लेख

लेख

बोटळर वेंकटसामी आणि त्यांचे खीड्डपप्प्स्‌

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

पिवळे पडलेले जाड, पण जीर्ण कागद. साधारण वहीच्या पानाच्या आकारचे, पण अरुंद. कधीकाळी एका बाजूनं ते जाड दोर्‍यानं एकत्र शिवले असावेत, अशा खुणा. पहिल्या पानावर बाळबोध देवनागरीत काहीतरी लिहिलंय, पण ते आता वाचता येत नाही. शाई पुसली गेली आहे. कोपर्‍यात तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाचा अतिपुसट शिक्का. त्या खाली जाड, काळ्या पेनानं लिहिलंय - D. No. 2644 ; MS 2319. ’इंग्रजी जेवण्याचे जिनस करावयाची पद्धती’, हा तपशील ग्रंथालयाच्या सूचीत अधिकचा. हीच या हस्तलिखिताची ग्रंथालयातली ओळख.

विषय: 
प्रकार: 

'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!

प्रकार: 

मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.

विषय: 
प्रकार: 

नदीच्या वाहण्याची गोष्ट!!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

माझी फिल्म येतेय. त्या प्रवासाबद्दल थोडसं लिहिलं होतं ब्लॉगवर. तर माचकरांनी ते आपल्या पोर्टलसाठी परत आणि तपशिलात लिहून मागितलं. तो परत लिहिलेला लेख अ‍ॅडमिनच्या परवानगीने इथे टाकतेय. हा प्रवास इथे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतोय. श्वासच्याही आधीपासून मायबोलीशी माझं नातं आहे. त्यामुळे मायबोलीचे माझ्या आयुष्यात एक स्पेशल स्थान आहे. हे एक कारण आणि दुसरं म्हणजे यातला माझा बराचसा प्रवास चालू होता त्या काळात मी मायबोलीवर भरपूर अ‍ॅक्टिव्ह होते. अनेकांना माझ्या इकडेतिकडे फिरण्याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत तेव्हा. तर हा लेख.

विषय: 
प्रकार: 

तळवलकर - श्री. मुकेश माचकर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा.

प्रकार: 

गोविंदराव, आय मिस यू! - श्री. विनय हर्डीकर

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

साक्षेपी लेखक व संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांचं काल निधन झालं. गेल्या वर्षीच्या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकात श्री. विनय हर्डीकर यांनी गोविंदरावांवर एक लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

श्री. गोविंदराव तळवलकर यांना मन:पूर्वक आदरांजली.

प्रकार: 

..आणि एक दिवस रफीचा आवाज कानावर आला...! - श्री. इर्शाद बागवान

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

'आंदोलन' मासिकाच्या गणतंत्र विशेषांकाच्या 'किस से चाहिये आझादी' या विशेष विभागाचं संपादन श्री. श्रीरंजन आवटे यांनी केलं. त्या विभागात त्यांनी समाविष्ट केलेलं श्री. इर्शाद बागवान यांचं हे अनुभवकथन.

***

बंधनं अडवणूक करतात. वाढीचा मार्ग रोखून संकुचित विश्वात बंदिस्त करतात. मग हळूहळू आपल्यालाही त्या बंधनांची सवय होऊन जाते. इतकी की, आपण त्या भिंतींपलीकडे असणाऱ्या अमर्याद जगाची कवाडं स्वतःच्या हातांनी कुलुपबंद करतो आणि मग एका क्षणी असं होतं की, नजर उचलून त्या भिंतींपलीकडे पाहण्याएवढंही धैर्य आपल्यांत उरलेलं नसतं.

विषय: 
प्रकार: 

गाता रहे मेरा फिल्मी दिल

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

गाता रहे मेरा फिल्मी दिल

दहावी पास होई पर्यन्त माझी चित्रपटीय ( भक्त म्हणून ) वाटचाल अगदीच अगाध होती. "तू एकदा दहावी पास हो मग तूला घरी केबल लावून देइन" हे आईने दिलेले आश्वासन मला दहावीची परिक्षा पास होण्यास पूरेसे होते. तो पर्य.न्त गाण्याच्या भेण्ड्यातील माझे योगदान हे " शेवटचे अक्षर "ळ" आल्यास " ल" घेता येइल का? किन्वा " आता म्हटलेले गाणे मागे म्हटले गेले होते काय यावर चर्चा करणे येथ पर्‍यन्त सिमीत होते. शाळेतली मुले गाण्याच्या अन्तरा बरोबर पूर्ण दोन-तीन कडवी म्हणताना पाहून मला अचम्बीत व्ह्यायला होई.

विषय: 
प्रकार: 

विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेख