हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बाणा,...
जुना बाणा,नवा बाणा
यात फरक असु शकतो
जशी वेळ येईल तसा
हा फरक दिसु शकतो
कधी-कधी मात्र स्वार्थासाठी
बाणा सुध्दा अडलेला असतो
कठोर बाणा अन् नरम बाणा
एकमेकांनाच जोडलेला असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.
// कहानी "कुंची"की\\
मध्यंतरी कपाट आवरताना एका प्लॅस्टिक पिशवीत एक कुंची सापडली. सापडली म्हणजे ती हरवलेली नव्हतीच. ती फ़क्त पुढे आली.
ती कुंची आधी माझ्या नणंदेकडे होती. कलांतराने कधी तरी ती कुंची नणंदेने माझ्या धाकट्या जावेला दिली होती.....जेव्हा आमच्या घरातल्या सर्वात छोट्या(आणि लाडक्या) सदस्याचा जन्म झाला...... माझी पुतणी.
त्या आधी नणंदेने तिच्या मुलींसाठी ती कुंची वापरली होती. त्यातल्या मोठीचे, ती कुंची घातलेले गोड फ़ोटो आहेत.
मग हळूहळू कुटुंबातली मुलं मोठी होत गेली. आणि ती कुंची दृष्टीआड आणि विचाराआड सुद्धा.
घेरलेलं बजेट,...
बजेट जाहिर करताना
भावना म्हणे दूजी आहे
महा-बजेट वरती सुध्दा
कुठे महा-नाराजी आहे
बजेट आणि नाराजीचं
असं हे सुत्र ठरलेलं असतं
प्रत्येक-प्रत्येक बजेटला
नाराजीनं घेरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
१९ मार्च २०१५ दै. प्रजापत्र
रविवार सुट्टीचा दिवस , म्हणून सकाळी सकाळी पायीच फिरायला बाहेर पडले. कोकण एक्सप्रेस - कर्वे पुतळा अस करत मृत्युंजयेश्वर च्या मंदिरात गेले.
सकाळी कोणीच नव्हत मंदिरात. फक्त दोन भटजी, साफसफाई करणाऱ्या मावश्या आणि मी. शांतता भरून राहिली होती मंदिरात. एरवी कुणीना -कुणीतरी असतच. जोरात घंटा वाजवून आत शिरले , मनातले विचार पूर्णपणे बाजूला पडलेले आणि फक्त सुरेख सजावट केलेली पिंड दिसत राहिली.
नमस्कार मायबोलीकर …
इथे व्यक्त होण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
एक नविन विचार मांडत आहे. कसं वाटतंय लेखन जरूर सांगा...
अगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजूनही जपून ठेवली आहेत मी.
नजर तुझी बोललीच सखे
खरे काय अन काय खोटे
कशापायी हा आटापिटा
अन राईचे पर्वत मोठे
मम हृदयी नित्य वसलीस
अनभिज्ञ कोलाहलापासून
आर्त मनाची हाक गेली
अगतिक श्वासांमधे विरून
छवी माझी तुझ्या हृदयी
राहिली मात्र परकी उपरी
असत्याचा होता आजवर
मखमली पडदा भावनेवरी
नको करू सायास रिकामा
खोटेच मैत्र आणि दिखावा
चल तोडून टाकू बंध रेशमी
मुक्त करू आठवणींचा रावा
तो.....माझ्या नजरेतला
हे प्रिय,
बऱ्याच दिवसांनंतर मी तुझ्याशी लिखित स्वरुपात बोलते आहे. तुझ्यापासून दूर होते तेव्हा तुझ्याशी होणारा संवाद, प्रेम, राग, शंका-कुशंका सगळं सगळं डायरीत लिहून काढायचे (व डायरी तुला वाचायला द्यायचे). एकत्रित राहायला लागल्यावर थेट तुझ्याशीच बोलायला लागले. तरीही काहीतरी उरतच.....लिहिण्यासाठी.....
आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो.
ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही.
म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी:
"स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।"