मला जरा ताप येतो आहे. मीना म्हणाली बघु म्हणुन तीने मनगटाला हात लावला.
जरा सोयीचे म्हणुन तीला ते बरे वाटले असावे.
शेजारीच आई होती. माझ मातृप्रेम म्हणाल, अशी प्रतारणा करू नकोस.
आई आणि बायको सोबत संसार करताना ही काळजी मी घेतो.
मी आईला म्हणल तु या हाताला हात लाऊन पहा.
( नशीब दोघींना गळा धरावा असे सुचले नाही .... )
आईच मत पडल ताप नाही.
मीनाच मत पडल ताप आहे.
न पिता माझा तळीराम झाला. मी म्हणालो मग कुणाचे औषध सुरू ठेऊ ?
वैद्यांच की अॕलोपॕथी डाॕ च.
आई आणि बायको सोबत एकाच घरात दोघीच्या दयेने रहायचे म्हणजे मी असे काही करतो.
काय करतो आहेस ? बायकोने विचारले.
नेटतोय मी एका शब्दात उत्तर दिले.
बायको ला काही समजले नाही. तिचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून मी इंटरनेट वर काहीतरी करतोय अस सांगीतल. हा काळ २००९ ते २०११ जेव्हा हाॕल मधे बसुन लॕन केबल लॕप टाॕपला जोडून नेटायचा जमाना होता.
ववी, पुलेशु, धन्स असे एका मागुन एक बाॕऊन्सर पडायला लागल्यावर बायकोने ही डिक्शनरी कुठली याची चौकशी केली.
मायबोलीवर मी पडीक असायचो हे बायकोला फारसे रूचत नव्हते.
त्यात विबासं ह्या शब्दाची भर पडली. कुणाचा तरी मला वि करून पहायच आहे हा विनोदी लेख वाचुन इकडे विबास सर्रास होते की काय असा तीचा समज झाला.
चला आता मायक्रोफोन मध्ये बोलून टायपिंग करू या
बरेच दिवस टायपिंग चा त्रास कसा कमी करता येईल याचा विचार मी करत होतो दोन चार दिवसापूर्वी मला असे ऐकायला मिळाले आता गुगल मी मराठी भाषा केली आहे तर मायबोली वरचे कसे मायक्रोफोन वरती बोलून टाईप करता येतील याचा विचार करताना मला सापडली
गुगल डोक्स ओपन करा. आपला मायक्रोफोन सुरु करा. जिथे मायक्रोफोन दिसतोय सेटिंग आहे त्यामध्ये जाऊ मराठी भाषा सेट करा आपण बोलायला लागला आज मराठी टायपिंग होऊ लागेल. थोडे एडिटिंग करावे लागेल
आता टायपिंग केलं आहे ते कॉपी-पेस्ट करा मायबोली वर
गेले वर्षभर मला अनेक शारिरीक तक्रारी होत्या. व्यायाम करत होतो तरी बैठे जीवन आणि खाणे जास्त यामुळे शरिरात वात वाढत असावा.
फेबृवारी २०२० पासून सकाळी दहा आणि रात्री ८ ला जेवण सुरु केल्यापासून तक्रारी संपल्या. उत्साह वाढला आहे.
सुरवातीला नाष्टा स्कीप करणे कटीण झाले. मी नाष्टा जेवण जेवल्यासारखा खायचो. पोहे असतील तर दोन डीश भरुन खायचो. परिणामी दुपारी फारशी भुक लागत नसे, दुपारी जेवलो की रात्रीचे जेवण वेळ झाली म्हणून जेवायचे.
खर तर " यु मेड माय डे " हा शब्द प्रयोगच मला आवडत नाही. आपला दिवस आपल्या मालकीचा असावा. आपण स्वयंस्फुर्तीने तो घडवावा. त्या दिवशी फारसे काही घडले नाही तरी ते घडण्याच्या दिशेने एक पाऊल चालणे हे सुध्दा आपल्या नियंत्रणात असावे.
माझा दिवस परावलंबी असू नये. दुसर्याने दिलेल्या प्रोत्साहनावर अवलंबुन असू नये असे मला कायम वाटते. माझा दिवस काही घडवण्यासाठी माझ्या नियंत्रणात असावा असे वाटते, आनंद सुध्दा दुसर्या कोणी देऊ नये, तो आपला आपल्याला घेता यावा. जमलेच तर देता यावा असेही वाटते.
व्यवसाया निमीत्ताने पुणे ते बेळगाव महिन्यातून एकदा प्रवास बरेचदा मी करतो. ११ जुलैला ( ट्रेनचे नाव , कपार्टमेंट आणि माझा सीट नंबर मुद्दमच लिहलेला नाही ) __नंबरची सीट शोधून बसताना " तुमचा नंबर __ का " अशी विचारणा झाली. छाप पडेल असा तांबुस वर्णाच्या धडधाकट माणसाने विचारताना मी त्याच्या कडे पाहीले. त्याची नजर बहूदा माझा व्यवसाय, व्यक्तिमत्व न्याहाळतना दिसली. ८ माणसे झोपतील अश्या कंपार्टमेंट मधे एकच माणूस डोक्यावर पांघरुण घेऊन संध्याकाळी सात वाजता झोपलेला आणि या तरतरीत माणसाच्या सोबत अजून दोन माणसे.
एन डी ए -२ चा शपथविधी होताना एस जयशंकर यांचा शपथविधी होणे, त्याना कॅबिनेट मधे समाविष्ट करुन घेणे हा एक धक्का होता. जेंव्हा चंद्रशेखर पंतप्रधान होते या १९९१ च्या निवडणुकीत अशी चर्चा होती की सरकार कुणाचेही येवो, अर्थमंत्री मनमोहन सिंग होणार. कै चंद्रशेखर यांच्या काळात अर्थव्यवस्था खिळखीळी झाली होती. याला ग्लोबलायझेशन , लिबरायझेशनची मात्रा दिल्याशिवाय मल्टी नॅशनल कंपन्यांना मुक्त हस्ताने भारतात प्रवेश मिळणार नव्हता.
आजच दुरदर्शनच्या एका चॅनलवर बातमी आली की ५ % ईव्हीम पॅट आणि इव्हीम ची जुळणी केली असता यात एकाही मताचा घोळ आढळला नाही.
मध्यंतरी निकाल लागायच्या आधी एका चॅनलने बातमी दिली होती की निवडणुका जाहीर झाल्यापासून गुगल सर्च वर केरळ सोडता सर्व राज्यात मोदींच्या सभा, भाषणे याचे प्रमाण सर्वाधीक होते.
ईव्हीएम ने याच पध्दतीने निकाल दिलेला आहे.
आजच दुरदर्शनच्या एका चॅनलवर बातमी आली की ५ % ईव्हीम पॅट आणि इव्हीम ची जुळणी केली असता यात एकाही मताचा घोळ आढळला नाही.
मध्यंतरी निकाल लागायच्या आधी एका चॅनलने बातमी दिली होती की निवडणुका जाहीर झाल्यापासून गुगल सर्च वर केरळ सोडता सर्व राज्यात मोदींच्या सभा, भाषणे याचे प्रमाण सर्वाधीक होते.
ईव्हीएम ने याच पध्दतीने निकाल दिलेला आहे.