'वन-विदिशा' : संरक्षण, नाश, पुनरुज्जीवन - Full Film Experiment by Rahi Anil Barve
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
पाठलाग
पाठलाग व्यर्थचि झाला त्या कस्तुरीमृगा पाठी
अत्तरही दुर्लभ झाले अन् मृगजळही नाही हाती ।।
धावला सश्याच्या मागे आंधळा खुळा शिकारी
वेगात समय निसटला सोबत कुणी ना साथी ।
तेजाचा किरण पाहण्या धुंडाळली रात्र सारी
उदयाच्या उषःकाली ज्योतीस मिळेना वाती ।
सौख्याच्या लोभापोटी वेदना मनी दडविली
भाग्याची रेषही पुसली नैराश्य रिकाम्या माथी ।
मरण्याचे कोडे सुटले पण जिंदगी अपुरी पडली
मातीतुनीच उगवलो अन् व्हायचे अखेर माती ।।
- यःकश्चित
काळोखाच्या साम्राज्यातून जन्म घेत असते पहाट क्षणो क्षणी
प्रकाशाला गिळून पुन्हा एकदा पुढे सरकतो अंधार क्षणो क्षणी
अविश्वासाच्या भिंती फोडून अवतरतो विश्वास क्षणो क्षणी
विश्वासाचा बळी घेऊन पुन्हा 'मी' म्हणतो अविश्वास क्षणो क्षणी
दुखा:च्या खोल खायीतून वर येत असते सुख: क्षणो क्षणी
सुख:च्या या संथ जालावर दुखा:चे ही तरंग उठती क्षणो क्षणी
मृत्यूच्या विराट मुखातून जन्म घेत असते जीवन क्षणो क्षणी
जीवन हे पुन्हा एकदा देई मृत्यूस आमंत्रण क्षणो क्षणी
हाय ही सुरुवात का अंत याला मी म्हणू?
लाभली सुटका मला, का तरी येते रडू?
सर्व, अगदी सर्व हे, नेहमी होते तुझे,
फक्त ते केले कधी, आपुले नाहीस तू.
उसवले नाते कधी, समजले नाही मला
बंध नव्हते रेशमी, ठिगळ होते ते जणू
तू दिलाची जान, पण सांगणे ही गौण हे,
प्रेयसी होतीस पण तू अता त्याची वधू.
पण तुझे भागेल का अन् कसे माझ्याविना?
सागराची प्यास तू, मी वर्षावाचा ऋतू.
रोखण्या मजला तुम्ही, पंख माझे छाटले,
मी बघा पंखांविना लागलो आता उडू.
कर पुन्हा बंधी तुझा, तू मला रे जीवना,
हा सुखी संन्यास मज, येत नाही रे रुचू
जीवनाला फुलायचं असतं
आनंद झुल्यावर झुलायचं असतं
फुलताना फुलाला जसे काटे टोचतात
वा-याच्या मंद झुळकी तशा फुंकरही घालतात
आला जन्म काट्याचा, उगा धूर काढू नये
फुल होऊन दरवळायचं स्वप्न कधी सोडू नये
झोपाळा म्हटलं की वर खाली होणार
जगताना गोल गोल चक्करही येणार
थोडावेळ घट्ट डोळे मिटुन बसा
पोटात गोळा आला खो खो हसा
उगाच कोडी गणिती आयुष्याची मांडू नये
कोंबडी आधी का अंड म्हणत भांडू नये
तर्काचा किस पाडला तर गरगरेल
असं का तसं का म्हणेपर्यंत आयुष्य सरेल
© दत्तात्रय साळुंके
सोबत
सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला
गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला
रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला
माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला
वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला
का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
न मिटते ती भूक जीवाची घालता आकाशाला गवसणी
पुर्तता सारी स्वप्नाची कोणत्या काळात पूर्ण व्हावी
कापले पंख जरी अपेक्षा काही सुटत नाही
सारे भेटूनिया जीवनाची ओंजळ काही भरत नाही
समाधान पळून नेणाऱ्या कधी गोठाव्या त्या अपेक्षा
खटाटोप सारा भविष्याचा न संपणारी प्रतीक्षा
नात्यांना टिकवण्याचे प्रत्येकाचे नव नवीन बहाने
भेटलेल्या दुःखात अश्रूचे कायम डोळे मिटून नहाने
काही न सुटणारी कोडी कोणत्या काळात सुटावी
खेळ सर्व पाप पुण्याचा मुक्तता कशी सहज मिळावी
प्रश्न फक्त एवढाच आहे...
आजच सगळे जगावं...
की उद्यासाठी थोडे ठेवावं...
आधी झोपेत स्वप्न बघावं...
की झोप उडवून ते पूर्ण करावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
सुखाच्या मागे लागावं....
की मागे असण्यातच सुख मानावं....
आपलं दुःख सांगावं...
की दुसऱ्याचं दुःख ऐकावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
मनाला वाटेल ते करावं...
की वाट्याला येईल त्यात मन रमवावं...
आयुष्याच्या वळणानुसार वळावं....
की आयुष्याला नवीन वळण द्यावं...
अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं
आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं
करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा
मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं
आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...
***