नितीनचंद्र

माहिती हवी आहे

Submitted by नितीनचंद्र on 16 August, 2014 - 00:17

मध्यंतरी एका पी.एच. डी च्या मुलाखतीला ( प्रेक्षक म्हणुन ) जाण्याचा योग आला. सध्या मी काही काळ नोकरी सोडुन छोटासा व्यवसाय सुरु केला आहे.

भरपुर वेळ आहे तेर पी.एच डी का करु नये असे मनात येते आहे.

माझी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे. काही कारणामुळे मला मास्टर्स डिग्री मिळाली नाही. अश्यावेळी पी. एच डी ला भारतात कुठे अ‍ॅडमिशन मिळु शकते का ?

अनेक युनिव्ह्र्र्सिटीज चे एलिजिबीलिटी क्रायटेरीया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मात्र मास्टर्स डिग्रीचा उल्लेख करते.

यु.जी,सी नेमके काय म्हणते ?

माहिती हवी आहे

Submitted by नितीनचंद्र on 16 August, 2014 - 00:17

मध्यंतरी एका पी.एच. डी च्या मुलाखतीला ( प्रेक्षक म्हणुन ) जाण्याचा योग आला. सध्या मी काही काळ नोकरी सोडुन छोटासा व्यवसाय सुरु केला आहे.

भरपुर वेळ आहे तेर पी.एच डी का करु नये असे मनात येते आहे.

माझी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट आहे. काही कारणामुळे मला मास्टर्स डिग्री मिळाली नाही. अश्यावेळी पी. एच डी ला भारतात कुठे अ‍ॅडमिशन मिळु शकते का ?

अनेक युनिव्ह्र्र्सिटीज चे एलिजिबीलिटी क्रायटेरीया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मात्र मास्टर्स डिग्रीचा उल्लेख करते.

यु.जी,सी नेमके काय म्हणते ?

काय मागु ?

Submitted by नितीनचंद्र on 12 August, 2014 - 02:57

कोणा ज्योतिषाला आपले भविष्य खोटे ठरावे असे वाटते ? काही प्रसंगी भविष्य चुकावे अशीच प्रार्थना कराविशी वाटते कारण ज्याने प्रयत्नपुर्वक टाळावे असा जातकच ( प्रश्नकर्ता ) हतबल झालेला दिसतो.

मी जिथे नोकरी करतो तिथे मला ज्योतिषाचा अभ्यास आहे हा विषय लपवण्याचा प्रयत्न असतो. कारण कामाच्या ठिकाणी ज्योतिष विषयाची चर्चा करणे हा कामाच्या वेळेचा अपव्यय तर आहेच शिवाय ज्यांना ज्योतिष विषयाचा तिरस्कार आहे त्यांना आपल्यावर टीका करायची अनायसे संधी दिल्यासारखे आहे.

शब्द नव्हे हा मायाबाजार

Submitted by नितीनचंद्र on 9 July, 2014 - 09:45

कधी तलवार तर कधी कट्यार
कधी मार्मीक तर कधी "ड्यू" वार

शस्त्राहुन भेदक हत्यार
नसता समोर तरी बेजार

शालजोडीतला पैजार
डंखाहुनी अती विखार

नवोदितांची आवक फार
जख्मी होता होती पसार

तरी दिसती किती लाचार
दिवसागणी कविता सुमार

विद्वानांचा तोरा अपार
अड्ड पालखीचा जरतार

यमक जुळवता शिणलो यार
शब्द नव्हे हा मायाबाजार

शरीयत वर आधारीत कायदा

Submitted by नितीनचंद्र on 8 July, 2014 - 01:52

शरीयतवर आधारीत काझी आणि त्यांचे फैसले याला कायद्याने मान्यता नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. असे निकाल किंवा फतवे मानण्याचे बंधन नाही असा निकालही सुप्रीम कोर्टाने दिला. परंतु अश्या न्यायप्रक्रियेवर मात्र बंदी घालायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

मराठी पेपरातल्या बातम्या किंवा दुरदर्शनवरच्या बातम्या अर्धवट होत्या म्हणुन जेव्हा इंटरनेटवर पाहिले तेव्हा हे वाचुन धक्काच बसला.

http://khabar.ibnlive.in.com/news/123214/1

राहु राशी बदल

Submitted by नितीनचंद्र on 6 July, 2014 - 19:29

वर्षभरात जे ग्रहांचे राशीबदल होतात त्यांची गोचर फळे अनुभवण्यासरखी असतात. आपल्या जन्मकुंडली प्रमाणे ही फळे वेगवेगळी असतात. यातुनही जे ग्रह वर्षभर एका राशीत असतात त्यांची गोचर फळे जरुर अनुभवावी.

राहु राशी बदल हा १३ जुलै ला रात्री ७ वाजुन २३ मिनीटांनी होत आहे. तुळ राशीत असलेला राहु या तारखेला आता कन्या राशीत येत आहे.

राहु हा ग्रह काहींच्या मते शनी सारखी फळे देतो. काहींच्या मते तो ज्या ग्रहासोबत असतो त्यांची शुभफळे नीट अनभवु देत नाही. काहींच्या मते एकटा राहु राजयोगकारक आहे.

कन्या राशीत येणारा राहु हा १८ वर्षांनी येत आहे. तो कुणाला पहिला येईल किंवा बारावा.

मुंबईत पाऊस पोहोचला

Submitted by नितीनचंद्र on 2 July, 2014 - 04:26

कालच मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांनी मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये फक्त ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे यामुळे मुंबईत आता पाणी कपात करण्याची वेळ आली आहे असे सांगीतले.

मुंबईच्या नगरसेवकांना आणि लोकसेवकांना आता मिटींग घेऊन पाणी कपातीसाठीचा प्रस्ताव स्विकारावा असे समजवावे लागेल अशी ही घोषणा होती.

मुंबईच काय पण पुण्यात आणि सर्वच शहरात आणि खेड्यात आता जर पाऊस पडला नाही तर काय कल्पनेने सर्वांच्याच तोडचे पाणी पळते.

कायद्याच्या कचाट्यात

Submitted by नितीनचंद्र on 2 July, 2014 - 03:17

मुंबईत रहाणार्‍या आमच्या एका नातेवाईकांना दोन मुलगे. एक साधा विचार त्यांनी केला. दोन वेगवेगळे फ्लॅट घ्यावेत आणि शेवटी दोन मुलांच्या नावे करावे म्हणजे त्यांचा स्वतंत्र रहाण्याचा प्रश्न सुटेल.

एक फ्लॅट त्यांनी अनेक वर्षांपुर्वी मुंबईत घेऊन ठेवला होता. जेव्हा दुसरा फ्लॅट घेण्याची वेळ आली तेव्हा मुंबईत फ्लॅटचे दर त्यांच्या अपेक्षेपेक्षा खुप वाढले आणि त्यांची सेवानिवृत्तीची वेळ झाली होती.

मग त्याच दरम्यान मुंबईत दंगली झाल्या आणि त्यांनी पुण्याला फ्लॅट घेण्याचे ठरवले आणि घेतला सुध्दा. याकृती मागे दोन उद्देश्य होते.

विषय क्र. २ महाराज

Submitted by नितीनचंद्र on 25 June, 2014 - 12:08

औंधकरांच्या घरी महाराज आले आहेत अशी कुणीतरी बातमी देताच मी नारायणपेठेतल्या एका अपार्ट्मेटमधले औंधकरांचे घर शोधुन काढले. एक बेडरुमचा साधासुधा फ्लॅट त्यांच्या चाहत्यांनी आणि भोळ्या भाविकांनी भरुन गेला होता. हॉल मधल्या एका बेडवर महाराज बसले होते. शेजारी साखरफुटाणे ठेवलेले होते. महाराजांच्या अंगात कफनी होती. वय साधारण २० च्या आसपास. दाढी वाढलेली केस वाढलेले आणि मुद्रा प्रसन्न होती.

विषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय?

Submitted by नितीनचंद्र on 23 June, 2014 - 23:40

मोदींचा लोकसभेचा प्रचार पहाता त्यांचा कार्य करण्याचा आवाका फार मोठा आहे हे आता भारतातच नाही तर जगाला समजुन चुकले आहे. १९८९ पासुन संसदेने बहुमतातले सरकार पाहिले नव्हते. त्यामुळे राजकारणात प्रादेशीक पक्षांची अरेरावी, भ्रष्टाचार सहन करा, जुळवुन घ्या अशी निती काँग्रेस, भाजप तसेच अल्पकाळ सत्तेवर असलेल्या तथाकथीत तिसर्‍या आघाडीच्या ( इंद्रकुमार गुजराल, देवगौडा ) सरकारांच्या माथावर मारली गेली होती. हा काळ थोडा थोडका नाही तर २५ वर्षांचा होता.

मोदींना पुर्ण बहुमताने आणि पक्षातील दुढ्ढाचार्यांच्या मदतीशिवाय आणि समविचारी नेत्यांच्या सहकार्याने सरकार चालवायचे आहे ही जमेची बाजु आहे.

Pages

Subscribe to RSS - नितीनचंद्र