ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे
मला HDFC ERGO विरुद्ध ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे.
मला HDFC ERGO विरुद्ध ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे.
माझ्या नणंदेच्या मिस्टरांची डायलिसिसची ट्रीटमेंट चालू आहे
डायलिसिसचा खर्च आवाक्याबाहेर चालला आहे
कालपासून प्रकृती जास्त खालावल्यामुळे ते व्हेंटीलेटरवर आहेत
घरातली कमावती व्यक्ती आजारी असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे
मुंबई किंवा ठाणे परिसरात अशा काही समाजसेवी संस्था आहेत का ज्या डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत करू शकतात ?
आम्ही मदत करतच आहोत आमच्या परीने पण ती मदत पुरेशी पडत नाहीये
माझ्या नात्यात एक ग्रुहस्थ - वय वर्षे ८०+ आणि त्यांचा मुलगा - वय ५० - असे दोघेच रहातात. वडिल रिटायर्ड होमिओपथी डॉ...., मुलगा - हा थोडा डोक्याने कमी (iq कमी आणि फार पूर्वी डिप्रेशनचा त्रास झाल्याने १२ वी नंतर सोडून दिलेले शिक्षण). तो घरातली कामं, बाजारहाट वगैरे करतो पण बाकी काही बाहेर काम धंदा करत नाही, कधीच केला नाही. वडील आहेत तोपर्यंत ठीके. पण त्यांच्यामागे त्या मुलाला (पुरूषाला) एकटे रहाणे, सर्व व्यवहार करणे, घर manage करणे - कठीण जाणारे. एकंदरीत पाचपोच, जगात वावरायला लागणारा सेन्स याची त्याच्या कमी आहे.
एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
लाड कारंजावरुन येऊन जयवंतला एक आठवडा झाला होता. बाबांचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता. कसे असतील? काय करत असतील? आई शिवाय त्यांचं जगणं ही कल्पना त्या क्षणी त्याला असह्य होत होती. आईच्या अचानक जाण्याने समस्त नाईक कुटुंब शोकाकुल होतं. आईच्या इच्छेप्रमाणे तिचे दिवस वार न करता ठराविक रक्कम लाडकारंजाच्या मठात देऊन तो नाशिकला परतला होता. बाबांना आग्रह करुनही कारंज्याहूनच ते अकोल्याला परतले.
आई ..... आठवणीने जयवंतचे डोळे भरुन आले.
"जयवंत ... हे घे चहा." शर्वरीने त्याच्या हातात कप दिला आणि ती ही टेरेसवरुन खाली बगिच्यात खेळणार्या मुलांकडे बघू लागली.
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
नोटः मी मायबोलीचा जुना सदस्य असलो तरी हा माझा डुप्लिकेट आयडी आहे
सहावर्षापुर्वी आमच्या एका नातेवाईकांकडून तिचे प्रोफाईल आमच्याकडे आले. प्रथमदर्शीच ती दिसायला निट नेटकी, चांगल शिक्षण असलेली असल्यामुळे आम्ही स्थळ पसंत केल.
दोन महिन्यानीं मध्ये आमचे अरेन्ज मॅरेज झाले. तिन आम्हाला एक गोड मुलगी देखिल झाली.
लग्न होण्याच्या अगोदरच मी तिला विचारले होते की 'तुझा कोणी बॉयफ्रेन्ड तर नाही/नव्हता' तीचे उत्तर नकारार्थी होते.
मला ट्रेकिंग चे खूप आकर्षण आहे लहानपणापासून. पूर्वी पुण्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर जाउनही झाले आहे. जसे कि तोरणा , राजगड , पुरन्दर , सिंहगड , लोहोगड , विसापूर .
छोटे ट्रेकही केले होते. उदा कात्रज - सिंहगड , कावळ्या किल्ला - शिवथर - हिरडोशी
परत सुरूवात करायची आहे. काही मित्र भक्कम ट्रेकर आहेत पण त्यंच्याबरोबर एकदम जाणे झेपणार नाही . त्यासाठी तयारी म्हणून छोटे १५-२० कि.मी. चालण्याचे एक-दोन दिवसाचे ट्रेक सुचवा. शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.
खालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का ?