्रोडा ई ना जाते.

आणि महासंगणक त्यांनी आणला नाही, तर आपण बनवला कारण अमेरिकेने, आपण त्यांना डोईजड होऊ, ह्या भितीने आपल्याला दिला नव्हता.

बाकी राहुल आणि सोनिया गांधी ह्यांचे बद्दल तर बोलणेच नको. कितीतरी गंभीर गोष्टी दाबल्या जाताहेत

आपल्या देशातील 'ईलेक्ट्रानिक क्रांती' चे श्रेय काही अंशी राजीवजी आणि त्यांच्या द्रष्ट्या टिम जसे सॅम पित्रोडा ई ना जाते.>>>

त्या काळात कोणत्याही पी एम ला ती करावीच लागली असती. काम केल्याचा पगार मिळतो. काम केल्यामुळे पुतळे उभारले जात नाहीत. राजीव गांधी महान ठरले.

आपण एकंदरीतच अमेरीकेचे अनुकरण करतो आणि गोत्यात येतो.
पण कामाला वेळेवर येणे, रोजच्या कामात भ्रष्टाचार न करणे, ठरलेले काम पूर्ण केल्याशिवाय घरी न जाणे इ. गोष्टींचे अनुकरण केल्यास फायदाच होईल असे वाटते. हळू हळू आय टी क्षेत्रात तरी हे दिसू लागले आहे म्हणे.

"जामोप्या हे बोस्टन प्रकरण माहित नव्हते." अनुमोदन, खरे असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, मागे असाच एक मेल आला होता त्यांची सगळ्यांची अनेक लफडी आणी लग्नं याविषयी...

"जामोप्या हे बोस्टन प्रकरण माहित नव्हते." अनुमोदन
खरे असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, मागे असाच एक मेल आला होता त्यांची सगळ्यांची अनेक लफडी आणी लग्नं याविषयी...>> हो मलाही असा एक मेल आला होता..

हा कस्ला आलाय औत्सुक्याचा विषय..? ही माहिती जुनीच आहे.. "गांधी" ना दोष देण्यापेक्षा एव्हडे सर्व माहित असूनही त्यांच्या पायावर लोळण घेणार्‍या आपल्याच नेत्या जेत्यांना आणि गांधींच्या पक्षाला तेही दोनदा निवडून देणार्‍या लोकांना हे जाब विचारायला हवेत नाही? >>>>>>>>
अनुमोदन. पण करणार काय, दिसला पंजा कि मार शिक्का एवढचं काहींना माहीत आहे.

मला आलेला एक ई-मेल....

भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL VINCI आहे.
तुम्...ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात. जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.
ज्यांनी घरात घेतले आणि ज्यांनी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतले ते सुद्धा जवळ उभे करणार नाहीत हे लक्षात ठेव. सप्टेंबर २००१ मध्ये तुला एफ.बी.आइ ने बॉस्टोन विमानतळावर का अटक केली होती रे?
तुला आठवत नसेल तर मी सांगतो. अरे तुझ्याकडे $1,60,000 इतकी रोकड होती. आणि इतकी मोठी रोख रक्कम कशासाठी आहे हे जेंव्हा तुला पोलिसानि विचारले तर त्याचे उत्तर देता आले नाही तुला. अजुन एक गोष्ट अशी की तुझ्या बरोबर तुझी कोलंबिया ची मैत्रीण वरॉनिका कॅरटेली ही होती, ती एका ड्रग माफिया ची मुलगी आहे हे वेगळे सांगायला नको.
९ तास राहुल गांधीला विमानतळावर थांबवून ठेवले होते. नंतर आपले पंतप्रधान वाजपेयीजी यांनी मध्यास्ती करून सोडवण्याचा प्रयत्न केले. एफ.बी.आइ ने एफ.आइ.आर नोंदवून मग या भारताच्या युवराजाला सोडले. म्हणूनच राहुल बाबा जगात कुठे ही जाईल पण अमेरिकेचे नाव काढल्यावर त्याच्या आंगवर अजुन ही काटा येतो. एफ.बी.आइला याविषयीची इन्फर्मेशन विचारली असता ते एन.ओ.सी मागतात राहुल गांधी कडून.
का एन.ओ.सी मागतात हे गूढ राहुल गांधी आणि त्याची आईच सांगू शकते. त्यावेळी सुब्रमाण्यम स्वामीने राहुल गांधीला पत्र लिहिले की जर तुमच्याकडे लपवण्या सारखे काही नाही तर NOC का देत नाही एफ बी आइ ला ? येऊद्या की सगळी माहिती बाहेर.पण राहुल बाबा ने त्या पत्राला कधीच उत्तर दिले नाही. :)जरा राहुल गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.राहुल गांधीला Harvard university मध्ये प्रवेश मिळाला तो सुद्धा donation quota मध्ये कारण राजीव गांधीचे सरकार असताना हिंदुजा नि (आता हिंदुजा म्हणजे कोण हे वेगळे सांगायला नको) ११ करोड रुपये donation दिले होते. नंतर अगदी ३ महिन्यामध्येच याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.(माफ कर राहुल पण त्या कॉलेज चा dean मनमोहन सिंग नव्हते नाहीतर तुला अजून संधी मिळाली असती, पण जगात एकच मनमोहन सिंग आहे. )काही ठिकाणी अशी माहिती आहे कि राजीव गांधीच्या झालेल्या खुनामुळे तुला काढून टाकले. कदाचित असेल हि पण मग तू सगळीकडे असे का सांगत फिरत आहेस कि तू हार्वर्ड university मधून Masters in Economics पूर्ण केले आहेस. Dr. SUBRAMANIYAM स्वामी हे ज्या वेळी तुला तुझ्या गुणपत्रिका आणि biodata बद्दल विचारतात यावर तुझ्या कडून कधीच काही उत्तर का आले नाही. कारण तुला हार्वर्ड मधून काढून टाकले होते, तुझे शिक्षण पूर्णच झाले नाही. तू हिंदी मध्ये नापास झालास म्हणून तुला UNIVERSITY ने काढून टाकले. आता जरा विचार कर कि भारतातील एका अशा राज्याचे प्रतिनिधित्व करतोस जिथे सगळ्यात जास्त हिंदी बोलली जाते.
आहे न मज्जा भारतामध्ये !!!! आता सोनिया गांधीच्या शिक्षणा बद्दल बोलू.
सोनिया गांधीने शप्पथ घेऊन सांगितले होते कि त्या university of Cambridge मधून इंग्रजी शिकल्या आहेत. पण हे जेंव्हा Cambridge ला विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कि या नावाची कोणतीही विद्यार्थिनी आमच्याकडे नाही आणि नव्हती. या खोटेपणाबद्दल हि Dr. Subramaniyam स्वामी यांनी केस टाकली होती या गांधी परिवार विरुद्ध. सोनिया गांधी साधी हायस्कूल सुद्धा पास नाही. ती फक्त पाचवी पास आहे. ठरवा आता कसले लोक भारताला चालवत आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी तू लोकल ट्रेन ने प्रवास केलास !!!
election कॅम्पेन साठी तू कोण गावकर्याच्या घरी जाऊन राहिलास.
आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!! वाह!! वाह!! वाह!! आणि तू youth icon झालास.... देशातील २५ लाख लोक रोज ट्रेनमधून प्रवास करतात आणि तू एक दिवस प्रवास केलास आणि तू youth icon अवार्ड जिंकलास !!!
हजारो पोस्टमन रोज गावागावा मध्ये जाऊन लाखो गावकर्यांना भेटतात आणि एक दिवस तू भेटलास म्हणून तुला youth icon अवार्ड मिळाले .. वाह !!! वाह !!! राहुल तू यंग हि नाहीस आणि इकॉन तर नाहीच नाही.
ज्या वेळी तुला youth icon अवार्ड मिळाले त्या वेळी राहुल द्रविड हि त्या स्पर्धेमध्ये होता. आणि तू त्याला हरवून youth icon बनलास .. सगळे हास्यास्पद आहे.

सोनिया गांधीचा जावई रॉबर्ट वधेरा देखिल अत्यंत करप्ट आहे असे यू ट्यूबवर व्हिडीओज आहेत . म्हणजे हे गांधी खानदान देशाला पूर्ण रसातळाला नेण्याची तयारी करत आहे.आता लोकांनी खरच कुठल्या पार्टीवर विश्वास ठेवायचा?

गणेशा,

तुम्ही दिलेल्या दुव्यात केवळ दावा केलाय.
इथे तर मूळ प्रमाणपत्रच दिलंय. पहा राउल व्हिन्सी एका विषयात नापास झालाय.

असो.

राजीव गांधीने श्रीलंकेत तमिळींविरुद्ध का सैन्य पाठवलं ते कळत नाही. इंदिरा गांधीपासून तामिळी वाघ हे भारताच्या जमेच्या बाजूस (assets) होते. अचानक राजीव गांधीला उपरती का झाली?

कोणास ठाऊक आहे का?

आ.न.,
-गा.पै.

राजीव गांधीने श्रीलंकेत तमिळींविरुद्ध का सैन्य पाठवलं ते कळत नाही. इंदिरा गांधीपासून तामिळी वाघ हे भारताच्या जमेच्या बाजूस (assets) होते. अचानक राजीव गांधीला उपरती का झाली?

कोणास ठाऊक आहे का?>>>>>

तमिळिंविरुद्ध पाठ्वले होते होय, मला आजवर वाटायचे की आपल्या श्रीलंकेतील तमिळांना शांतता प्रदान करण्यासाठी शांतिसेना पाठवली. तमिळींविरुद्धच पाठवले असेल तर त्यांना भारतरत्न ऐवजी श्रीलंकरत्न द्यायला हवे होते.

( मुळ प्रकार असा होता याची कल्पनाच नसलेला बावळट बाहुला)

-'बेफिकीर'!

पण केतकर मात्र लोकसत्ताला सोडचिठ्ठी देवून आता दिव्य मराठीशी नविन घरोबा केल्यावर देखिल असले फालतू लेख प्रसवत आहेत्.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-rahul-gandhi-is-new-pm-24181...
जित्याची खोड दुसरे काय?परवा सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीसाठी मोदी यांस जबाबदार धरण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आणि आज मोदींना पुर्वी व्हिसा नाकारणार्‍या अमेरिकेने चक्क मोदींना २०१४ च्या निवडणूकीत पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असल्याचे सांगत चक्क मोदींनी केलेल्या विकासकामांची स्तुती केलीय ...आणि त्याजबरोबर राहुलच्या कर्तबगारीची पिसे देखिल काढली आहेत..........आज सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, तमाम काँग्रेसजन्,व गांधी घराण्याची तळी उचलून धरणारे केतकरांसारखे पत्रकार यांची झोप पार उडाली आहे हे मात्र निश्चित
अवांतर- काँग्रेसने एकदाचे केतकरांना राज्यसभेचे तिकिट देवूनच टाकावे म्हणजे निदान असले हुजरेगिरी करणारे लिखाण वाचण्यापासून तरी मुक्तता होईल पामरांची

राहुल गांधी- एक औत्सुक्याचा (?) विषय.... >>> शिर्षकावरुन मला आधी वाटलं , राहुल गांधीला चार पाय आणि शिंग फुटली की काय ? काय आहे त्याच्यात , किंवा त्याने असं काय करुन दाखवलयं की तो औत्सुकतेचा विषय होईल ? खानदानाच्या नावाशिवाय आहे काय त्याच्याकडे ?त्याच्या नावातुन गांधी काढुन टाकलं तर फक्त शुन्य उरेल.

>>>> राजीव गांधीने श्रीलंकेत तमिळींविरुद्ध का सैन्य पाठवलं ते कळत नाही. इंदिरा गांधीपासून तामिळी वाघ हे भारताच्या जमेच्या बाजूस (assets) होते. अचानक राजीव गांधीला उपरती का झाली? <<
माहितीकरता म्हणून सान्गू पहातो (लगेच टान्गाय्ला उठू नका Proud )
मूळात श्रीलन्कन सैन्याचे तामिळ प्रदेशावरचे अत्याचार वाढीस लागले म्हणून सुरवातीला तरी तिथे तामिळीन्च्या संरक्षणासाठीच सैन्य पाठविले गेले, त्यावेळची वृत्तपत्रे/मिडीया तरी तेच सान्गत होता. सुरवातीला सैन्याने ते उद्दीष्ट पारही पाडले, पण नन्तर अचानकच, बहुधा आन्तरराष्ट्रीय दबावापुढे झुकुन वा अन्य कारणाने सरकारी धोरणे फिरली, व वृत्तपत्रे/मिडीयासहित बातम्या वेगळ्याच प्रसारित करु लागले, त्यावरुन कळले की "भारतीय सैन्य" शान्तता रक्षणासाठि गेले असुन "तामिळ दहशतवादाचाही" मुकाबला करेल.

लिंबूटिंबू, हे नवीनच आहे माझ्यासाठी! Uhoh सांगितल्याबद्दल धन्यवाद.

झाम्या बुशने अफगाणिस्थानात सैन्य घुसवलं २००१ साली तेव्हा त्याचं वरकरणी सोंग होतं तिथे लोकशाही प्रस्थापित करण्याचं. आता राजरोसपणे पाकिस्तानात घुसून राहिलेत अमेरिकन. माझी समजूत होती की ते पहिलं टोपीबदलू युद्ध आहे. याआधीही असा काही उपद्व्याप केला होता हे ऐकून मौज वाटली. अर्थात राजीव गांधीला त्याची भरमसाट किंमत चुकवावी लागली!

तर आंतरराष्ट्रीय दबाव काय पडला असेल? असले दबाव झुगारून देण्यात इंदिरा गांधी पटाईत होत्या. भारत सरकारची अधिकृत भूमिका काय होती? यादृष्टीने अधिक माहिती मिळाल्यास उत्तम.

आ.न.,
-गा.पै.

माझ्या माहितीप्रमाणे भारताने पाठवले नसते तर इतर कोणत्यातरी देशाने पाठवले असते - लंकेच्या सरकारला एकट्याला हे लढणे अवघड झाले होते. पाक व बांगलादेश हे "होस्टाईल" शेजारी असताना लंकेतही भारताला अनुकूल नसलेल्या देशाचे सैन्य येउन बसले असते व कदाचित कायमचा तळ पडला असता. म्हणून एक चाल म्हणून हे केले गेले. त्याचे परीणाम वाईट झाले असतील पण एक शक्यता आहे की हा निर्णय देशहितासाठी घेतला गेला असावा Happy

आणि त्याजबरोबर राहुलच्या कर्तबगारीची पिसे देखिल काढली आहेत
>>
राहुलची कर्तबगारी? हे म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला oxymoron म्हणतात तसे झाले. Biggrin

जामोप्या, शीर्षकावरुन खरेच गैरसमज होतोय. मला आधी अजिबात उत्सुकता नव्हती हे वाचायची.

गांधी या आडनावाबाबत इथे माहीत नाही का कुणाला ? इंदिराबाईंचे लग्न ज्या फिरोझ या पारशी माणसाचे झाले त्याचे मूळ आडनाव दारुवाला असे होते. नेहरुंच्या आग्रहावरुन ते बदलण्यात आले. किती दूरदर्शीपणा ना !

ते शीर्षक आणि सगळा मॅटर कॉपी पेस्ट आहे.. मला इ मेल आला त्यात हे सगळे जसेच्या तसे होते.. शीर्शकही तेच होते

Pages