मुंबई

आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

Submitted by सचिन काळे on 18 June, 2017 - 03:16

माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.

शब्दखुणा: 

आकवर्डनेस आणि आजीबाई

Submitted by भास्कराचार्य on 16 January, 2017 - 12:36

मुंबई-पुणे-मुंबई हा 'आयकॉनिक' प्रवास बटाट्याच्या चाळीतल्या भ्रमणमंडळाने केला, त्याला आता बरीच युगे लोटली. सध्या तो इतका 'आयकॉनिक' राहिलेला नाही, हे इतिहासाचार्य बाबूकाका खर्‍यांचे सध्याचे मत चिंत्य आहे. (साला एक्प्रेस वे काय पटापट घेऊन जातो साला! उगाच नाय! - इति सोकाजीराव त्रिलोकेकर.) पण 'आयकॉनिक' नसलेला हा प्रवास 'आय कॉमिक' असे मधूनमधून उभे राहून हजेरी लावल्यागत म्हणतो, हे खरे. (खरे म्हणजे सत्य, बाबूकाका नव्हे.) ``मानवजातीने आजपर्यंत बरेच चिरंतन प्रवास पाहिले आहेत. मुंबई-पुणे हा त्यातील महत्वाचा होय.'' असे प्रसिद्ध तत्वज्ञ `प्ले. अ. टो' ह्याने आपल्या `लॉज' ह्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

विषय: 

कोल्ड प्ले कॉन्सर्ट

Submitted by अश्विनीमामी on 15 September, 2016 - 03:26

कोल्डप्ले ह्या गॄपचे भारतात मुंबई येथे कॉ न्सर्ट होणार आहे. त्याच्या तिकीटा साठी झुंबड उडाली आहे.

जे झी पण येणार आहे. वहिनी येणार नाहीत बहुतेक. तर ह्या इवेंट ची चर्चा करण्या साठी धागा.
जगातील गरीबी दूर करण्यासाठी झटणार्‍या इनिशिएटिव्हतर्फे हा काँसर्ट होणार आहे. तिकीटी ५००० रु. पासून सुरू आहेत.

जसजशी माहिती मिळेल तसे इथे अपडेट करत जाईन.

विषय: 

शोध(लेखक मुरलीधर खैरनार) : फॅन क्लब

Submitted by अश्विनीमामी on 18 May, 2016 - 05:46

शोध पुस्तक वाचले का? मला तर खूप छान वाटले. इतिहास आणि तंत्रज्ञानाची जोड चांगली घातली आहे. केतकी व शौनक जोडी, तसेच तो गोंदाजी आणि ते गावातले वातावरण, तो भायाचा सण सर्व अगदी मनोरंजक आहे. ह्या पुस्तकावर चर्चे साठी धागा.

ह्याची खरे तर फिल्म बनवली पाहिजे. खूप मस्त होईल. असे पाने उलटताना वाटत होते. पोस्टी लिहीताना फार रहस्य भेद होनार नाही ह्याची कृपया काळजी घ्यावी. ह्या पुस्तकावर आधारित काही मर्चं डाइज उपलब्ध असते तरी मी ते घेतले असते. उदा. पहिला तो श्लोक मोडीत लिहीलेले सुलेखन असलेला मग, भूदेवीची मूर्ती, मॅप चे चित्र असलेला टीशर्ट वगैरे.

विषय: 

NCPA, SOI आणि उस्ताद झाकीर हुसैन - ते अविस्मरणीय पाच दिवस

Submitted by आशयगुणे on 4 November, 2015 - 00:28

नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.

त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:

दिवस पहिला - २२ सप्टेंबर

मुंबई पुणे मुंबई २ - परीक्षण कम निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 November, 2015 - 07:15

काय परीक्षण लिहू.... थिएटरमधील दिवे लागले तरी काही काळ दिसेनासे झालेले. ईतके अश्रूंचे थेंब पापण्यात साठलेले. तरी काही निरीक्षणे नोंदवतो, तेच परीक्षण समजा.

१) या वर्षातला "मी पाहिलेला" सर्वात उत्कृष्ट चित्रपट.

२) स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेची जोडी पुन्हा एकदा हिट.

३) चित्रपट हसवतो, चित्रपट रडवतो, क्लायमॅक्सला अशी काही उंची गाठतो की पुन्हा पुन्हा पाहावे आणि पुन्हा पुन्हा डोळ्यात पाणी यावे.

४) मुन्नाभाईच्या सिक्वेलसारखी करामत मुंबई पुणे मुंबईच्या सिक्वेलनेही केली आहे.

विषय: 

टिकलेल्या गणेशोत्सवाची शान : मुंबईचे खर्या मानाचे तीनगणपती.

Submitted by मी दुर्गवीर on 20 September, 2015 - 10:12

" परंपरा जपणारे गणेशोत्सव "

मुंबईचा पहिला गणपती : केशवजी नाईकचाळ १२३ वे वर्ष (स्थापना : १८९३)
मुंबईचा दुसरा गणपती : जितेकरवाडी १२२ वे वर्ष (स्थापना : १८९४)
मुंबईचा तिसरा गणपती : कामतचाळ १२० वे वर्ष (स्थापना : १८९६)

कालचा दिवस एक विलक्षण क्षण होता . सकाळी ऑफिस ला निघातांनाच ठरवले होते . संपूर्ण दिवस सार्थकी घालवायचा . दुपारी ऑफिस मधील मैत्रीनीसोबत गिरगावात आलो . गिरगाव म्हणजे हक्काची जागा खुप काही नात या गिरगावाशी आणि येथील लोकांशी जोडले आहे .
खेतवाडीच्या १०व्या गल्लीत गौरी गणपती निम्मित नैवद्या वर ताव मारून पुढे आलो .

शहरातली ’समोवार’ जेव्हा बंद होत जातात..

Submitted by शर्मिला फडके on 6 April, 2015 - 00:26

’समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतात. मुंबईसारख्या गजबजाटी, कोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव ’समोवार’ असतं.
--

नो शेल्टर फॉर अभक्ष्यभक्षी :अओ:

Submitted by जाग्याव पलटी on 28 November, 2014 - 02:21

आजच्या वर्तमानपत्रात एक अनोखी बातमी वाचायला मिळाली की मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या आमदारांनी भाजपाचा संपूर्ण विरोध असताना विधानसभेला एक ठराव मंजूर करायला लावला की,

मुंबईत काही बिल्डर्सकडून "मांसाहारी लोकांना घरे विकायची नाहीत" अशा प्रकारची तिरस्करनीय गोष्ट अंमलात आणली जात आहे अशा बिल्डर्सना त्या प्रकल्पांची आय ओ डी दिली जावू नये

चर्चेचा प्रस्ताव
१. मांसाहार करणार्‍यांना घरे विकायची नाहीत ही कशा प्रकारची मानसिकता आहे? हे अन्यायकारक आहे किंवा कसे?
२. सत्तेतल्या पक्षाने सर्वसमावेशक विचार करणे अपेक्षित असताना भाजपाचा त्याला विरोध का असावा?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मुंबई