मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची
स्थळ: गोंदवले
वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात!

आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत.रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये.
माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?
मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय.
डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अॅडमिशन घेतलं.
जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती.
माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो.
इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले.
हे पूर्वीचे लेख आहेत पण अजुनही माझ्याशी रेझोनेट होतात. किंबहुना, जास्तच.
तुम्हाला मराठीत लिहायला आवडते आणि तुम्ही अधून मधून ललित लेख, कथा, प्रवासवर्णन किंवा अनुभवकथन लिहिलेले आहे, असे असेल आणि तुम्हाला तुमच्या लेखनात अधिक सातत्य आणायचे असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
तुम्ही जर फार कधी लिहिले नसेल पण आपण लिहायला हवे असे तुमची इच्छा असेल आणि तुमच्या जवळ सांगायला खूप आहे पण कधी लिहायचे मनात आले नाही म्हणून किंवा संधी मिळाली नाही म्हणून ते राहून जात असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
मी जेव्हा नवा नवा कार्पोरेट जगात रूजू झालो त्यावेळी एक मौलिक अनुभव आला. तो म्हणजे वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती प्रक्रिया अशी होती:
.
१) आपल्या कामगिरीचे अवलोकन करून स्वतःच्या कामगिरीचे आढावा आणि मुल्यमापन कंपनीच्या अंकीय नोंदवहीत नोंदवायचे
२) मॅनेजर त्यांचा अभिप्रायाची नोंद करायचे
३) तुमच्या वर्षकार्याचा आढावा आणि मुल्यांकनाचे एक गुणोत्तर तयार होऊन त्यानुसार गुणांकनाची नोंद तुमच्या नावाने कायमच्या दस्तावेजांमधे जोडली जायची.
.
मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत
✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये
✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!"
✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ
✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण
✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे
✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते!
✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई
✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल!
अग्निशमन कवायतीचा तुमच्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी मिळाला?
.
मी पर्सिस्टंट सिस्टिम्स च्या नागपुरातल्या नव्या इमारतीमधे माझ्या निर्धारित डेस्कवर काम करत असताना २०१२ मधे म्हणजे वयाच्या सुमारे चाळिसाव्या वर्षी मला हा अनुभव पहिल्यांदा मिळाला होता. (संभाव्य घटना नियोजनाची एक संकल्पना, अग्निशमन कवायत जी जगण्याच्या अनेक पातळ्यांवर मला मदत करतेय तिची ओळख आयुष्याच्या इतक्या पुढच्या पातळीवर मिळावी ही खंत आहे.)
.
आणखी एक ड्रिंक घेऊया,” ती म्हणाली.
“नको, मला बाईक चालवायची आहे,” तो म्हणाला.
“मी नाही चालवू शकणार,”
ती म्हणाली. “चिंता नको, मध्यरात्री आहे, ट्रॅफिक नाही.”
त्यालाही प्यायचं होतं, म्हणून त्याने प्यायलं. दोघंही टुन्न. कसंबसं त्याने बाईक सुरू केली, ती मागे बसली. तोल गेला पण तो सावरला. मुख्य रस्त्यावर घेताना स्कूटरला धडकायचा बाकी होता.
“तू डावं-उजवं बघितलंच नाहीस!” ती ओरडली.
आरशात पाहिलं—मागून पोर्शे भरधाव येत होती…
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war!
✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे
✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक
✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा
✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज
✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा
✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज
✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा
✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट