नातीगोती

नातं - भाग १

Submitted by शिरीष फडके on 2 December, 2014 - 22:46

नातं - भाग १
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं.

शब्दखुणा: 

आमच्या मुलींचे पालक

Submitted by स्वीट टॉकर on 29 November, 2014 - 12:53

आमच्या घरच्या एका जुन्या पण झालेल्या फोटोमुळे मजेदार गैरसमज झाला त्याची ही गोष्ट.

ही मी मायबोलीकर होण्याआधी लिहिली असल्यामुळे दुसर्‍या सॉफ्ट्वेअरमध्ये लिहिली आहे. कॉपी पेस्ट करता येत नाही. क्षमस्व.
ही ह्कीकत pdf फाइलच्या स्वरूपात असल्यामुळे त्याची link देत आहे.

http://www.mediafire.com/view/2b0phu99cw40y4k/Our_daughter's_parents.pdf

विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

आम्ही अस्पृश्याची पोरे

Submitted by Devadatta Parulekar on 20 November, 2014 - 07:36

विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
 
नका दे‌ऊ अन्न
नका दे‌ऊ पाणी
नका दे‌ऊ थारा
पहा हा अस्पृश्य
 
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
 
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
 
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
 
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
 
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू
नामयाचा बाप
परि तो अस्पृश्य?
 
जनीची साजणी
दीनांची मा‌उली
संतांची सा‌उली
तरी ती अस्पृश्य?
 
तुम्हा ती अस्पृश्य

असं घडू शकतं?

Submitted by आशिका on 20 November, 2014 - 06:00

माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे लावी सुगंधाचे लेणे

आपल्या सहावीत शिकणार्‍या नातवाला पाठ्यपुस्तकातील ही कविता जाधव बाई अगदी तन्मयतेने शिकवत होत्या. कवितेचा भावार्थ सांगताना मध्येच त्यांचे डोळे पाणावत होते. नातवाने विचारले देखील की "आजी, तुला तुझ्या आईची आठवण येतेय का गं?" त्या निरागस जीवाच्या पाठीवरुन मायेने हात फिरवत बाईंनी कविता पूर्ण शिकवली.

शब्दखुणा: 

वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 November, 2014 - 05:44

रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

विक्षिप्त माणसं

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 November, 2014 - 13:11

असतात ना!
या जगात विक्षिप्त माणसं असतात!

एखाद्याची एखादी सवय विक्षिप्त असते, तर एखाद्याचा स्वभाव विक्षिप्त असतो. कोणी कधीतरीच विक्षिप्तपणा दाखवतो, तर कोणी प्रसंगानुरूप व्यक्त होतो.

........... पण ती सारी एकाच दिवशी भेटावीत!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती