इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.
गेल्या तीन भागांमध्ये आपण हळूहळू ग्लोबल इकॉलॉजी ते लोकल इकॉलॉजी असा प्रवास करत आहोत. पहिल्या दोन भागांत आपण एकूण पृथ्वीच्या इकॉलॉजीविषयी थोडक्यात बोललो. तिसऱ्या भागात आपण भारताचे भौगोलिक स्थान आणि इकोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही गुणवैशिष्ट्यांविषयी गप्पा मारल्या. आता या भागात आपण केतकीशी आपल्या महाराष्ट्राच्या इकॉलॉजीविषयी गप्पा मारणार आहोत.

देशी फुलझाडांच्या मालिकेतील सहावे फुल ताम्हण.
एक मे महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करतात . विधान भवनावर रोषणाई करतात . महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आढळते अशावेळी ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात आपले स्वागत करायला रस्त्याच्या दुतर्फा ताम्हण आपली जांभळी तुरे घेऊन आपल्याला खुणावत असतो . एक मे महाराष्ट्र दिनाच्या काळात तो बहरून येतो. तो आहे आपला ताम्हण , म्हणजेच महाराष्ट्राचे राज्य फुल.
भारताच्या ट्रीप वरून कालच परतले, ह्या वेळेस राजस्थान ह्या प्रदेशाची फेरी मारली, पुष्कळ वर्ष पूर्वी कॉलेज मध्ये असताना गेले होते. राजस्थान चे मोठ-मोठे किल्ले, महाल आणि वैभव बघुन तेव्हा पण हा प्रश्न डोक्यात आला होता आणि आता परत तोच प्रश्न घेऊन परतले ...
महाराष्ट्रदेशा
भाषा मराठीचा डौल
विलक्षण गहिरासा
ओवी अभंग ओठात
अंतरात भक्तिठसा
डफ पोवाड्यांनी गर्जे
इतिहास मराठ्यांचा
तलवारीसंगे साजे
दिमाख तो भगव्याचा
शब्द रांगडे कोमल
दिले माय मराठीने
भान जगण्याचे उरी
महाराष्ट्राच्या मातीने
भाषा मराठी वसते
नित्य मुखी अंतरात
नाही लाभणार माय
शोधू जाता दुनियेत
किती जन्म झाले इथे
पांग फिटेना कधीच
लेकराची ताटातूट
माय करीना मुळीच...
जय महाराष्ट्र
जय मराठी
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला! त्यानंतर हा लढा पुढे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि नंतर पेशवे असा सर्वांनी यशस्वीपणे चालवला आणि थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले.
आजच (२८ नोव्हेंबर २०१६) महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले. मायबोलीवर सर्व भागातील जनता वावरत असते. महानगरांमधील लोक प्राधान्याने असले तरी इतर गावांमधीलही लोक असतातच. आणि बरेच लोक जे महानगरांमध्ये राहतात त्यांना त्यांच्या मूळ गावात काय चालू आहे याची हालहवाल माहिती असतेच.
आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.
स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.
भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.