प्रश्न फक्त एवढाच आहे...
आजच सगळे जगावं...
की उद्यासाठी थोडे ठेवावं...
आधी झोपेत स्वप्न बघावं...
की झोप उडवून ते पूर्ण करावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
सुखाच्या मागे लागावं....
की मागे असण्यातच सुख मानावं....
आपलं दुःख सांगावं...
की दुसऱ्याचं दुःख ऐकावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
मनाला वाटेल ते करावं...
की वाट्याला येईल त्यात मन रमवावं...
आयुष्याच्या वळणानुसार वळावं....
की आयुष्याला नवीन वळण द्यावं...
अथांग या आकाशात
आता मला उडायला हवं
बंदिस्त या पिंजऱ्याचं दार
आता मला तोडायला हवं
आयुष्यातील क्लिष्ट गणितं
सोडवणं थांबवायला हवं
संसारातील सुख दु:ख
यातील लक्ष काढायला हवं
करण्यासारख्या असंख्य गोष्टी
वाचन, लेखन, ज्ञानसंवर्धन
व्यर्थ मनोरंजनातील वेळेचा
अपव्यय आता टाळायला हवा
मर्यादित या आयुष्यातील
प्रत्येक क्षणच महत्वाचा
एक एक क्षण कामी आणणं
कटाक्षानं पाळायला हवं
आलो, जगलो आणि मेलो
असे जीवन का जगावे
काहीतरी करुन जाणं
हेच ध्येय ठेवायला हवं...
***
द्वंद्व..(सुधारित)
द्वंद्व..
www.maayboli.com/node/71219
होकार नकाराच्या
खेळात; नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात; बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
होते घुसमट
या मनाची
कोणी ठेवेल का
कधी जाण याची?
अपेक्षांचा बोजवारा
वाहताना
किती द्यायची ती
उत्तरे त्या छळणार्या
विखारी नजरांना
द्वंद्व..
होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..
(Dipti Bhagat)
सुख-दुःख
आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला
दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते
सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा
दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले
(Dipti Bhagat)
पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं
आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला
हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी
हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी
आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे
स्वीकारले जीणे
आहे तैसे दत्ता
जगता जगता
जाय पुढे
दुःखाचे ओझे न
सुखाची काळजी
रित जगण्याची
जाणियली
केवढा हा पसारा
सांभाळसी प्रभू
माझी मात सांगू
काय तुला
घडावे स्मरण
तुझे प्रेम भरी
तेणे उपकारी
सुखीया मी
आणिक ती काही
वांछा मनी नाही
सारे तुझ्या पायी
वाहीयले
असेही एकदा व्हावे..
असेही एकदा व्हावे
स्वप्नांना एक
मुक्त आभाळ मिळावे
असेही एकदा व्हावे
इच्छां-आकांक्षाना
महत्वाकांक्षी होण्याचे बळ मिळावे
असेही एकदा व्हावे माणसांच्या मनातले
गुज न सांगता कळावे
असेही एकदा व्हावे
वेदना उमजुन पापणीने
डोळे अलगद टिपावे
असेही एकदा व्हावे
सुखाने दुखाःस
आपले जिवलग मानावे
असेही एकदा व्हावे
दुसर्यासाठी जगणे
हे जीवनाचे ध्यास बनावे
असेही एकदा व्हावे
जीवन-मृत्युचे रेषाखंड तोडुन दोन जीव
एक श्वास व्हावे ..
याला जीवन ऐसे नाव!
जगणं म्हणजे जगणं,
जगणं कसं असतं?
मृत्युच्याच दिशेने पुढचं पाऊल नुसतं
मनं म्हणजे मनं,
मनं कसं असतं?
माझं माझं म्हणताना
नेमकं हाती काहीच नसतं
प्रेम म्हणजे प्रेम
प्रेम कसं असतं?
सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं
स्वप्न म्हणजे स्वप्न
स्वप्न कसं असतं?
सत्यसृष्टीत जे उतरत नाही
तेच डोळ्यांना दिसतं
दु:ख म्हणजे दु:ख
दु:ख कसं असतं?
अंत:करणाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात दडून बसतं
याला जीवन ऐसे नाव!
जगणं म्हणजे जगणं,
जगणं कसं असतं?
मृत्युच्याच दिशेने पुढचं पाऊल नुसतं
मनं म्हणजे मनं,
मनं कसं असतं?
माझं माझं म्हणताना
नेमकं हाती काहीच नसतं
प्रेम म्हणजे प्रेम
प्रेम कसं असतं?
सहवासातही विरहाचं
शल्य मनी वसतं
स्वप्न म्हणजे स्वप्न
स्वप्न कसं असतं?
सत्यसृष्टीत जे उतरत नाही
तेच डोळ्यांना दिसतं
दु:ख म्हणजे दु:ख
दु:ख कसं असतं?
अंत:करणाच्या गाभाऱ्यात
कोपऱ्यात दडून बसतं