नमस्कार. मी मायबोलीवर पूर्वी एकदोनदा मला ज्या समस्या भेडसावत होत्या त्या मी इथे मांडल्या व मायबोलीकरांनी त्यास उपयुक्त प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. हा धागा त्यासंदर्भातच पण पुढच्या पायरीबाबत आहे.
नैराश्य आणि देव आनंद.
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युने नैराश्याशी झगडण्यास आभासी दुनियेतील तारे सितारे असमर्थ ठरत आहेत आणि स्वतःचे जीवन संपवित आहेत असा मतप्रवाह दिसतो. या पार्श्वभूमीवर मला हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे त्यांनीही त्यांच्या आयुष्यात बरेच अपयश पाहिले. आर्मी पोस्ट ऑफिस मध्ये क्लार्कची नोकरी करण्या पासून ते हिंदी सिनेसृष्टीत कित्येक दशकं पाय घट्ट रोवून उभे राहण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर आपल्याला कळतं की अपयशातून ही माणूस मार्ग काढू शकतो.
कालच कासव हा सुंदर चित्रपट पाहायला मिळाला, हि संधी मिळून दिल्या बद्दल मायबोली प्रशासनाचे आभार. आधीच या चित्रपटावर सई, सई केसकर आणी अगो यांनी इतके छान लिहिले आहे कि मी चित्रपटाच्या आशयाबद्दल काही लिहिणे म्हणजे त्याला तीट लावण्यासारखे वाटेल.
चित्रपट पहिल्या पासून ,कालिदासाने म्हंटल्या प्रमाणे,
रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्-
पर्युत्सुको भवति यत्सुखितोsपि जंतु:।
अशी अवस्था झाली आहे, घरी कोणी हा चित्रपट अजून पहिला नाहीये. आलेल्या अस्वस्थतेला कोणाशीतरी शेअर करण्यासाठी इकडे लिहितोय
रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!
दहावी-बारावीच्या निकालाचे दिवस जवळ आले की साधारणत: आपल्याला आठवतात ते कौतुकाचे बोल, पेढे आणि पुष्पगुच्छ. पण परीक्षेत मिळवलेल्या यशाबरोबरच शक्यता असते अपयशाची. अगदी वर्षभर अभ्यासू वृत्तीने मेहनत घेऊन चाचणी परीक्षेत पैकीच्यापैकी गुण विद्यार्थ्यापासून ते काही कारणांमुळे मनाजोगता अभ्यास न होऊ शकलेल्या विद्यार्थ्याला भेडसावणारा राक्षस म्हणजे अपयश; आणि हे अपयश म्हणजे फक्त परीक्षेत नापास होणे नाही, तर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे हे सुद्धा एक प्रकारे अपयशच.
ह्याआधीचा लेख - मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?
मागच्या लेखात आपण पाहिले की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रियांच्या आयुष्यातील एक अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.
त्या वेळी जाणवणारी शारीरिक आणि मानसिक त्रासाची लक्षणे ही इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होतात.
कुठली लक्षणे असतात ही ?
तुम्हाला हिमगौरीच्या गोष्टीतील "हाय हो, हाय हो, हाय हो" असं आनंदाने म्हणत लुटुलुटु चालणार्या सात बुटक्यांची फौज आठवते का ?
" किती जोरात बोलतोस ? जरा हळू बोल."
......"अरेच्चा, कमाल आहे तुझी. मी नेहमीसारखाच बोलतोय. तुलाच मोठ्याने ऐकू येतंय."
" प्लीज मला त्रास देऊ नका. का सगळे मला छळायला टपलेत ?"
......नवरा हतबल. आणि मुलांचे गोंधळलेले, दुखावलेले प्रश्नांकित चेहरे. "आई असं का करतेय ?"
" माझ्या हातून काहीच होणं शक्य नाही. मी काहीही करायच्या लायकीची नाही."
....उच्चशिक्षित, जबाबदार पदावर असलेल्या समर्थ स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्यं....टिपिकली मासिकपाळी यायच्या आधीच्या दिवसांतली.