झेन

इस्ट ऑफ इडन

Submitted by केदार on 10 June, 2016 - 10:47

इस्ट ऑफ इडन - जॉन स्टाईनबॅक

सायरस हा एक सैनिक. तो ही नावालाच. त्याची ज्या जागेवर पोस्टींग होती तीथे कधी युद्ध झाले नव्हते. सायरसला खोटे बोलण्याची सवय आहे. त्याने कसे अनेक युद्धात वरिष्ठांना स्टॅटजीची मदत देउन युद्ध जिंकले असे लोकांना खोटे सांगतो. ते खोटे इतके पसरते की त्याला अमेरिक व्हाईस प्रेसिडेंट त्यांच्या युद्ध विषयक सल्लागार म्हणून नेमतात. त्यात तो भ्रष्टाचार करून खूप पैसे कमवतो.

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

से ह वा ग!

Submitted by मार्गी on 21 October, 2015 - 04:32

वीरेंदर सेहवाग! खराखुरा वीरोत्तम! क्रिकेटशी परिचित असलेल्यांना सेहवागबद्दल काहीही सांगायची गरज नाही. पण इथे सेहवाग एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर एक अभिव्यक्ती म्हणून विचार करूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक करणारा एकमेव फलंदाज (तेही दोन त्रिशतके!); अत्यंत जलद गतीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा आणि आश्चर्यकारक प्रकारे सातत्य दाखवणारा (२००९- १० मध्ये शिखरावर असताना ५४ ही कसोटी सरासरी सलामीवीर म्हणून) आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, लक्ष्मण अशा ता-यांच्या समोरही स्वत:चा वेगळा प्रभाव निर्माण करणारा असा हा वीरू!

विचारांचं मनाशी नातं

Submitted by स्वीटर टॉकर on 20 October, 2015 - 05:57

विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर

वापरून नरम पडलेले बूट पुन्हा कडक कसे करावेत?

Submitted by बाळाजीपंत on 10 July, 2015 - 01:08

नुकतेच माझे ऑफिसात जायचे काळे बूट वापरून वापरून नरम झाले आहेत. आज घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे लवकरच राम म्हणेल.

त्यामुळे बुट पायातून अलगद मधेच सटकतो.

असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी कडक होऊन पायात व्यवस्थित बसतील?

बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?

कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

प्रांत/गाव: 

नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

काल मी ' त्याच्याशी ' भांडलो , रड रड रडलो

Submitted by मस्त कलन्दर on 22 September, 2013 - 13:16

काल मी ' त्याच्याशी ' भांडलो ,
रड रड रडलो
मला माहित आहे सुखाचे क्षण खूप थोडे असतात
पण तो एक क्षण तरी माझा स्वत:चा असायला हवा होता
मला कधीच का जिंकता येणार नाही ?
ज्याने चोच दिली तो दाणा हि देतो
पण माझ्या हक्काचा दाणा कधीच का मिळणार नाही?
आतापर्यंत मनातल्या मनातच कुडत होतो
पण आता मात्र विस्फोट झाला
उजाड माळरानावर त्याची विनवणी करायला लागलो
सुरवात अर्थातच ढोंगी formality ने केली
" तुला माहीतच आहे किती अडचणी आहेत वगेरे
मला ह्यातून मार्ग पाहिचे , जर तू असशील तर ….
असं challenge वगेरे केल्याशिवाय काही होत नाही हि खुळचट भावना .
मधेच मनात विचार आला

इष्टरफाकुण्डा

Submitted by उद्दाम हसेन on 26 July, 2013 - 11:51

ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.

इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा

- Kiran..

Pages

Subscribe to RSS - झेन