एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
लाड कारंजावरुन येऊन जयवंतला एक आठवडा झाला होता. बाबांचा चेहरा डोळ्यापुढून जात नव्हता. कसे असतील? काय करत असतील? आई शिवाय त्यांचं जगणं ही कल्पना त्या क्षणी त्याला असह्य होत होती. आईच्या अचानक जाण्याने समस्त नाईक कुटुंब शोकाकुल होतं. आईच्या इच्छेप्रमाणे तिचे दिवस वार न करता ठराविक रक्कम लाडकारंजाच्या मठात देऊन तो नाशिकला परतला होता. बाबांना आग्रह करुनही कारंज्याहूनच ते अकोल्याला परतले.
आई ..... आठवणीने जयवंतचे डोळे भरुन आले.
"जयवंत ... हे घे चहा." शर्वरीने त्याच्या हातात कप दिला आणि ती ही टेरेसवरुन खाली बगिच्यात खेळणार्या मुलांकडे बघू लागली.
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
मला ट्रेकिंग चे खूप आकर्षण आहे लहानपणापासून. पूर्वी पुण्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर जाउनही झाले आहे. जसे कि तोरणा , राजगड , पुरन्दर , सिंहगड , लोहोगड , विसापूर .
छोटे ट्रेकही केले होते. उदा कात्रज - सिंहगड , कावळ्या किल्ला - शिवथर - हिरडोशी
परत सुरूवात करायची आहे. काही मित्र भक्कम ट्रेकर आहेत पण त्यंच्याबरोबर एकदम जाणे झेपणार नाही . त्यासाठी तयारी म्हणून छोटे १५-२० कि.मी. चालण्याचे एक-दोन दिवसाचे ट्रेक सुचवा. शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.
खालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का ?
करणार का मला मदत, थोडीशी?
पण, मी कोण ते आधी
सांगायला हवं, नाही का?
तर, जे जे या जगी जगते, तयामधी
असतात माझे भाई बंद किंवा मी.
आमची संख्या किती?
अमिबा पासून ते माणसापर्यंत आणि हरीत पेशी पासून वृक्षांपर्यंत
संख्या येईल का मोजता तुम्हाला ? नाही ना?
दगड-धोंडे, नद्या-नाले, वाळवंटं-पठारं, वनं, शेतजमिनी ......
द्या राव सोडून. त्याला महत्व देणार तरी किती?
तर, मी कोण?
मी आहे, नकारांची न संपणारी साक्षात मालीका.
(वाहिनी कोणती असला खुळचट प्रश्न विचारू नका.)
आता, नकार कोणकोणते?
म्हणजे बघा,
मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही,
मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला
आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1
योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.
१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,