भारत
सात दिसांचे सात पूरांचे गाणे
विटांवर उभा राहून येतो अरूण उगवण्यासाठी
इटानगरला जाऊन येऊ अरूणाचलप्रदेश साठी
.
कोय खाऊनी नाग झोपला काय करावे त्याचे
कोहीमाला जाऊन येऊ नागालॅंडच्या साठी
.
पूर मण्यांचा इथे फालतू मणी फार ते झाले
इंफालला जाऊन येऊ मणीपूरच्या साठी
.
एकच सवाल तुझा राम की माझा राम म्हणावे
ऐझवालला जाऊन येऊ मिझोरामच्या साठी
.
मगर तलावामधे खातसे तीन पुऱ्यांची पार्टी
अगरतलाला जाऊन येऊ त्रिपुराच्या साठी
.
मेघ दाटले लय लय आता वाटे लवंग खावीशी
शिलॉंगला चल जाऊन येऊ मेघालयच्या साठी
.
इज ऑफ डुइन्ग बिझनेस !
नमस्कार!
गेली तीन वर्ष सातत्याने शेती, शेतकरी आणि कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावर स्वतः फिल्डवर काम करत आहे. या कामासाठी येणाऱ्या शासकीय, सामाजिक आणि राजकीय अडचणी समजावून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कुठलाही उद्योग उभारायचा म्हणजे अडचणी या येणारच! भारतासारख्या अतिशय क्लिष्ट रचनेच्या देशामध्ये नियमांच्या जंजाळात अडकून नवीन उद्योजकाचा गळफास बसून मृत्यू व्हावा अशी परिस्थितीवर आहे. आम्ही सारे अभिमन्यू अशा प्रकारची अवस्था उद्योजकांची झालेली असते. यातील जे लोक चक्रव्युव्ह भेदून बाहेर पडतील, ते मग यशस्वी उद्योजक म्हणून समाजात वावरताना दिसतात. त्यांचे अभिनंदन !
ऑलिंपिकोत्सव
जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या ‘कोव्हीड-19’ महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.
भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर ऑलिंपिकबाबत निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे.
नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
करोनानंतरच जग !!
करोना सारख्या संकटा नंतरच जग हे संपुर्ण बदलेल अशी मला खात्री आहे.
त्या पुर्वी करोना सारख्या संकटापुर्वच मा मोदीजींनी ज्या समयोचीत उपाय योजना राबवल्या ज्या भारताच्या फारच कामी आल्या त्या पुढील प्रमाणे ,
१ जन धन योजना :
२. आयुष योजना
३ . मन की बात मधुन सरळ जनतेशी संवाद !
४. मेक ईन ईंडिया
५. आधार कार्ड
त्या शिवाय भारत श्री रामदेव बाबाचे सुद्धा ऋणी असणार आहेत ज्यांनी कपाल भातीची सवय जन मानसाला लावली. अश्या आरोग्याच्या सवई सतत जनतेवर बिंबवल्या पाहीजेत जेणे करुन जनता अरोग्यावान राहील.
'भारत'... मान ना मान, मै तेरा सलमान!
निकालानंतरचे सामान्य माणसाचे विचार
लोकशाही धोक्यात येऊ शकते का?
मी यंदा मतदान केले नाही. कोणीही त्या योग्यतेचा वाटला नाही. ना उमेदवार ना पक्ष. हे आमच्या ऒफिसमध्ये सर्वांना ठाऊक आहे.
तर परवा निकालानंतर ऑफिसमध्ये चर्चा चालू होती. एकाने चुकीचा मुद्दा उपस्थित करताच मी तो खोडायला गेले. तसे ती व्यक्ती लगेच म्हणाली, तू मतदान केले नाहीस तुला बोलायचा अधिकारच नाही.
पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
What does a woman want?
What does a woman want? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन.
Pages
