सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.
आंतरजालावर जसं चांगलं आहे तसच निषिद्धही बरच काहि आहे. श्लील अश्लील वगैरेच्या आपल्या कल्पनांना हादरे बसतील असं बरचसं..
जालामुळं विचारसरणी, संस्कृती वगैरे वगैरे मधे वेगाने फरक पडतोय का ? आजवर स्त्री पुरूष ज्या बाबतीत एकमेकांशी बोलायला देखील टाळत होते अशा गोष्टींवर येणा-या काळात फोरममधे चर्चा घडून येतील का ?
अशा चर्चा घडून आल्यास त्या चर्चेत सहभागी होणारे लोक असंस्कृत म्हणवले जावेत का ? कि जाहीर वक्तव्ये केल्याने कुणी विकृत ठरू शकेल ? समलिंगी संबंधांना प्रतिष्ठा प्राप्त होत असताना एखाद्याने त्यावर चर्चेचे आवाहन केले तर आपण त्या व्यक्तीला आंबटशौकीन म्हणणार का ?
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत रूढींच्या पाशात अडकलेल्या आणि कमालीचं जडत्व आलेल्या महाराष्ट्रीय समाजाला नव्या विचारांचं वारं लागावं, म्हणून अनेक समाजधुरिण प्राणपणानं लढले. बुरसटलेले विचार आणि परकीय सत्तेचा पाश अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत या मंडळींनी एका पुराणप्रिय समाजाला डोळे उघडे ठेवून बघायला, स्वतःच्या डोक्याचा वापर करून विचार करायला शिकवलं. ज्यांचा मुक्तपणे जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता, अशा विधवांना आणि दलितांना मोकळा श्वास महाराष्ट्रातल्या काही सुधारणावाद्यांमुळेच घेता आला. या सुधारणावाद्यांनी सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह केला, पण विवेकाच्या आधारानं.
नमस्कार मंडळी...
हा धागा मराठी, हिंदी, तसेच इंग्रजी या भाषांतील "सुविचार" इथे एकत्रित करणे, या हेतुने बनविला आहे. इथे आपण स्वत:चे किंवा एकलेले, आठवलेले 'सुविचार' "प्रतिसाद" रुपात देउन आपली "सुविचारांची संस्कृती" जतन करण्यास हातभार लावु शकता.
इथे सर्व प्रकारचे 'सुविचार' आपण देउ शकता..त्यामुळे "सुविचारांना" कोणतीच 'सीमा' नाहीय. अगदी आपल्या दररोजच्या व्यवहारात सहजच मनात आलेले लहान-सहान विचार, सुबोध प्रसंग, जे काही क्षण डोक्यात प्रकाश पाडुन जातात, जे कुणाशी तरी 'शेअर' करावे.., असे वाटतात पण ज्यासाठी वेगळा 'धागा' काढणे शक्य होत नाही.
समकालीन प्रकाशनच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ६ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाली. किंमत फक्त रु.१२५/-. पृष्ठे १०७.
आपल्याला राग का येतो? आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसर्याच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसर्याचा राग का येतो? तर अहंकार दुखावला जाणे, घाई असणे, अपेक्षाभंग होणे आणि नकारात्मक विचारात तल्लीन असणे ह्यामुळे राग येतो. थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो.
अहंकार
कृपया स्वतःला खो मिळाल्याशिवाय लिहू नये. तुम्हाला लिहायची इच्छा असल्यास तुम्ही खो मागू शकता. प्रत्येकाने खो शिवाय लिहिले तर संपूर्ण उपक्रम गोंधळाचा होईल. हे या खेळाचे नियम आहेत ते पाळून सहकार्य करावे. खो घेण्याची इच्छा असूनही खो मिळाला नाही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला आपले मत मांडण्याची संधी नक्कीच मिळेल.
संयोजक खो (३)- सिंडरेला
सिंडरेला खो (१)- वैद्यबुवा, सिंडरेला खो (२)- नताशा-एक फुल
किंवा आगाऊ
आगाऊ खो (१)- दाद , आगाऊ खो (२)- नानबा
वैद्यबुवा खो (१)- साजिरा, वैद्यबुवा खो (२)- मैत्रेयी