विषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय?
मोदींचा लोकसभेचा प्रचार पहाता त्यांचा कार्य करण्याचा आवाका फार मोठा आहे हे आता भारतातच नाही तर जगाला समजुन चुकले आहे. १९८९ पासुन संसदेने बहुमतातले सरकार पाहिले नव्हते. त्यामुळे राजकारणात प्रादेशीक पक्षांची अरेरावी, भ्रष्टाचार सहन करा, जुळवुन घ्या अशी निती काँग्रेस, भाजप तसेच अल्पकाळ सत्तेवर असलेल्या तथाकथीत तिसर्या आघाडीच्या ( इंद्रकुमार गुजराल, देवगौडा ) सरकारांच्या माथावर मारली गेली होती. हा काळ थोडा थोडका नाही तर २५ वर्षांचा होता.
मोदींना पुर्ण बहुमताने आणि पक्षातील दुढ्ढाचार्यांच्या मदतीशिवाय आणि समविचारी नेत्यांच्या सहकार्याने सरकार चालवायचे आहे ही जमेची बाजु आहे.