नितीनचंद्र

होळी भाग १

Submitted by नितीनचंद्र on 21 April, 2011 - 12:28

( चिंचवड गावचा इतिहास सांगणारी ही कथा थोडिशी सत्य बरीचशी काल्पनीक. चिंचवड गाव जरा लहान आणि खेडेगाव ते शहर असा प्रवास करत होत तो काळ. गेले कित्येक दिवस लेखन घडत नव्हत. एक मायबोलीकर मात्र मला लिहायला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता ही कृतज्ञता.)
----------------------------------------------------------

व्हळीला गवर्‍या पाच पाच हा आवाज जसा गल्लीत घुमला तशी चा्ळींच्या खिडक्यातुन, अनेक डबलरुम कडे जाणार्‍या बाल्कनी वजा पॅसेजमधुन, अनेक बिर्‍हाडे असलेल्या वाड्यांच्या दरवाज्यात मुलांची गर्दी जमली.

गुलमोहर: 

गृहीत

Submitted by नितीनचंद्र on 22 March, 2011 - 23:39

सकाळ झाली सुर्य उगवला. उगवला ? हो आपण असच नाहीका म्हणत पिढ्यानपिढ्या ? मराठीतही तेच म्हणतो आणि आपल्याला अधुनिकतेचा वारसा शिकवणार्‍या इंग्रजीतही तेच म्हणतो.

खर तर सुर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वतभोवती फिरते आणि सुर्यासमोर येते म्हणुन सकाळ होते हे सत्य आता शाळेतच शिकवले जाते. तरी आपल्या घरी, आजुबाजुला हेच बोलले जाते. किंबहुना शाळेत हे सत्य शिकवणारे शिक्षक सुध्दा अनवधानाने हेच म्हणत असणार की "सुर्य उगवला".

इथे सत्य जरी मान्य आहे तरी व्यवहारात बोलताना कोणीच सत्य बोलत नाही. याचा अर्थ जाणिवपुर्वक सत्य बोलायचे टाळले जाते असे नाही. आमच्या बोलीभाषेवरचा हा संस्कार आहे. हा पुसण अवघड आहे.

गुलमोहर: 

काही च्या काही

Submitted by नितीनचंद्र on 12 June, 2010 - 02:04

इथे आल की वाटत
आपण ही लिहाव्यात गद्य कविता
बेबंद बेछंद सुसाट पण खोल...
वेदनांशी नात सांगणार्‍या
आणि ते नात जपणार्‍या

लिहायल्या घेतल्या की उमगत
लिहिणारे असे पिसाट का होतात
सामान्य न पटणारे पण असामान्याना रुचणारे
प्रश्न का विचारतात

जगच भरलय अश्या अबोध गोष्टींनी
सामान्य हे असच चालायच म्हणुन रडतात किंवा कुढतात
पण असामान्य का ?का ?म्हणुन झोडतात

कारण सोप्प आहे
सामान्य रडतात किंवा कुढतात न घडणार्‍या वा नको असलेल्या घटनांनी
असामान्यांना ते जमत नाही
कारण आधी ते सामान्यच असतात
रडुन रडुन त्यांचे डोळे कोरडे होतात

मग काही होतात निर्दयी, नतद्रष्ट

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - नितीनचंद्र