"नको करायला यावर्षी काही.मस्त मस्त पाककृती आल्यात, बुकमार्क करून ठेवाव्या,करून पहाव्या."
"वेडी आहेस का?यावेळी किमान सोपे पेपर आलेत.पुढच्या वर्षी उकडीचे मोदक, सुरळी वड्या किंवा पुरणमांडे वगैरे आले तर?संधी दारावर परत परत नॉक करत नसते.मायगेट च्या नोटिफिकेशन सारखं तिचं नोटिफिकेशन ती एकदाच देते."
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट
- "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही
- बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा
- कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी
- सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ!
- छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ
- ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा
- ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट
- "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!"
- सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम
माझी फ्रान्सच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारी मैत्रीण सिसील, हिच्याकडे मी पंधरा दिवस राहणार म्हणून तिने पूर्ण पंधरा दिवस सुट्टी घेतली होती. तसा विशेष काही प्लान ठरला नव्हता. खरंतर मी सुट्टीला गेले की प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम "गुगल कीप" मधे बनवून ठेवते आणि अगदी तसच्या तसं करायला नाही जमलं तरी ढोबळमानाने एवढंतरी करायचय हे हाताशी राहातं. पंधरा दिवस तिच्या घरीच राहायचं तर प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम ठरवण्यापेक्षा एकूण सुट्टीत कायकाय मजा करायची एवढच दोघींनी मिळून ठरवलं होतं.
जनकसुता जग जननि जानकी। अतिसय प्रिय करुनानिधान की॥
ताके जुग पद कमल मनावउँ। जासु कृपाँ निरमल मति पावउँ॥
ही जनकदुहितेस अर्थात लक्ष्मीचा अवतार असणार्या सीतेची स्तुती करताना, गुणवर्णन करताना, तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहीलेला श्लोक. अन्य सर्व श्लोक, सिद्ध चौपाया, एका पारड्यात आणि सीतेचे श्लोक दुसर्या पारड्यात ठेवले असता, दुसरे पारडे जड ठरते - माझ्यापुरता.
.
मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची
स्थळ: गोंदवले
वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात!

आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत.रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये.
माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?
मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय.
डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अॅडमिशन घेतलं.
जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती.
माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो.
इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले.
हे पूर्वीचे लेख आहेत पण अजुनही माझ्याशी रेझोनेट होतात. किंबहुना, जास्तच.
तुम्हाला मराठीत लिहायला आवडते आणि तुम्ही अधून मधून ललित लेख, कथा, प्रवासवर्णन किंवा अनुभवकथन लिहिलेले आहे, असे असेल आणि तुम्हाला तुमच्या लेखनात अधिक सातत्य आणायचे असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
तुम्ही जर फार कधी लिहिले नसेल पण आपण लिहायला हवे असे तुमची इच्छा असेल आणि तुमच्या जवळ सांगायला खूप आहे पण कधी लिहायचे मनात आले नाही म्हणून किंवा संधी मिळाली नाही म्हणून ते राहून जात असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
.
मी जेव्हा नवा नवा कार्पोरेट जगात रूजू झालो त्यावेळी एक मौलिक अनुभव आला. तो म्हणजे वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती प्रक्रिया अशी होती:
.
१) आपल्या कामगिरीचे अवलोकन करून स्वतःच्या कामगिरीचे आढावा आणि मुल्यमापन कंपनीच्या अंकीय नोंदवहीत नोंदवायचे
२) मॅनेजर त्यांचा अभिप्रायाची नोंद करायचे
३) तुमच्या वर्षकार्याचा आढावा आणि मुल्यांकनाचे एक गुणोत्तर तयार होऊन त्यानुसार गुणांकनाची नोंद तुमच्या नावाने कायमच्या दस्तावेजांमधे जोडली जायची.
.
मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.