काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.
या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.
नमस्कार मंडळी,
पुढच्या वर्षी साधारणतः मार्च एप्रिल मधे आई आणि वृद्ध काकुला काशीयात्रेला नेण्याचा विचार आहे. काशीबरोबरच प्रयाग आणि मिर्झापुरजवळील 'विंध्यवासिनी'देवीचं ही दर्शन करुन घ्यावे हा विचार मनात घोळतोय.
कुणी जाउन आले असल्यास, कृपया मार्गदर्शन करावे.
*काशीविश्वेश्वर आणि कालभैरव यांच्या दर्शनाव्यतिरिक्त अजुन कोणकोणती महत्वाची मंदीरं आहेत?
*धार्मिक पुजाविधी काय काय आणि कुठल्या (घाटांवर वै.)करावेत? त्यांचा जनरली रेट काय असतो?
दिवाळीनंतर, गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. मुक्काम bambolin beach या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. तिथे जाणे-येणे बहिणीच्या कुटुंबा बरोबरच होणार, पण तिथे पाहाण्याजोगे काय?, जवळची ठिकाणे, हे ठिकाण येथे कुठे, असे अनेक बेसिक प्रश्न आहेत. तसेच लहान मुलांसाठी चांगली ठिकाणे कोणती? हॉटेल व्हेज- नॉनव्हेज इ.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न
खरंतर हे आपलंच शहर असतं,इथले ट्राफिक जॅम,खड्डे ,गर्दी ,छोटे रस्ते,असंख्य वन वे अशा सगळ्या गोष्टीं सहीत! पण या गोष्टी कधीच प्रकर्षाने जाणवल्या नसतात. एकेकाळी अनोळखी असलेल्या या शहरात एन्ट्री केल्यावर पाहता पाहता कधी हे शहर आपलंच होऊन गेलं हे कळलं देखील नसत. इथला पाऊस,इथला हिवाळा ,शॉपिंग करता प्रसिद्ध असलेल्या गल्ल्या ,ऐतिहासिक वाडे ,स्वतःची ओळख जपलेली भाषा , पाट्या ,शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विखुरलेली संकेतस्थळ,कॉफी पिण्यापासून ते ऑफिस ची पार्टी अरेंज करण्यासाठी भटकलेली हॉटेल्स हे सगळ आपलंच ..
आपण नेहमीच्या या जगात अनेक माणसे पाहतो. पण लक्ष न देता आपण आपले पुढे जात असतो. कधी साधा विचार सुद्धा करावासा वाटत नाही कि आपल्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये अशी कोणती भिन्नता आहे. तर , त्या दिवशी कांदिवली ला जाताना रेल्वे , बस असा प्रवास होणारच होता पण त्या प्रवासात एक गोष्ट अशी पाहायला मिळाली आणि लिहावसं वाटलं.
प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.
इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.
लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)
रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.
"केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार ... "
लहानपणापासून अनेकदा ऐकलेली, वाचून - ऐकून अगदी पार गुळगुळीत झालेली ओळ. पण या ओळींची सत्यता अनुभवली ती मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या 'मातृभूमी दर्शन' उपक्रमातून. फ्रान्सीस बेकन देखील म्हणतो -
"Travel in the younger sort , is a part of education ; in the elder, a part of experience ."
म्हणूनच प्रवास, त्यातही समवयस्कांच्या समूहासोबत केलेला प्रवास हा शिक्षणाचा एक भागच आहे आणि त्याचबरोबर मोठ्यांनादेखील अनुभवसमृद्ध करणारा गुरु आहे.