श्री पंढरीनाथ महाराज
परब्रह्म दिव्य । भले साकारले ।
सुंदर सावळे । पंढरीत ।।
कटीवरी कर । विटेवरी उभे ।
रखुमाई शोभे । वामांगी ती ।।
मस्तकी किरीट । मकर कुंडले ।
गळा माळ रुळे । तुळशींची ।।
अर्ध उन्मिलित । नयने न्याहाळी ।
मांदियाळी भली । भक्तांची की ।।
झळके बरवे । स्नेह मुखावरी ।
सस्मित अधरी । श्रीहरीच्या ।।
नाभी नाभी ऐसे । भक्तांसी कौतुके ।
आश्वासित देखे । प्रेमभरे ।।
भाव देखोनिया । अति शुद्ध एक ।
होतसे पाईक । भक्त काजि ।।
देव भक्त
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत
देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण
भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
२००८ सालची सुरुवात होती, मी तेव्हा BAMS च्या अंतिम वर्षाला होतो. मराठवाड्यातील लातूरला आयुर्वेद व्यासपीठने कसल्यातरी परिसंवादाचे आयोजन केले होते. अंतिम वर्ष असल्याने व संपूर्ण BAMS मध्ये अश्या निमित्ताने कधीही जाणे झाले नसल्यामुळे परिसंवादाला जाण्याची खूप उत्सुकता होती. नागपूर ते लातूर सुमारे १०-११ तासांचे अंतर आहे आणि मात्र त्या वेळी कोणतीही थेट ट्रेन नसल्याने (आता १-२ तरी जातात) बसचा चार दिवसांचा पास काढून आदल्या दिवशीच तिकडे पोहोचुया असा विचार मनाशी ठरवून प्रवासाला सुरुवात केली. प्रवास उत्तम झाला आणि हाती बराच वेळ असल्याने ऐन वेळी लातूर ऐवजी पंढरपूरला जावून परिसंवादाआधी परतावे असे ठरले.
संशोधनाच्या पूर्वनियोजित मार्गावरून चालताना कितीदातरी नकळताच पायाखाली नव्या, अनपेक्षित वाटा येत राहतात. आपण कितीही नाही म्हणले तरी पायाखाली आपसूक सरकलेल्या त्या वाटांवरून थोडे तरी चालत जातो. त्या वाटा नवी कोडी घालत- उलगडत राहतात आणि आखीव प्रवासात लागणारी ही छुपी वळणे शोधयात्रा फार समृद्ध करून सोडतात हा अनुभव बहुतेक सगळ्याच संशोधकांना येतो. माझी ही कथाही काही वेगळी नाही.
मग तू अवघाचि सुखरुप होसी ....
वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....
आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....
लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी|
भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी |
शोभे तुळशी माळ ज्याचे गळा|
राजस सुकुमाराचा मज लागो लळा|
वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा|
पाहावा सुख सोहळा डोळे भरोनिया |
पंढरीत होती साऱ्या संतांचिया भेटी |
वैकुंठ अवतरे भूवरी चंद्रभागे काठी |
अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
माघ शुक्ल एकादशी शके १९३३
(२ फेब्रुवारी २०१२)