असावी स्वतःची एक पायवाट
मनातून जाणारी,स्वतःलाच दिसणारी,
स्वतःमध्येच रुळलेली अन स्वतःसाठीच असणारी...
नागमोडी वळणांनी अनंतापर्यंत जाणारी...
प्रत्येक वळणावर पुढच्या प्रवासाची उत्कंठा ताणणारी...
कडेला असावेत वाऱ्यावर डोलणारे शुभ्र नभांचे तुरे...
स्पर्श करताच विरघळून स्वप्नांच्या जगात नेणारे...
गर्द निळे अवकाश असावे...
मुक्तछंद जाणिवांचे, स्वअर्थांचे राजहंसी थवे दिसावे...
शांततेत ऐकू यावा स्वश्वासांचा सुरेल मल्हार...
तर कधी थिरकावा देह, होऊनि स्वतःच बेधुंद नृत्याविष्कार...
शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव
माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ
अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार
अविश्वासाने केला शब्दांचाच घात
शब्दांनी करायची अविश्वासा वर मात
शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद
एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद
चुरा सांडता शब्दांचा
कागदावरती अंकुर फुटते..
झंकार उठतो शब्दांचा ओठांवरी
कागदावरती कविता उमटते..
प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला
रडण्यासाठी खांदा देते,.
वळण चुकलेल्या मुसाफिराला
वाटेवरी नेवून सोडते,.
पहाटे जावूनी
पारिजातकास फुलवते..
मग हळूच निसटते तेथूनी ही
ओंजळ भरुनी मोगरा वेचते..
माळते हळूच तिच्या केसांत
आणि नाव तिथे त्याचे सांगते..
प्रियकराची व्यथा सारी
ती शब्दात मांडते..
घेवूनी बाजू त्याची
ती जावुनी तिच्याशी भांडते..
कधी शब्दांच्या धुक्यात हरवते....
मी काही कवियत्री नाही. पण थोडफार लिहायला शिकतेय, प्रयत्न करतेय.
विस्तारुन धुम्रपटल
अरुणोदय झाला
चराचरातून कणाकणातून
रवि तेजोमय झाला
त्या ऊठणाऱ्या तरंगातून
उमलणाऱ्या कलीकांतून
मंदिरातील शंखध्वनीतून
स्वरनाद प्रकटला
कोंब तरारुन उठले
नवांकुर स्वागता सजले
सृष्टीच्या सृजनाचा
नवाध्याय प्रारंभला
अरुणासह उषेची स्वारी
दर्शनलाभे भल्या सकाळी
उठ उठ रे वनमाळी
रविशिखा भेटायासी आल्या
नीलाक्षी
अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर
अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)
न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर
थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर
कविता म्हणजे नेमाक काय असते
कोणाच्या मनाचा ठाव असते
तर कोणाच्या मनाचा घाव असते
कोणाच्या तरी मनाचा भाव असते
कविता म्हणजे नेमक काय असते
कोणाच्या तरी मनातली व्यथा असते
तर कोणाच्या तरी आनंदाची कथा असते
कोणाच्या तरी प्रेमाची साक्ष असते
कविता म्हणजे काय असते
कधी शब्दांचा खेळ असते
कधी शब्दांची माळ असते
तर कधी शब्दांचा जाळ असते
कविता म्हणजे काय असते
कधी आसुसलेला क्षण असते
कधी भरलेले मन असते
तर कधी स्वत्वाची जाण असते
कविता म्हणजे काय असते
कधी रंगवलेले स्वप्न असते
कधी दाटे मनात गहिवर कधी हास्याची लाट आहे
सोडून गेले सगेसोयरे अंधाराची साथ आहे
दूर टेकडीवर होता महाल त्यात होती सुवर्णशय्या
इंद्रालाही लाजवेल असा माझा थाट होता
नियतीची फिरताच चक्रे होते नव्हते सगळे गेले
सर्वस्व व्यापले अंधाराने राज्य संपले खचली हिम्मत
अंधाराच्या मगरमिठीतच प्रकाशाची कळली किंमत
दागिना
पाहिले जेव्हा तुला तेव्हाच झालो मी कवी
शब्द होते ओठांवरी नव्हती जवळ पण लेखणी
पाहिल्या कित्येक ललना नाही तुझ्यासम एकही
पक्षीही पाहून तुजला गीत गाऊ लागले
अन अशा या शांत वेळी मेघ बरसू लागले
ऐक तू आता जरा माझ्या मनातील भावना
पण गोठले ओठात शब्द पाहून गळ्यातील दागिना
काजवा
डोळ्यात तुझ्या दिसतात मजला चंद्र आणि चांदण्या
अजूनही न कळे मला तू सत्य की मनातील कल्पना
कल्पनांच्या या जगातील चंद्राळलेली रात्र तू
अन तुझ्यातच चमकतो मी स्वप्रकाशी काजवा
"मी" माझ्यातली..
सहजच फोन केला माझ्या सेमिनारला गेलेल्या मैत्रिणीला
म्हटलं बाई, कशी आहेस..
खाणं, पिणं, रहाण्याची व्यवस्था कशी आहे..बरी आहे..?
ती उत्तरली, झकास, अगदी उत्तम
हाॅटेल मस्तच आणि रुम मधे सोबतीला कोणी नाही, हे तर अति उत्तम...
नाहीतर बिन ओळखीच्या, जराशा ओळखीच्या कुणीतरी एकीने सोबतीला यावं..
आणि सोबत म्हणता म्हणता तिच्यासवे आणखीनंच एकटं व्हावं…
तशी काही वाईट नसते ती, चांगलीच असते..
पण आपली आपली नसल्याने तीही कानकोंडी होऊन बसते…