जीवनाला फुलायचं असतं
आनंद झुल्यावर झुलायचं असतं
फुलताना फुलाला जसे काटे टोचतात
वा-याच्या मंद झुळकी तशा फुंकरही घालतात
आला जन्म काट्याचा, उगा धूर काढू नये
फुल होऊन दरवळायचं स्वप्न कधी सोडू नये
झोपाळा म्हटलं की वर खाली होणार
जगताना गोल गोल चक्करही येणार
थोडावेळ घट्ट डोळे मिटुन बसा
पोटात गोळा आला खो खो हसा
उगाच कोडी गणिती आयुष्याची मांडू नये
कोंबडी आधी का अंड म्हणत भांडू नये
तर्काचा किस पाडला तर गरगरेल
असं का तसं का म्हणेपर्यंत आयुष्य सरेल
© दत्तात्रय साळुंके
सोबत
सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला
गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला
रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला
माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला
वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला
का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला
मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
न मिटते ती भूक जीवाची घालता आकाशाला गवसणी
पुर्तता सारी स्वप्नाची कोणत्या काळात पूर्ण व्हावी
कापले पंख जरी अपेक्षा काही सुटत नाही
सारे भेटूनिया जीवनाची ओंजळ काही भरत नाही
समाधान पळून नेणाऱ्या कधी गोठाव्या त्या अपेक्षा
खटाटोप सारा भविष्याचा न संपणारी प्रतीक्षा
नात्यांना टिकवण्याचे प्रत्येकाचे नव नवीन बहाने
भेटलेल्या दुःखात अश्रूचे कायम डोळे मिटून नहाने
काही न सुटणारी कोडी कोणत्या काळात सुटावी
खेळ सर्व पाप पुण्याचा मुक्तता कशी सहज मिळावी
प्रश्न फक्त एवढाच आहे...
आजच सगळे जगावं...
की उद्यासाठी थोडे ठेवावं...
आधी झोपेत स्वप्न बघावं...
की झोप उडवून ते पूर्ण करावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
सुखाच्या मागे लागावं....
की मागे असण्यातच सुख मानावं....
आपलं दुःख सांगावं...
की दुसऱ्याचं दुःख ऐकावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
मनाला वाटेल ते करावं...
की वाट्याला येईल त्यात मन रमवावं...
आयुष्याच्या वळणानुसार वळावं....
की आयुष्याला नवीन वळण द्यावं...
अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं
आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं
करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा
मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं
आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...
***
द्वंद्व..(सुधारित)
द्वंद्व..
www.maayboli.com/node/71219
होकार नकाराच्या
खेळात; नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात; बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
होते घुसमट
या मनाची
कोणी ठेवेल का
कधी जाण याची?
अपेक्षांचा बोजवारा
वाहताना
किती द्यायची ती
उत्तरे त्या छळणार्या
विखारी नजरांना
द्वंद्व..
होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..
(Dipti Bhagat)
सुख-दुःख
आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला
दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते
सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा
दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले
(Dipti Bhagat)
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे