सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असल्यानं थोडं सांभाळून घ्या.
या वर्षी राजस्थान ची सहल करावी असा मानस होता. पण आमचे चिरंजीव यांचं आसाम ला पोस्टिंग झालं अन मग ठरवलं या वर्षी पूर्वोत्तर राज्य.
नोव्हेंबर महिन्यात नियोजन करायचे ठरले पण दसरा आन दिवाळी यामुळे विमान प्रवासाचे चढे दर त्यामुळे डिसेंबर महिन्यात जाण्याचे पक्के केले.
जाताना पुणे ते दिल्ली व दिल्ली वरून गोहाटी या साठी स्वस्त म्हणून एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनी ची तिकीट बुक केली. तसेच येताना गोहाटी ते पुणे इंडिगो ची तिकीट बुक केली.
काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले.
बंगळूर महाराष्ट्र मंडळ हे नवीन नवीन कार्यक्रम आखून पार पाडण्याच्या बाबतीत अत्यंत उत्साही आहे. त्यांचा शिवगंगे ट्रेकबद्दल मेसेज आला तेव्हा लगेचच जाण्याचं पक्कं केलं. याआधी हुळुकुडी बेट्टा नावाच्या ट्रेकला मंडळाच्या सदस्यांबरोबर जाऊन आलो होतो. तेव्हा खूपच मजा आली होती. तो ट्रेक तसा सोपा होता. शिवगंगे त्यापेक्षा थोडासा अवघड असल्याचं गूगल केल्यावर लक्षात आलं. उंचीला सिंहगडाच्या निम्मा आहे. बंगळूर हे पश्चिम आणि पूर्व घाटापासून लांब असल्यामुळे इथे आजूबाजूला आपल्या सह्याद्रीसारखे उंच उंच डोंगर नाहीत. पण अशा टेकड्या मात्र अनेक आहेत.
तर आजचा शेवटचा दिवस.
ओदारीला आल्यापासून पास समोर दिसत होता. बेस कॅम्पला तर अगदी समोर होता. हा तर चुटकीसरशी चढून जाऊ. हा ट्रेक डिफीकल्ट कॅटेगरी आहे, इथवर येताना अनेकदा अनुभव घेतलाय, पण कोणत्याही ट्रेकचा सगळ्यात कठीण भाग असतो तो समीट. ते तर समोर दिसतय आणि सहज अचीव्हेबल आहे हे ही कळतय मग अजून डिफीकल्ट काय असेल ?
नाही म्हणायला उतरतांना कठीण रस्ता आहे हे आठवत होतं पण एवढे कठीण चढ चढून आलो आहोत, आता उतरायचं तर आहे मग काय ! असंही वाटत होतं.
ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.
७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.
आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.
निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.
" आप बाली पास करके आये है लगता है " यमुनोत्रीच्या मंदिरातले पुजारी आम्हाला विचारत होते. आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता मंदिर उघडायची वाट पहात थांबलो होतो. ह्यांना कसं कळलं ? हाच प्रश्न खाली उतरतांना वाटेत लागणार्या दुकानातून विचारला गेला, तेव्हाही फार आश्चर्य वाटलं. शेवटी आपले रापलेले चेहरे बघून ह्यांना कळलं असावं अशी समजून करुन घेत होतो ते आमचा एक गाईड म्हणाला, सिर्फ बाली पास करके आने वाले लोग इतने जल्दी यहा पोहोच सकते है. नाहीतर खालून वर चढायला सहा शिवाय सुरुवात करता येत नाही.
(निशिकांत यांच्या 'भार झाले' गझलेवरून ही सुचली. त्यांची मूळ गझल छानच आहे. ह्यातला काफिया की रदीफ की काय म्हणतात तो सोडला, तर बाकी तसा ह्या गझलेचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा गझल लिहिण्याचा काहीच अनुभव नाही, त्यामुळे ह्याला गझल म्हणत नसतील तर कृपया दुसर्या ठिकाणी हा धागा हलवावा ही विनंती.)
जन्म माझे फार झाले
अन् भुईवर भार झाले
जन्मत: होते खटारा
आज मी मोटार झाले
छान होता जाड पत्रा
तेच माझे दार झाले
वितळुनी लोखंड-तुकडे
लांबवीता 'तार' झाले