पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला
प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे 
मी मज हरपून ...
"जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता ... " या ओळी कधीही कानावर पडल्या तरी चित्तवृत्ती उल्हसित होतात. एकटे-दुकटे फिरताना, दुरून जरी हे सूर कानावर पडले तरी आपण थबकतो, रस्त्यातच ५ मिनिटे उभे राह्तो, मायभूमीची आठवण काढतो, प्रफ़ुल्लित होतो आणि परत आपली वाट धरतो. हेच राष्ट्रगीत जेव्हा एक ४५००० लोकांचा समूह गातो, माझ्या देशाचा विजय व्हावा या साठी अंतिम क्षणापर्यन्त साथ देतो ... तेव्हा ’हरपून’ जाण्याशिवाय काही उरतच नाही !
मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत. भारतात तुम्हाला कुठल्या शहराचा कुठला वाईट अनुभव आला त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे. चांगला अनुभव आला असेल तर तेही लिहा जेणेकरुन लोकांचे समज गैरसमज टळतील.
माझा भारत देश
सारे जहाँ से अच्छा असा हा माझा भारत देश
नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा एक समृद्ध प्रदेश
अनेक ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा असे हा उन्मेश
कविकल्पित भासो अशा वैविध्यतेने नटलेला माझा भारत देश
जगात शांततेचे पुरस्कर्ते अशी आपली ख्याती
मनात वैर ठेवणाऱ्या शेजारी राष्ट्राशीही जपली नाती
मैत्रिपूर्ण हात सदैव पुढे केला न ठेवता मनात कुठलाही द्वेष
थोरल्या भावाप्रमाणे कठोर परंतु क्षमाशील भूमिका घेणारा माझा भारत देश
आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी वाढवली देशाची शान
"प्रगतीबरोबर सर्वांगीण विकास" या आपल्या पद्धतीचा आम्हा अभिमान