नितीनचंद्र

मनात घर करुन राहिलेला सिनेमा - बनगरवाडी -

Submitted by नितीनचंद्र on 28 January, 2016 - 20:49

काल जरा काम नव्हते म्हणुन झी सिनेमा चॅनल लावल आणि पहातो तर काय मनात घर करुन राहिलेला सिनेमा बनगरवाडी ( १९९५ ) नुकताच सुरु झालेला होता.

banagaravaadi.jpg

१९९५ साली मला या सिनेमात शाळामास्तरची प्रमुख भुमिका करणारा कलावंत नंतर दिग्दर्शक म्हणुन गाजलेला श्री चंद्रकांत कुलकर्णी आहे. त्याचा आवाज आज ऐकताना जाणवल की हा चंद्रकांत कुलकर्णी आहे.

शब्दखुणा: 

कुणी रेक देता का लोकलचे रेक

Submitted by नितीनचंद्र on 22 January, 2016 - 10:03

१९ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. २१ तारखेचा स्मार्ट सिटीवरील परिसंवाद ऐकेपर्यंत http://www.maayboli.com/node/57288

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

Submitted by नितीनचंद्र on 22 January, 2016 - 05:44

कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला.

आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती.

शब्दखुणा: 

रेल्वे कडुन पैसे परत मिळवणे एक अनुभव

Submitted by नितीनचंद्र on 17 January, 2016 - 07:00

मी १२ डिसेंबरला चिंचवड हुन सिंहगड एक्सप्रेस ने दादरला जायचे ठरवले. ११ डिसेंबरला आय आर सी टीसी वरुन बुकींग केले. माझ्या दुर्दैवाने एसी चेअर कार मध्ये वेटींग लीस्ट १ आणि २ असे नंबर आले. सध्या नुकतेच रेल्वेने काही नियम बदलल्याचे कळले म्हणुन आय आर सी टी सी ला क्लेरीफिकेशन मागीतले.

Dear Sir/Madam,

Just now I have booked following ticket.

What are the rules for boarding into Train where status is CKWL ?

1) If tickets are not confirmed till last movement , can we enter the Train and Travel using II class ( General )?

शब्दखुणा: 

कट्यार पुन्हा काळजात घुसली

Submitted by नितीनचंद्र on 18 October, 2015 - 02:47

पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच संगीत असलेली संगीत नाटक कट्यार एक अजरामर नाटक आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, नुकतेच निवर्तलेले पं. पदमाकर कुलकर्णी तसेच नव्या पिढीतील तीन दमदार गायक डॉ रविंद्र घांगुर्डे, चारुदत्त आफ़ळे आणि वसंतराव देशपांडे यांचा वारसा घेऊन आलेले राहुल देशपांडे यांनी खासाहेबांची भुमिका करुन हे नाटक पुन्हा पुन्हा रंगमंचावर आणले. या नाटकाला प्रत्येक पिढीचा वारसा आणि नविन पिढीतल्या चाहत्यांचा उत्साह हे नाटक नव्याने सादर करायला भाग पाडतो आहे.

बोगदा

Submitted by नितीनचंद्र on 21 September, 2015 - 19:44

बोगद्यात प्रवेश करताना
इतकच माहित आहे
याला एक दुसर टोक आहे
तिकडे सुध्दा प्रकाश आहे

बरोबर कुणी नाही
सोबत दिवा सुध्दा नाही
प्रवास असाच करण्याची
ही आगळी रित आहे

इकडे काय प्रकाश नसतो
तरी नाविन्याची आवड
हीच एक प्रेरणा मला
एकसारखी ओढत आहे

म्हणतात दरडी कोसळतात
पुढे पडली तर काही नाही
पण दोन्हीकडे पडल्या तर काय
हा विचार सारखा टोचत आहे

रस्ता तरी बरा ठेवावा ना
पण छे तो काय हमरस्ता आहे
क्वचित फ़िरकतात फ़किर इकडे
बाकी गुढ काळोख आहे

विषय: 

ती

Submitted by नितीनचंद्र on 18 September, 2015 - 04:59

तीला कधी कुणी नटलेले पाहीले नाही. ना कधी अधुनीक कपड्यात पाहिले. सदान कदा ती घाणेरड्या आणि मळकट गाऊनमधे तीच्या दुकानात उभी असलेली. नजर कुठेतरी शुन्यात.

खरतर ज्या समाजात भरपुर हुंडा देऊन अपंग मुलीना पिवळे होताना मी पाहिले आहे. हीच्या बापाला त्याचे सोयर -सुतक नव्हते. हीचा बाप महा- कवडी चुंबक. " ती"च्या पेक्षा एक थोरली सुध्दा घरात वावरत होती. फरक इतकाच ती आधीच्या जमान्यातली असल्यामुळे गाऊन ऐवजी साडी. चेहर्‍यावर भाव तेच. खायला कमी नव्हत पण जगायला एक कारण लागत त्याचाच अभाव.

शब्दखुणा: 

विठठल सापडला

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 04:55

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

क्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 02:19

मुंबई पोलिस कमीशनर राकेश मारीया जो पर्यंत चार्ज मधे होते तो पर्यंत शीना बोरा मर्डर केस मधील उलट सुलट बातम्या, संभाव्य आरोपी इंद्राणी मुखर्जी तीचे तीन पती, ड्रायव्हर आणि अन्य यांचे धक्कादायक खुलासे यानी वर्तमानपत्रांची पाने आणि उपग्रह वाहिन्यांचे अनेक तास खर्ची पडले.

माकडीण आपल्या मुलाला नाकातोडांत पाणी जाऊ लागल्यावरच नाईलाजाने पाण्याखाली दाबते पण सामाजीक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना घेऊन एक आई आपल्या मुलीला मारत असेल अशी कल्पना हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या लेखकांच्या मनाला सुध्दा स्पर्शुन गेली नसावी.

उष्माघाताचे बळी

Submitted by नितीनचंद्र on 3 June, 2015 - 06:06

किती जणांनी गेल्या कित्येक दिवसाता वाढत वाढत जाणार्‍या उष्माघाताच्या बळीची संख्या ऐकली/ वाचली आहे ? काल पर्यंत हि संख्या सुमारे २५०० च्या आसपास होती.

या प्रकारची आकडेवारी गोळा करणे, दररोज ती प्रसिध्द करणे आणि त्यावर काहीच उपायोजना न झाल्याचे दिसणे हा एक चमत्कारीकच प्रकार म्हणावा लागेल.

या आधी ( मी नेहमीच वर्तमानपत्र वाचतो / दुरदर्शनच्या बातम्या पहातो ) अशी आकडेवारी प्रसिध्द झाल्याचे किंवा इतका आकडा गाठल्याचे स्मरणात नाही. या बातमीतला विशेष उल्लेख म्ह्णजे २५०० पैकी किमान १५०० उष्माघाताचे मृत्यु हे आंध्रप्रदेशातील आहेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - नितीनचंद्र