गेले काही दिवस बर्याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.
१. विषमज्वर- टायफाइड
२. आतड्याचा अॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.
३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.
महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?
"लग्न"-१ इथे.
हिंदी सिनेमांमधल्या लग्नांचा प्रवास सुरु होतो ’ पहली मुलाकात’ पासून. आता ही टिपिकल मुलाकात सुद्धा कशी तर ’तिला’ पाहून ’त्याने’ प्रेमात पडायचे आणि तिने मात्र दुर्लक्ष करायचे. रागवायचे, अगदी तुसड्यासारखे वागायचे. असं केल्याशिवाय छेडछाडीचा स्कोप कसा मिळणार? क्वचित दोघेही एकमेकांना पाहून डायरेक्ट प्रेमातच पडल्याचीही उदाहरणे आहेत.. आंखो ही आंखो में.. असं म्हणत.
पण थोडक्यात काय तर पहली मुलाकात आवश्यकच.
सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.
आंतरजालावर जसं चांगलं आहे तसच निषिद्धही बरच काहि आहे. श्लील अश्लील वगैरेच्या आपल्या कल्पनांना हादरे बसतील असं बरचसं..
जालामुळं विचारसरणी, संस्कृती वगैरे वगैरे मधे वेगाने फरक पडतोय का ? आजवर स्त्री पुरूष ज्या बाबतीत एकमेकांशी बोलायला देखील टाळत होते अशा गोष्टींवर येणा-या काळात फोरममधे चर्चा घडून येतील का ?
अशा चर्चा घडून आल्यास त्या चर्चेत सहभागी होणारे लोक असंस्कृत म्हणवले जावेत का ? कि जाहीर वक्तव्ये केल्याने कुणी विकृत ठरू शकेल ? समलिंगी संबंधांना प्रतिष्ठा प्राप्त होत असताना एखाद्याने त्यावर चर्चेचे आवाहन केले तर आपण त्या व्यक्तीला आंबटशौकीन म्हणणार का ?
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत रूढींच्या पाशात अडकलेल्या आणि कमालीचं जडत्व आलेल्या महाराष्ट्रीय समाजाला नव्या विचारांचं वारं लागावं, म्हणून अनेक समाजधुरिण प्राणपणानं लढले. बुरसटलेले विचार आणि परकीय सत्तेचा पाश अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत या मंडळींनी एका पुराणप्रिय समाजाला डोळे उघडे ठेवून बघायला, स्वतःच्या डोक्याचा वापर करून विचार करायला शिकवलं. ज्यांचा मुक्तपणे जगण्याचा हक्कच नाकारला गेला होता, अशा विधवांना आणि दलितांना मोकळा श्वास महाराष्ट्रातल्या काही सुधारणावाद्यांमुळेच घेता आला. या सुधारणावाद्यांनी सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह केला, पण विवेकाच्या आधारानं.
नमस्कार मंडळी...
हा धागा मराठी, हिंदी, तसेच इंग्रजी या भाषांतील "सुविचार" इथे एकत्रित करणे, या हेतुने बनविला आहे. इथे आपण स्वत:चे किंवा एकलेले, आठवलेले 'सुविचार' "प्रतिसाद" रुपात देउन आपली "सुविचारांची संस्कृती" जतन करण्यास हातभार लावु शकता.
इथे सर्व प्रकारचे 'सुविचार' आपण देउ शकता..त्यामुळे "सुविचारांना" कोणतीच 'सीमा' नाहीय. अगदी आपल्या दररोजच्या व्यवहारात सहजच मनात आलेले लहान-सहान विचार, सुबोध प्रसंग, जे काही क्षण डोक्यात प्रकाश पाडुन जातात, जे कुणाशी तरी 'शेअर' करावे.., असे वाटतात पण ज्यासाठी वेगळा 'धागा' काढणे शक्य होत नाही.

समकालीन प्रकाशनच्या ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ६ मार्च २०११ रोजी प्रकाशित झाली. किंमत फक्त रु.१२५/-. पृष्ठे १०७.