मैलाचे दगड कसे असतात तुम्हाला माहिती आहेच. ते नसले तर तुमचा प्रवास काही थांबत नाही. पण असलेच तर तुम्हाला गंतव्यस्थानी पोहोचायला थोडी मदत होते. रफीची गाणी उत्तम ठरण्यासाठी त्यावर कुणी चांगला अभिनय केलाच पाहिजे अशी काही गरज नव्हती. पण काही दगडांनी आपल्या न-अभिनयाने रफीच्या जीव ओतून गाण्याकडे आपले लक्ष वेधून घेतले. म्हणजे मॉडेल्सनी चेहरे कोरे ठेवले कि त्यांच्या अंगावरच्या कपडे किंवा दागिन्यांकडे आपले लक्ष जास्त जाते तसेच काहीसं…..
पहिला मानाचा दगड आहे 'प्रदीप कुमार'. गाणं - 'हम इंतज़ार करेंगे'.
इथे जुन्या हिंदी गीत संगीतावर अनेक सुरेख लेख , चर्चा झाल्या आहेत .. त्यातलं थोडंफार वाचलं आहे ..
दुर्दैवाने असं म्हणण्याचं फारसं कारण नाही पण आमच्या घरात हिंदी संगीताची आवड कुणाला नव्हती त्यामुळे ते लहान वयात किंवा टीनेज मध्ये कानावर पडलं नाही .. टीव्हीवर जुने हिंदी सिनेमे लागत नव्हते असं नाही पण प्रमाण कमी असावं आणि फास्ट रंगीत सिनेमांच्या ऐवजी ते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे बघावेत , गाणी ऐकावीत अशी काही आवड नाही उपजली त्यावेळी ...
कुमारांच्या गायकीचे वेगळेपण त्यांच्या षड्जा च्या स्वरापासूनच सुरू होते. पुरुषांचा स्वर काळी एक - काळी दोन, स्त्रियांचा स्वर काळी चार - काळी पाच ! कुमार गंधर्व गायचे पांढरी चार मध्ये. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की रागाकडे स्वरांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन एका स्त्री गायिकेचा किंवा एका पुरुष गायकाचा कसा असतो आपण वेळोवेळी ऐकत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो आहोत. कुमारांचा स्वरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात पुरुष आणि स्त्री या वर्गवारीच्या वैचारिकतेच्या पलीकडचा आहे आणि तो त्यांच्या आवाजापासूनच व्यक्त व्हायला सुरुवात होते.
मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.
मी मायबोली वर लिहायला सुरुवात केली त्या अगोदर जवळ जवळ दोन तीन महिने इथले लेख वाचत होतो आणि त्यानंतरच सदस्य झालो, त्याचे कारण म्हणजे इथले अभ्यासपूर्ण लेख आणि ती लिहिणारी जगभर पसरलेली समस्त मंडळी जी उच्च विद्या विभूषित असून त्यांची मते आणि एखाद्या विषयाचे विश्लेषण करण्याची त्यांची हातोटी ही खरोखर वाखणण्याजोगी आहे म्हणून.
मी लिहायला सुरुवात केली ती अभिजात पाश्चात्य संगीत आणि त्यातले ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणून ओळखले जाणारे बाख, बिथोवन आणि मोझार्ट यांची ओळख आणि त्यांच्या रचना याबद्दल.
संगीतशास्त्र हे मानवनिर्मित आहे पण संगीत हे काही मानवनिर्मित नाही . ते तर निसर्गातच आहे. प्रत्येक जीवांमध्ये भिनलेली एक कला. चिमण्यांचा चिवचिवाट ,पाण्याचं झुळझुळ वाहणं ,ढगांचं खर्जामध्ये गडगडणं हे सगळं संगीतच आहे कि ! 'भीमसेन जोशी बिजलीसारख्या ताना घेतात ' यामध्येसुद्धा तानांना बिजलीचीच तर उपमा दिली आहे ! म्हणजे वीज कडाडते असं म्हणण्यापेक्षा वीज ताना घेते असं म्हणणंच योग्य .. ! ' मला संगीत आवडत नाही ' असं बोलणारा माणूसच संगीतावर नकळतपणे प्रेम करत असतो. माझा दादा संगीत या विषयात औरंगजेब आहे , पण तरीही त्याला गुणगुणत असताना मी अनेकदा पाहते.
दुनिया जिसे कहते हैं, जादूका खिलौना है
मिल जाये तो मिट्टी है, खो जाये तो सोना है’
तानसेन बद्दल बर्याच कथा प्रचलित आहेत.
त्याने दीप राग गाइला तेव्हा तो इतका सुंदर आणि प्रभावी होता कि दरबारातल्या दीपकाचे ज्योत त्या प्रभावा मुळे प्र्ज्वलित झाली . मंत्रमुग्ध श्रोते अवाक झाले .
तानसेनला पाण्यात पहाणारेही दरबारात होते. त्यातल्या एकाने या गोश्टीचा फायदा घेऊन तानसेनचा दबदबा कमी करण्याचा कट आखला. अकबराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या वयाच्या संख्येइतके दिवे दरबारात पेटविण्याचे आव्हान तानसेनने स्वीकारावे असा प्रस्ताव त्याने मांडला.
माझ्या मताप्रमाणे शिनिवार हा वारांचा राजा आहे. याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी मन आनंदून जातं. त्यात सुट्टीची मजा आहे, काम आणि कर्तव्य पार पाडल्याचं समाधानही आहे. आठवड्यात बऱ्याच तुंबलेल्या कामाचं ओझं हा शिनिवार एखाद्या कुटुंबवत्सल घरच्या कर्त्या पुरुषाप्रमाणे आनंदाने आपल्या खांद्यावर उचलतो आणि कर्तव्य कठोराप्रमाणे पार पाडतो. याची दुपार रेंगाळलेली असली तरीही त्यात रविवारची हुरहूर नाही, मरगळ तर नाहीच नाही, आनंद आहे फक्त आनंद. शनिवारची चाहूल लागते ती गुरुवारपासून, शुक्रवार येतो तो शनिवारचा आनंद घेऊनच. शुक्रवार अर्धा संपला की शनिवारचा उत्सव सुरु होतो.
काल नवरात्री मंडपातून दुरून, अस्पष्टसे गाण्याचे स्वर ऐकू आले, "रात्र काळी, घागर काळी, यमुनाजळी ही काळी वो माय". आवाज स्पष्ट नसल्याने ओरिजनल गाणे लावले आहे की नाही ते ओळखु शकलो नाही. मात्र चित्राने मूळ वस्तुची आठवण यावी त्याप्रमाणे गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकरांच्या या गाण्याने मन भूतकाळात निघून गेले. माझं काही गाण्यांनी असं होतं. जणू काही टाईम मशीनमध्ये बसून टाईम ट्राव्हल करावी तसं मन जुन्या जगात निघून जातं.