चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान

'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)

प्रकार: 

'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं आज सकाळी निधन झालं.

'सिंहासन', 'कलयुग, 'आक्रोश', 'रिहाई', 'नितळ', 'अनुमती', 'सावली', 'घराबाहेर' अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या विलक्षण ताकदीच्या भूमिकांपेक्षा प्रसारमाध्यमांमध्ये रीमाताईंच्या चित्रपटांतल्या, विशेषतः सुपरहिट हिंदी चित्रपटांमधल्या, त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांचीच चर्चा अधिक झाली.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

परिवर्तन ट्रस्ट निर्मित लघुपट - 'जागृती' व 'मन की आँखे'

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').

विषय: 
प्रकार: 

संवाद - वीणा जामकर / सोनाली नवांगुळ

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

’वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', ’बेभान’, ’मर्मबंध’, 'लालबाग परळ', ’तुकाराम’, 'पलतडचो मुनिस', 'कुटुंब', 'मित्रा' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल', ’दावेदार’, ’वदनी कवळ घेता’, ’तीच ती दिवाळी’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर यांचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या वीणा जामकर यांनी व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे.

प्रकार: 

तळवलकर - श्री. मुकेश माचकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा.

प्रकार: 

गोविंदराव, आय मिस यू! - श्री. विनय हर्डीकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

साक्षेपी लेखक व संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांचं काल निधन झालं. गेल्या वर्षीच्या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकात श्री. विनय हर्डीकर यांनी गोविंदरावांवर एक लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

श्री. गोविंदराव तळवलकर यांना मन:पूर्वक आदरांजली.

प्रकार: 

..आणि एक दिवस रफीचा आवाज कानावर आला...! - श्री. इर्शाद बागवान

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

'आंदोलन' मासिकाच्या गणतंत्र विशेषांकाच्या 'किस से चाहिये आझादी' या विशेष विभागाचं संपादन श्री. श्रीरंजन आवटे यांनी केलं. त्या विभागात त्यांनी समाविष्ट केलेलं श्री. इर्शाद बागवान यांचं हे अनुभवकथन.

***

बंधनं अडवणूक करतात. वाढीचा मार्ग रोखून संकुचित विश्वात बंदिस्त करतात. मग हळूहळू आपल्यालाही त्या बंधनांची सवय होऊन जाते. इतकी की, आपण त्या भिंतींपलीकडे असणाऱ्या अमर्याद जगाची कवाडं स्वतःच्या हातांनी कुलुपबंद करतो आणि मग एका क्षणी असं होतं की, नजर उचलून त्या भिंतींपलीकडे पाहण्याएवढंही धैर्य आपल्यांत उरलेलं नसतं.

विषय: 
प्रकार: 

‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ.

प्रकार: 

विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

विषय: 
प्रकार: 

गंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

Pages

Subscribe to RSS - चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान