वृत्ते! अस्वस्थ करणारी! [१]युवकांच्या बाइक्सवरील कसरती
निदान तीन एक महिन्यांपासून वाहिन्यांवर दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्या युवकांची धाडसी कृत्ये दाखविली जात होती. दिल्ली पोलिस हे कसे काय खपवून घेतात असे प्रश्नही उद्भवत होते. अशा तरुणांची खरी जागा एक कमांडो शिबिरात वा बंदीगृहात असायला हवी असेही पहाणार्यांच्या मनात येणे स्वाभाविक!
अशा वेळी दोन दिवसांपूर्वी अचानक
" दिल्लीत बाईक्सवर बेरात्री धोकादायक कसरती करणार्या युवकांना काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारत एक युवक ठार आणी दुसरा जखमी."
हे वृत्त !
"अहो अॅडमिन जागे व्हा...."
हे वाक्य वाचलं, की अश्याच अर्थाचे अनेक वाक्य आठवतात. लहानपणी आई बरेचदा मला "लष्कराच्या भाकर्या कशाला भाजतोस" असं म्हणायची, पण ते नेमकं काय असतं त्यावेळी कळत नव्हतं, ते कळायला लागलं ते मी अॅडमीन झालो तेंव्हा.
इंटरनेट आलं तसं एकमेकांशी टायपिंग करुन संवाद साधण्याचं एक नवं दालन सुरु झालं. आधी इमेल्स आणि मग चॅटींग... पुढे याहू-ग्रूप्स अशी ओळख होत गेली. त्यावेळी एक सदस्य म्हणुन मी बरेचदा मित्रमैत्रिणी (की मराठी मित्रमैत्रिणी) अश्या एका ग्रूपवर लिहित गेलो. नवनविन मित्र-मैत्रीणींची ओळख झाली. पण ....
मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.
आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही. 
अकाली म्हातारं झालेलं गांव
पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.
आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे
आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.
नेत्रदान खर्या अर्थाने सार्थकी लागते काय?
नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.
गोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील
हे पुस्तक मला पुण्यातल्या मित्रमंडळींनी भेट दिलेय. याचे प्रकाशक आहेत, ग्रामसभा, मेंढा (लेखा), पो. हेटी, ता. धानोरा , जि. गडचिरोली ४४२६०६, महाराष्ट्र आणि अर्पण केलेय, "भारतीय जनतेस...". या दोन बाबींवरुनच
हे पुस्तक खुपच वेगळे आहे, हे जाणवलेच. आहे केवळ १४० पानांचे. एवढ्या आकाराचे पुस्तक, मला
वाचायला फारतर २ तास लागतात. पण हे पुस्तक मी गेले महिनाभर थोडे थोडे करत वाचतोय. कारण ते
तसेच वाचावे लागते.
असे काय आहे या पुस्तकात ?
हि गोष्ट असली तरी काल्पनिक नाही. ज्या गावच्या ग्रामसभेने ते प्रकाशित केलेय, त्याच गावाची सत्यकथा.
सातवा आसमान , सात अजुबे , सप्ताह ,सप्तपदी ,सप्तसूर ,सप्तश्री ,असे अनेक सप्तक आपण अनुभवतो ,ऎकतो ,वाचतो ,पाहतो ."आम्ही सातपुते " हा एक चित्रपट देखील आपण पा हिला आहे .यात एक नवीन भर पडली आहे ती "सातवा सिलिंडर ची ". नुकताच पी चिदम्बरम साहेबांनी एक फतवा काढला आणि एका कुटुंबास दरवर्षी फक्त सहा अनुदानित ग्यास सिलिंडर्स मिळणार यावर शिक्का मोर्तब झाले .सातवा सिलिंडर हा बाजारभावाप्रमाणे घ्यावा लागणार हे समजल्यावर अस्मादिकांची झोपच गायब झाली .