नितीनचंद्र

भाजपचे सरकार तरले

Submitted by नितीनचंद्र on 12 November, 2014 - 03:16

आज महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मतदानाने सिध्द न करता आवाजी मतदान पध्दतीने नवनिर्वाचित लोकसभा अध्य्क्षांनी निर्णय देऊन सरकार तारले. एकदा गुप्त मतदानाची मागणी आली नाही की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फायनल असतो. त्यावर कुठेही दाद मागता येत नाही ही लोकशाहीची तांत्रीक प्रक्रिया झाली आणि म्हणुनच जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणुन शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणि करताच तो विषय संपला आहे असे विधानसभा अध्यक्षांनी जाहिर केले.

विषय: 
प्रांत/गाव: 

साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

विषय: 

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

Submitted by नितीनचंद्र on 9 September, 2014 - 02:34

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.

आजची विशेष बातमी

Submitted by नितीनचंद्र on 7 September, 2014 - 23:11

राजकारणावर चर्चा करायला, सिनेमावर चर्चा करायला स्वतंत्र धागे आहेत. काही घटना अश्या असतात ज्या विशेष असतात जसे की एखाद्या औषधाचा लागलेला शोध ज्यामुळे खुप मोठ्या शारिरीक त्रासा पासुन सुटका होणार आहे किंवा कुणीतरी असा लावलेला शोध ज्यामुळे मानवी जीवनात काहीतरी सुखावह घडणार आहे.

काही वेळा काही अतर्क्य अश्या गोष्टी घडतात. ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते किंवा काही गोष्टी अंधश्र्ध्दा समजल्या जातात. एक दिवस असा येतो की या घडनांच्या मागचे शास्त्र जगाच्या समोर येते.

आजचीच बातमी पहा जी दैनीक सकाळच्या पान ७ वर आहे.

प्रांत/गाव: 

कुमार विश्वास यांना पडलेले स्वप्न

Submitted by नितीनचंद्र on 30 August, 2014 - 04:49

राजकारणात प्रसिध्दीच्या झोतात कसे रहावे याचा वस्तुपाठ अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केला. त्याचेच अनुकरण करत कुमार विश्वास यांनी भाजपचा एक नेता मला येऊन भेटला आणि भाजपने मला दिल्लीत मुख्यमंत्री होण्याचे आश्वासन देत भाजप मध्ये सामिल होण्याचे सांगीतले असे विधान केले.

हा भाजपचा नेता कोण हे त्यांना आठवत नसावे कारण हा प्रसंग घडलेला नसुन हे बहुदा दिवास्वप्न आहे. दिल्लीचे ना. राज्यपाल यांनी गुप्त मतदानाचा उपयोग करुन सरकार बनविण्याची कवायत सुरु करताच कुमार विश्वास यांना स्वप्न पडले हे खासच.

भाजप मध्ये काय दिल्लीत नेत्यांची वानवा आहे म्हणुन हा वाचाळ आआप नेता भाजप आयात करेल ?

विषय: 

चंद्रमोहन शर्मा त्याचा गुन्हा आणि तपास

Submitted by नितीनचंद्र on 29 August, 2014 - 23:51

चंद्रमोहन शर्मा कालच्या आणि आजच्या क्राईम रिपोर्ट मधे झळकतो आहे त्याच्या कृष्ण कृत्यांच्या यादीमुळे. हिचकॉक ला लाजवेल असा हा प्लॅन केवळ बायकोला सोडुन गर्लफ्रेंड मिळावी इतकाच नव्हता तर बायकोला पोटगी द्यायला लागु नये. पहिल्या बायकोला अनुकंपा तत्वावर आपल्या कंपनीत नोकरी मिळावी. कंपनीकडुन विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने एका माणसाला कारमध्ये ठेऊन ती पेटवुन दिली.

गणेशउत्सव तेव्हाचा

Submitted by नितीनचंद्र on 29 August, 2014 - 11:28

काळभैरवनाथ गणेश मंडळ हे आमच्या मंडळाच नाव. आजही हे मंडळ अस्तीत्वात आहे. आज निरोप आला की हजार रुपये वर्गणी पाठव आणि सातव्या दिवशी तुझ्या हाताने आहे तेव्हा चार तारखेला आरतीला संध्याकाळी आरतीला ये.

मी ३५-४० वर्षे मी मागे गेलो. हे मंडळ आमच्या आधीचे आहे. आम्ही काही कार्यकर्त्यांनी त्याचे त्या काळात मनापासुन झटुन हे नाव आणि मोठे मंडळ असा लौकीक प्राप्त करुन दिला.

जेव्हा हे बालगणेश मंडळ होते तेव्हा दोन - दोन मंडळे गणपतीची वर्गणी मागायचो. मोठ्या लोकांचे तरुण मंडळ आणि मुलांचे बालगणेश मंडळ.

विषय: 

मोबाईल वरुन हॉटस्पॉट्ने नेटल्यास काही तोटा/दोष आहे का ?

Submitted by नितीनचंद्र on 27 August, 2014 - 02:47

बी.एस.एन.एल चे ब्रॉड बॅड मी गेले ३-४ वर्षे वापरत होतो. सर्व्हीस चांगली होती. पण गेले तीन महिने सर्व्हीस चा प्रॉब्लेम आहे. महिन्यात १५ दिवस सर्व्हीस तुटक असते. किंवा नसते.

तक्रार करुन काही उपयोग नाही. ( खाली लगेच मी लिहले म्हणुन प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत " अच्छे दिन आने वाले है "

पर्याय म्हणुन आयडीया मोबाईल वर नेट पॅक लोड केला ज्याचा अनुभव चांगला आहे.

हॉटस्पॉटवर सुध्दा नेट/ लॅपटॉप चालत आहे. किंचित स्लो आहे पण ठिक आहे.

कायम चालवायला काय हरकत आहे ?

शब्दखुणा: 

मोदी, मोदी घोषणा आणि नाराज मुख्यमंत्री

Submitted by नितीनचंद्र on 21 August, 2014 - 01:59

मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात दोन सार्वजनिक कार्येक्रम झाले ज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींबरोबर होते. या कार्येक्रमात " मोदी -मोदी" या घोषणा झाल्या. पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वातावरणातुन केव्हाच बाहेर आले आहेत परंतु भाजप कार्यकर्ते किंवा जनता अजुनही अश्याच दमदार भाषणांच्या मुड मधे असेल त्यामुळे या घोषणा दिल्या गेल्या असाव्यात.

हा प्रकार हरियाणात सुध्दा झाला जिथे मुख्यमंत्री हुडा यांच्याबरोबर स्टेजवर असताना " मोदी -मोदी " चा नारा झाला आणि मुख्यमंत्री हुडा संतापले आणि यापुढे पंतप्रधान मोदींबरोबर स्टेजवर जाणार नाही अशी घोषणा केली.

विषय: 

स्वप्नांशी तडजोड करु नका - पण ?

Submitted by नितीनचंद्र on 20 August, 2014 - 00:17

अमिरखान काल सकाळ वृतपत्राने जमविलेल्या तरुणाईशी संपर्क साधत बोलला की " स्वप्नांशी तडजोड करु नका" पण स्वप्न कशाची पहा म्हणजे यशस्वी होतील याचे मार्गदर्शन कोण करणार ?

माझ्या ओळखीचा एक तरुण आहे. लहानपणी अत्यंत साधा, कमी बोलणारा, हुड पणा नाही, क्रिडा विषयाशी संपर्क नाही. अचानक त्याने मिलीट्रीत जायचे स्वप्न पाहिले. का पाहिले याचे उत्तर त्याला ही देता येणार नाही. लेखी आणि शारिरीक परिक्षा पास होऊनही मुलाखतीत फेल झाला. कारण सैनीकी पेशाची मानसिकता तयार झालेली नव्हती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - नितीनचंद्र