मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
लेख
लेख
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख
१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!
मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर
मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.
नदीच्या वाहण्याची गोष्ट!!
माझी फिल्म येतेय. त्या प्रवासाबद्दल थोडसं लिहिलं होतं ब्लॉगवर. तर माचकरांनी ते आपल्या पोर्टलसाठी परत आणि तपशिलात लिहून मागितलं. तो परत लिहिलेला लेख अॅडमिनच्या परवानगीने इथे टाकतेय. हा प्रवास इथे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतोय. श्वासच्याही आधीपासून मायबोलीशी माझं नातं आहे. त्यामुळे मायबोलीचे माझ्या आयुष्यात एक स्पेशल स्थान आहे. हे एक कारण आणि दुसरं म्हणजे यातला माझा बराचसा प्रवास चालू होता त्या काळात मी मायबोलीवर भरपूर अॅक्टिव्ह होते. अनेकांना माझ्या इकडेतिकडे फिरण्याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत तेव्हा. तर हा लेख.
तळवलकर - श्री. मुकेश माचकर
लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा.
गोविंदराव, आय मिस यू! - श्री. विनय हर्डीकर
साक्षेपी लेखक व संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांचं काल निधन झालं. गेल्या वर्षीच्या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकात श्री. विनय हर्डीकर यांनी गोविंदरावांवर एक लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्री. गोविंदराव तळवलकर यांना मन:पूर्वक आदरांजली.
..आणि एक दिवस रफीचा आवाज कानावर आला...! - श्री. इर्शाद बागवान
'आंदोलन' मासिकाच्या गणतंत्र विशेषांकाच्या 'किस से चाहिये आझादी' या विशेष विभागाचं संपादन श्री. श्रीरंजन आवटे यांनी केलं. त्या विभागात त्यांनी समाविष्ट केलेलं श्री. इर्शाद बागवान यांचं हे अनुभवकथन.
बंधनं अडवणूक करतात. वाढीचा मार्ग रोखून संकुचित विश्वात बंदिस्त करतात. मग हळूहळू आपल्यालाही त्या बंधनांची सवय होऊन जाते. इतकी की, आपण त्या भिंतींपलीकडे असणाऱ्या अमर्याद जगाची कवाडं स्वतःच्या हातांनी कुलुपबंद करतो आणि मग एका क्षणी असं होतं की, नजर उचलून त्या भिंतींपलीकडे पाहण्याएवढंही धैर्य आपल्यांत उरलेलं नसतं.
गाता रहे मेरा फिल्मी दिल
गाता रहे मेरा फिल्मी दिल
दहावी पास होई पर्यन्त माझी चित्रपटीय ( भक्त म्हणून ) वाटचाल अगदीच अगाध होती. "तू एकदा दहावी पास हो मग तूला घरी केबल लावून देइन" हे आईने दिलेले आश्वासन मला दहावीची परिक्षा पास होण्यास पूरेसे होते. तो पर्य.न्त गाण्याच्या भेण्ड्यातील माझे योगदान हे " शेवटचे अक्षर "ळ" आल्यास " ल" घेता येइल का? किन्वा " आता म्हटलेले गाणे मागे म्हटले गेले होते काय यावर चर्चा करणे येथ पर्यन्त सिमीत होते. शाळेतली मुले गाण्याच्या अन्तरा बरोबर पूर्ण दोन-तीन कडवी म्हणताना पाहून मला अचम्बीत व्ह्यायला होई.
विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण
समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.
गंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली
Pages
