पुढे काय?

विषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय?

Submitted by नितीनचंद्र on 23 June, 2014 - 23:40

मोदींचा लोकसभेचा प्रचार पहाता त्यांचा कार्य करण्याचा आवाका फार मोठा आहे हे आता भारतातच नाही तर जगाला समजुन चुकले आहे. १९८९ पासुन संसदेने बहुमतातले सरकार पाहिले नव्हते. त्यामुळे राजकारणात प्रादेशीक पक्षांची अरेरावी, भ्रष्टाचार सहन करा, जुळवुन घ्या अशी निती काँग्रेस, भाजप तसेच अल्पकाळ सत्तेवर असलेल्या तथाकथीत तिसर्‍या आघाडीच्या ( इंद्रकुमार गुजराल, देवगौडा ) सरकारांच्या माथावर मारली गेली होती. हा काळ थोडा थोडका नाही तर २५ वर्षांचा होता.

मोदींना पुर्ण बहुमताने आणि पक्षातील दुढ्ढाचार्यांच्या मदतीशिवाय आणि समविचारी नेत्यांच्या सहकार्याने सरकार चालवायचे आहे ही जमेची बाजु आहे.

विषय क्रमांक एक - मोदी जिंकले, पुढे काय?

Submitted by बेफ़िकीर on 23 June, 2014 - 12:13

मोदी जिंकले, पुढे काय?

"पंजा आला, पंजा आला" आणि "येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण" अश्या घोषणा देत ट्रक फिरायचे सत्तरच्या दशकात! ऐंशीच्याही आणि नव्वदच्याही! ट्रकमध्ये बसलेले तरुण गुलालाने रंगलेले, काळेकभिन्न आणि गुंडांसारखे दिसणारे असायचे. रोज संध्या आणि दोन दोन तास पूजा करणारे माझे वडील घराच्या गॅलरीतून ते दृष्य पाहून खिन्नपणे आत वळताना सुस्कारा सोडत म्हणायचे: "पंजा आला, पंजाच येणार म्हणा, बामणं हवी आहेत कोणाला? पैसे खाता येणार नाही ना!"

Subscribe to RSS - पुढे काय?