दिठी
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥
दिग्दर्शिका "सुमित्रा भावे" यांचे चित्रपट समजून घेणं, हीच खरी श्रध्दांजली....
ऋतुपर्ण घोष यांच्या निधनाला काल सहा वर्षं पूर्ण झाली. उन्नीशे एप्रिल, तितली, बाडीवाली, नौकाडुबी, दहन, शुभो मुहूरत, अंतर्महाल, खेला, चित्रांगदा असे एकापेक्षा एक सरस चित्रपट निर्मिणारा हा एक थोर कलावंत होता.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याशी त्यांचा दाट स्नेह होता.
ऋतुपर्ण घोष यांच्या अकाली निधनानंतर सहा महिन्यांनी सुमित्रा भावे यांनी एका दिवाळी अंकासाठी जो लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
सुमित्रा भावे - सुनीक सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.
सुमित्रा भावे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगणारा हा लेख.
६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=Hs5kdjwmizU
डॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.
'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.
७ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक आरोग्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य संस्थेनं 'नैराश्य', म्हणजे 'डिप्रेशन' या आजारावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून या वर्षीची संकल्पना आहे - 'चला बोलूया - नैराश्य टाळूया' ('Depression– Let’s talk').
'मुळी अधिक जाणिवेचे | अधिष्ठान आहे' अशा शब्दांत दासबोधात अंतरात्म्याची एक ओळख सांगितली आहे. माणसाचा सत्याचा शोध युगानुयुगे चालत आलेला आहे. पण हा सत्याचा शोध माणसाच्या माणूसपणाच्या जाणिवेतच रुतला आहे का? जाणिवेच्या पलीकडचं काही सत्य असतं की नाही? असे अनेक प्रश्न व त्यांचा उहापोह 'अस्तु - so be it' च्या निमित्ताने डोक्यात येतात. चित्रपटाच्या सुरवातीलाच 'सत्य हे जाणिवेतून येतं' (Truth stems from awareness) अशासारखं एक वाक्य आहे. हा ह्या चित्रपटाचा आत्मा म्हणायला हरकत नसावी.
एक चित्रपट दिग्दर्शिका.
एक निर्मात्री.
एक लेखिका आणि एक अभिनेत्री.
या दिग्दर्शिकेला एक संहिता लिहायची आहे.
पण या संहितेचा शेवट कसा असावा?
आपली संहिता आपल्याला लिहिता येते का?
या चौघींना आपल्या संहितेचा सुखांत करता येईल का?
सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स व अशोक मूव्हीज प्रा. लि. यांच्या सहकार्यानं सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या विचित्र निर्मिती या संस्थेनं 'संहिता'ची निर्मिती केली आहे.
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला असून दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं या चित्रपटानं पटकावली आहेत.
प्रिय मित्रांनो,
म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.
लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.
इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.
आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.
अण्णा हजार्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी 'जनलोकपाल विधेयक' संमत व्हावं, या मागणीसाठी आंदोलन छेडलं, आणि बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सामील झाला. उपोषणं, मोर्चे, चर्चा, वादविवाद असं कायकाय घडू लागलं. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. या ऐतिहासिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'हा भारत माझा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्यात भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला. मायबोली या विचारप्रवर्तक चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.