भारत

देश ! आपलाच आहे..........!

Submitted by अनुराधा म्हापणकर on 16 August, 2016 - 01:55

सत्तर वर्ष झाली..
काय काय बोलायचं?
न बोललेलंच बरं..
देश आपलाच आहे...
किती लक्तरं आणखी
आपणच वेशीवर टांगायची.. ?

अजूनही या देशात
जात सांगावी लागते
जातीच्या नावाखाली
आरक्षण मागावे लागते
सांगावा लागतो धर्म
अल्पसंख्याक आहे..
हेही नमूद करावं लागतं
बाकी.. जातीधर्मावरचे दंगल दहशतवाद...
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे.............. !

दिला जातोय नरबळी
अंधश्रद्धा अजूनही घेतेय
सुशिक्षितांचे बळी..
अजूनही लागतोय शाईचा अंगठा
आणि शिकणा-यासाठीही
आड येतोय कोटा..
बाकी.. अॅडमिशन्स.. डोनेशन्स..
न बोललेलंच बरं..
देश ! आपलाच आहे................!

शब्दखुणा: 

६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

शब्दखुणा: 

‘इधर के’ आणि ‘उधर के’

Submitted by अश्विनी के on 18 January, 2016 - 00:43

नुकतीच पासपोर्टच्या व्हेरिफ़िकेशनसाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. डॉक्युमेंट्स दिल्यावर तिथल्या माणसाने त्यांच्या मोठ्या साहेबांच्या सहीसाठी २ तासांनी परत यायला सांगितलं. पण जा-जा ये-ये करण्यात वेळ गेला असता, शिवाय या कामासाठी रजा काढलीच होती, तर तिथेच थांबावं असं मी ठरवलं. पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम झालेलं दिसत होतं. पासपोर्ट व्हेरीफिकेशनचा विभाग पोलीसस्टेशनच्या सर्वसाधारण विभागांपासून वेगळा काढलेला होता. त्यामुळे जागा भरपूर होती, बसायला बाकंही होती. तिथे काही बायका-पुरुष बसलेले होते.

विषय: 

आता भारत पाक संबंध पुन्हा बिघडणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2016 - 04:25

पठाणकोट इथे काल दहशतवादी हल्ला झाला. त्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले. त्या सर्वांना श्रद्धांजली.

आज कदाचित एखाद्या वृत्तपत्रात अशी बातमी येईल की त्या हल्ल्यामागे पकिस्तानचा हात असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला मात्र खात्री आहे की पाकिस्तानचाच हात आहे.
नुकतेच मोदी पाकिस्तानचा धावता दौरा करून आल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांच्या चर्चेलाही उधाण येणार हे नक्की.

या चर्चेतून दोन विचारधारा समोर येणार, एक जी सहजरीत्या येते. घुसा पाकिस्तानात आणि नायनाट करून टाका त्यांचा.

विषय: 
शब्दखुणा: 

उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2015 - 01:56

आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.

माणुसकीचा येता गहिवर

Submitted by कोकणस्थ on 19 December, 2014 - 21:29

माणुसकीचा येता गहिवर
आठवा त्यांचे अत्याचार
लुटलेली माताभगिनींची अब्रू
अन् स्वाहा केलेले घरदार

युद्धामध्ये सातत्याने
खाल्ली माती झाली हार
मग सोडले जिहादी पिल्लू
अन् सुरु जाहले अत्याचार

ठेउनी जा तुमच्या बायकापोरी
ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार
भोसकलेले कोवळे जीव
अन् माजवलेला हाहा:कार

काश्मीरी शालीवर पडली
आमच्याच रक्ताची लाली फार
काश्मीरी जनता जाहली
पाकी गोळ्यांची शिकार

समाधान होईना तयांचे
बॉम्बस्फोटांनी केले बेजार
अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले
आई-बाप अन् मित्रही फार

शरीरात आजही काचा

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

कार्यक्षम नेता की स्वछ नेता

Submitted by राजु ठाकरे on 4 March, 2014 - 05:58

ह्या धाग्याच खर नाव अ‍ॅडमिरल जोशी यांनी राजीनामा का दिला अस करायच मनात होत.

आपल्याला अवगत असेल की आत्ताच झालेल्या नेव्हीच्या सिंधुरत्न या पाणबूडीमध्ये परीक्षणा दरम्यान
आग लागली आणि नौदलाने दोन अधिकार्यांना गमावले. ह्या अधिकार्यांनी आपल्या जिवावर उदार होउन पाणबुडीमध्ये त्यावेळेला असलेल्या इतर सर्व अधिकारी, नौसैनीकांना वाचवल, पण स्वता:ला वाचवू शकले नाहीत.

आता टाईम्सच्या हातात आलेल्या पुराव्यानुसार नौदलाने तिन तिन पत्र पाठवून केंद्रीय मंत्र्यांकडे पाणबूडीला
आवश्यक असणार्या बॅटर्यांची पुर्तता करण्या बाबत पाठपुरावा केला होता, पण आपले स्वछ प्रतिमा असलेले

छद्मयुद्ध-२

Submitted by सोन्याबापू on 12 December, 2013 - 08:36

छद्मयुद्ध-१ इथे वाचा

http://www.maayboli.com/node/46780

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
छद्मयुद्ध-२

एपीसोड १ - खुलासा
स्थळ - रॉ हेड क्वार्टर्स, दिल्ली

विषय: 

छद्मयुद्ध-१

Submitted by सोन्याबापू on 12 December, 2013 - 08:14

खालील कथा ही पुर्णपणे काल्पनिक असुन तिचा वास्तविक व्यक्ती, स्थळे, घटना ह्यांचयाशी काही संबंध नाही तसा आढळल्यास तो मात्र एक योगा योग समजावा

छद्मयुद्ध -१

एपीसोड १ :- रुटीन
स्थळ :- प्रोफ़ेसर्स रेसिडेंट क्वार्टर्स,खान रिसर्च लेबॉरेटोरी, कहुटा, पाकीस्तान
वेळ :- सकाळी ०८००

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भारत